शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

गेल्या वर्षीचा पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत ...

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत असल्याने शेतकरीही मोठ्या आशेने पिकांचा विमा उतरवित असत. मात्र, गेल्या वेळेसचा म्हणजे सन २०२० मध्ये पिकांचे नुकसान होऊनही विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा कंपनीवरचा भरोसा कमी झालाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांची मदार ही पावसावर आहे. पाऊस पडला तर ठीक नाही तर उन्हाळाच, त्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरण्याला जास्त महत्त्व देत आहेत. परंतु गेल्या वेळेस अति पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, असे असतानाही कंपनीने विमा मंजूर केला नाही. खरीप हंगामातील पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु गतवर्षीच्या खरीप हंगामात भरलेला विमा मंजूर न झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा सुरक्षित करण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरलेला होता व अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. तरीही जिल्ह्यातील नेतेमंडळी चिडीचूप असल्याने त्याचाच परिणाम म्हणून की काय, या वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी पपई, केळी, कापूस, तूरसह इतर पिकांचा पीकविमा उतरविला होता. शेवटी प्रयत्न म्हणून विमा मिळेल, अशी आशा होती. पण आता विमा परतावा मिळण्याची आशा पार मावळली असल्याने यावर्षीचा पीकविमा भरण्याची द्विधा परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी जसा खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह होता तसा यावेळेस उत्साह दिसत नाही. गेल्या वर्षीचा २०२०चा पीकविमा मिळाला नसल्यामुळे आता २०२१च्या खरीप हंगामातील विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

- भय्या गवळे, आपले सरकार सेवा केंद्र, बामखेडा

खरीप हंगाम २०२० मध्ये तालुक्यातील वडाळी महसूल मंडळात बहुतेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील क्षेत्राचा पीकविमा भरला होता. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीला रक्कम भरली होती. मात्र शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- बन्सी पटेल, शेतकरी, बामखेडा