शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

पुष्पदंतेश्वर कारखाना परत मिळविण्यासाठी शेतक:यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 12:25 IST

जिल्हाधिका:यांना निवेदन : सर्व प्रक्रियेची नव्याने चौकशी व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य सहकारी बँकेने विक्री केलेल्या साखर कारखान्यांची गुन्हा अन्वेशन विभागामार्फत सुरू असलेली चौकशी निष्पक्षपातीपणे करावी. कारखाना पुन्हा शेतक:यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली. यासाठी शेतक:यांनी अर्धनगA आंदोलन देखील केले.संघटनेचे राज्य पदाधिकारी रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष घन:शाम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा  गुरुवारी दुपारी काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कारखाना शेतकरी, शेतमजूर व सभासदांच्या आर्थिक भांडवलावर उभा राहिला आहे. मात्र कारखाना पूर्ण  क्षमतेचे सुरू असताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने तो विक्रीचा घाट घातला. यादरम्यान राज्यातील अनेक कारखान्यांवर राज्य सहकारी बँकेचे कर्ज असताना पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याची विक्री करण्यात आली. सत्तेचा दुरुपयोग करून कारखान्याची 150 कोटींची मालमत्ता असताना फक्त 47 कोटींमध्ये कारखान्याची विक्री करण्यात आली. कारखाना विक्री झाल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यात आले. कारखाना विक्री झाला तेव्हा ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, मजूर व वाहतूक खर्च देणे बाकी होते. ही रक्कम अद्यापही मिळालेली नाही. कारखान्यासाठी शेतक:यांची जमीन व ऊस असताना त्यांच्या मुलांना कारखान्यात रोजगार दिला जात नाही. बाहेरील लोकांना येथे रोजगार दिला जातो. या सर्व कारणांमुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद चौधरी, वसंत पाटील, गोरख पाटील, नथ्थू पाटील, मुकेश पाटील, सुरेश पाटील, श्रीपत पाटील यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.