शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची थकबाकी ७ जुलैपर्यंत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

नंदुरबार : आयान शुगरकडे यावर्षी जिल्ह्यातील १८ हजार हेक्टर ऊस गाळपासाठी नोंद झाला आहे. गेल्या हंगामातील उसाला दोन हजार ...

नंदुरबार : आयान शुगरकडे यावर्षी जिल्ह्यातील १८ हजार हेक्टर ऊस गाळपासाठी नोंद झाला आहे. गेल्या हंगामातील उसाला दोन हजार ४२५ रुपये प्रतिटनचा भाव दिला असून, ९० टक्के शेतकऱ्यांची रक्कम दिली आहे. कोरोनामुळे १० टक्के शेतकऱ्यांची रक्कम थकीत असून, तीदेखील ७ जुलैपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याने दिली आहे.

साखर कारखान्यांतर्फे आगामी हंगामाची तयारीसंदर्भात माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक बडगुजर व मुख्य लेखाधिकारी पद्माकर टापरे यांनी सांगितले की, गेल्या हंगामात कारखान्याने एफआरपीचा दर दोन हजार ३२७ असताना शेतकऱ्यांना प्रतिटन दोन ४२५ रुपये भाव दिला आहे. त्यातील ९० टक्के शेतकऱ्यांचे केनपेमेंट अदा करण्यात आले असून, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे १० टक्के शेतकऱ्यांची उसाची रक्कम थकीत आहे. या शेतकऱ्यांना त्यांची रक्कम देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली असून, ७ जुलैपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पुढील हंगामातही कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू राहील यासाठी नियोजन करण्यात आले असून, कारखान्याकडे १८ हजार हेक्टर उसाची नोंद शेतकऱ्यांनी केली आहे. वेळेवर कारखाना सुरू करून नियोजनानुसार शेतकऱ्यांचा ऊस वेळीच गाळप करण्याचे प्रयत्न असून, त्यासाठी आतापासून नियोजन करण्यात येत असल्याचे बडगुजर यांनी सांगितले.