शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळी स्थितीत शेतक:यांना मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 13:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मिरचीचा हंगाम यंदा जोरात सुरू आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आवक सुरू आहे. भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  मिरचीचा हंगाम यंदा जोरात सुरू आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आवक सुरू आहे. भाव देखील ब:यापैकी मिळत असल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधान आहे. यंदा दीड लाख क्विंटलपेक्षा अधीक आवक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारअखेर जवळपास 71 हजार क्विंटल मिरचीची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मिरचीचा बाजार फिका पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु बागायतदार शेतक:यांनी पिकविलेल्या मिरचीचा हंगाम यंदा चांगला आल्याने मिरची उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक झाले आहे. त्याचा फायदा अर्थात शेतक:यांना मिळत आहे. भाव देखील क्विंटलला तीन हजारापेक्षा अधीकच राहत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. आणखी महिना ते दीड महिना मिरची हंगाम राहणार असल्यामुळे आवक कमी झाल्यावर भाव आणखी वाढण्याची अपेक्षा देखील शेतक:यांमधून व्यक्त होत आहे.भाव देखील समाधानकारकयंदा मिरचीचे भाव देखील समाधानकारक असल्याचे चित्र आहे. चांगल्या प्रतीच्या मिरचीला किमान तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलर्पयत भाव मिळत आहे. साधारण प्रतीच्या मिरचीला किमान दोन हजार रुपये भाव आहे. सध्या आवक ब:यापैकी असल्यामुळे भाव स्थिर आहेत. येत्या काळात जसा मिरची हंगाम संपण्याच्या मार्गावर येईल तसा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणाचा फटकागेल्या आठवडय़ात वातावरण बदलल्याने अर्थात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील झाल्याने मिरचीची आवक निम्म्यावर आली होती. व्यापारी देखील खरेदीसाठी फारसे उत्सूक नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शेतक:यांनी मिरची तोडचे प्रमाण मर्यादीतच ठेवले होते. शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त सुटी राहील या शंकेने देखील शेतक:यांनी बाजारात फारशी मिरची विक्रीसाठी आणली नसल्याचे चित्र होते.यंदा मिरची गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक आवक होत आहे. गेल्यावर्षी संपुर्ण सिझनमध्ये साधारणत: 35 हजार क्विंटलर्पयत आवक झाली होती. यंदा त्यापेक्षा दुप्पट अर्थात 71 हजारार्पयत आतार्पयत आवक झाली आहे. आणखी महिना, दीड महिना हंगाम लक्षात घेता 60 ते 70 हजार क्विंटल आवक होण्याची शक्यता गृहीत धरता पुर्ण हंगामात दीड लाख क्विंटलर्पयत आवक जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ऐन दुष्काळात शेतक:यांना मिरचीने तारल्याचे चित्र आहे. बाजार समितीत दररोज किमान एक ते दीड हजार क्विंटल आवक सुरू आहे. गेल्या तीन ते चार दिवसात ढगाळ वातावरण लक्षात घेता आवकवर परिणाम झाल्याचे चित्र होते.पथारी स्थलांतरीतयंदा अनेक व्यापा:यांनी आपल्या मिरची पथारी शहराबाहेर नेल्या आहेत. पूर्वीच्या मिरची पथारीच्या जागेवर आणि आजूबाजुला मोठय़ा प्रमाणावर रहिवास आणि व्यावसायिक वसाहत झाल्याने त्या भागातील नागरिकांनी पथारींना विरोध केला होता. त्यामुळे व्यापा:यांनी धुळे रस्त्यावरील चौपाळे शिवारात जागा भाडय़ाने घेवून त्या ठिकाणी पथारी सुरू केल्या आहेत. त्यामुळे धुळे रस्त्यावर अनेक भागात लाल गालिचा अंथरलेला दिसून  येतो. याच ठिकाणी मिरचीचे देठ खुडणे, ती सुकविण्यासाठी पसरविणे, कोरडी मिरची पॅकींग करणे, किरकोळ विक्री करणे असे व्यवहार व कामे होत असल्याने या भागात अनेकांना ब:यापैकी रोजगार देखील मिळू लागला आहे. परिणामी या भागात वर्दळ वाढू लागली आहे.