शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

शेतक:याने दगड ठेवून ह्रदयी उखडून टाकली शेतातील पपई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : जून महिना आला असला तरी जमिनीची तहान भागवणारा पाऊस अद्यापही कोसळलेला नाही़ परिणामी भूजल ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : जून महिना आला असला तरी जमिनीची तहान भागवणारा पाऊस अद्यापही कोसळलेला नाही़ परिणामी भूजल आटून शेतात लावलेली पिके पाण्याअभानी जमिनदोस्त होत आह़े शेतात होत असलेली दुर्दशा न पाहवल्याने तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतक:याने दोन एकरातील सुमारे पावणे दोन हजार झाडांवर नांगर फिरवला आह़े या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आह़े    मोड येथील भिमा गिरधर चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी कळमसरे शिवारातील पाण्याच्या बळावर दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली होती़ एका एकरात 850 याप्रमाणे रोपांची लागवड त्यांनी केली होती़ यासाठी एकरी 30 हजार रुपयांर्पयतचा खर्च करत त्यांनी पपईचे संगोपन सुरु केले होत़े परंतू गेल्या 15 दिवसांपूर्वी शेतातील कूपनलिका पूर्णपणे आटली़ चौधरी यांच्याकडे पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने पपईवर मर येऊन दुर्दशा आणखीन वाढली़ यातून संपूर्ण दोन एकरात चांगल्याप्रकारे वाढ झालेली पपईची झाडे जमिनीवर कोसळली़ ही झाडे पुन्हा सुस्थितीत येण्याची चिन्हे नसल्याने शेतक:याने छातीवर दगड ठेवत संपूर्ण दोन शेत नांगरुन टाकल़े यावेळी परिसरातील शेतकरीही उपस्थित होत़े मोठा खर्च करुन क्रॉप कव्हरसह पपई रोपाची करुन लागवड करुन उज्ज्वल भविष्याची नांगरटी होत असल्याचे पाहून उपस्थित शेतक:यांच्या डोळ्यातही अश्रु आले होत़े यंदा भिषण दुष्काळाची धग भोगणा:या तळोदा तालुक्यात शेतातील सारे पिकच काढून फेकण्याचे प्रकार दरदिवशी घडत असल्याचे दिसून येत आहेत़ मोड परिसरातील गावांमध्ये ब:याच शेतांमध्ये पाण्याअभावी केळी आणि पपईची शेती हाताबाहेर जात असल्याने अनेक शेतक:यांनी शेतात जाऊन पाहणेही सोडून दिले आह़े यामुळे कजर्बाजारी होण्याची वेळ येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े यातून केवळ निसर्गच शेतक:याना तारु शकणार असून आभाळाकडे शेतक:यांच्या नजरा लागल्या आहेत़ 

तळोदा तालुक्यात यंदा 364 हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करण्यात आली आह़े यातील बहुतांश क्षेत्राला वाढत्या तापमानाचा फटका बसत आह़े तालुका कृषी अधिकारी प्रविणकुमार भोर यांनी याबाबत सांगितले की, 43 अंशार्पयत तापमान गेल्यामुळे कमी वाढ झालेले रोपटे पिवळे पडून जागीच कोसळत आह़े यातून पाण्याचा अभाव असल्यास मोठय़ा प्रमाणावर हानी होत आह़े शेतकरी चौधरी यांनी प्रत्येकी 14 रुपये याप्रमाणे रोपांची खरेदी करुन आणली होती़ दोन महिन्यात दोन तीन फूटार्पयत झाडांची वाढ झाली होती़ परंतू पाणीच नसल्याने त्यांची जागीच वाताहत झाली़ आजअखेरीस बोरद, मोड, कळमसरे, मोहिदा, तळवे, आमलाड आदी ठिकाणी पपई रोपांची स्थिती अत्यंत गंभीर असून पाणी न मिळाल्यास येथेही नुकसान अटळ आह़े