शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
3
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
4
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
5
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
6
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
7
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
8
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
9
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
10
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदिपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
11
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट
12
दरमहा १० हजारांची बचत? म्युच्युअल फंडात कुठे आणि कशी करावी गुंतवणूक? फक्त 'ही' चूक करू नका
13
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
14
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
15
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
16
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
17
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
18
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
19
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
20
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?

गेल्या वर्षीचा पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत ...

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत असल्याने शेतकरीही मोठ्या आशेने पिकांचा विमा उतरवित असत. मात्र, गेल्या वेळेसचा म्हणजे सन २०२० मध्ये पिकांचे नुकसान होऊनही विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा कंपनीवरचा भरोसा कमी झालाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांची मदार ही पावसावर आहे. पाऊस पडला तर ठीक नाही तर उन्हाळाच, त्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरण्याला जास्त महत्त्व देत आहेत. परंतु गेल्या वेळेस अति पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, असे असतानाही कंपनीने विमा मंजूर केला नाही. खरीप हंगामातील पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु गतवर्षीच्या खरीप हंगामात भरलेला विमा मंजूर न झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा सुरक्षित करण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरलेला होता व अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. तरीही जिल्ह्यातील नेतेमंडळी चिडीचूप असल्याने त्याचाच परिणाम म्हणून की काय, या वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी पपई, केळी, कापूस, तूरसह इतर पिकांचा पीकविमा उतरविला होता. शेवटी प्रयत्न म्हणून विमा मिळेल, अशी आशा होती. पण आता विमा परतावा मिळण्याची आशा पार मावळली असल्याने यावर्षीचा पीकविमा भरण्याची द्विधा परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी जसा खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह होता तसा यावेळेस उत्साह दिसत नाही. गेल्या वर्षीचा २०२०चा पीकविमा मिळाला नसल्यामुळे आता २०२१च्या खरीप हंगामातील विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

- भय्या गवळे, आपले सरकार सेवा केंद्र, बामखेडा

खरीप हंगाम २०२० मध्ये तालुक्यातील वडाळी महसूल मंडळात बहुतेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील क्षेत्राचा पीकविमा भरला होता. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीला रक्कम भरली होती. मात्र शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- बन्सी पटेल, शेतकरी, बामखेडा