शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षीचा पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत ...

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत असल्याने शेतकरीही मोठ्या आशेने पिकांचा विमा उतरवित असत. मात्र, गेल्या वेळेसचा म्हणजे सन २०२० मध्ये पिकांचे नुकसान होऊनही विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा कंपनीवरचा भरोसा कमी झालाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांची मदार ही पावसावर आहे. पाऊस पडला तर ठीक नाही तर उन्हाळाच, त्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरण्याला जास्त महत्त्व देत आहेत. परंतु गेल्या वेळेस अति पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, असे असतानाही कंपनीने विमा मंजूर केला नाही. खरीप हंगामातील पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु गतवर्षीच्या खरीप हंगामात भरलेला विमा मंजूर न झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा सुरक्षित करण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरलेला होता व अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. तरीही जिल्ह्यातील नेतेमंडळी चिडीचूप असल्याने त्याचाच परिणाम म्हणून की काय, या वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी पपई, केळी, कापूस, तूरसह इतर पिकांचा पीकविमा उतरविला होता. शेवटी प्रयत्न म्हणून विमा मिळेल, अशी आशा होती. पण आता विमा परतावा मिळण्याची आशा पार मावळली असल्याने यावर्षीचा पीकविमा भरण्याची द्विधा परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी जसा खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह होता तसा यावेळेस उत्साह दिसत नाही. गेल्या वर्षीचा २०२०चा पीकविमा मिळाला नसल्यामुळे आता २०२१च्या खरीप हंगामातील विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

- भय्या गवळे, आपले सरकार सेवा केंद्र, बामखेडा

खरीप हंगाम २०२० मध्ये तालुक्यातील वडाळी महसूल मंडळात बहुतेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील क्षेत्राचा पीकविमा भरला होता. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीला रक्कम भरली होती. मात्र शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- बन्सी पटेल, शेतकरी, बामखेडा