शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:याने दगड ठेवून ह्रदयी उखडून टाकली शेतातील पपई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : जून महिना आला असला तरी जमिनीची तहान भागवणारा पाऊस अद्यापही कोसळलेला नाही़ परिणामी भूजल ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : जून महिना आला असला तरी जमिनीची तहान भागवणारा पाऊस अद्यापही कोसळलेला नाही़ परिणामी भूजल आटून शेतात लावलेली पिके पाण्याअभानी जमिनदोस्त होत आह़े शेतात होत असलेली दुर्दशा न पाहवल्याने तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतक:याने दोन एकरातील सुमारे पावणे दोन हजार झाडांवर नांगर फिरवला आह़े या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आह़े    मोड येथील भिमा गिरधर चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी कळमसरे शिवारातील पाण्याच्या बळावर दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली होती़ एका एकरात 850 याप्रमाणे रोपांची लागवड त्यांनी केली होती़ यासाठी एकरी 30 हजार रुपयांर्पयतचा खर्च करत त्यांनी पपईचे संगोपन सुरु केले होत़े परंतू गेल्या 15 दिवसांपूर्वी शेतातील कूपनलिका पूर्णपणे आटली़ चौधरी यांच्याकडे पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने पपईवर मर येऊन दुर्दशा आणखीन वाढली़ यातून संपूर्ण दोन एकरात चांगल्याप्रकारे वाढ झालेली पपईची झाडे जमिनीवर कोसळली़ ही झाडे पुन्हा सुस्थितीत येण्याची चिन्हे नसल्याने शेतक:याने छातीवर दगड ठेवत संपूर्ण दोन शेत नांगरुन टाकल़े यावेळी परिसरातील शेतकरीही उपस्थित होत़े मोठा खर्च करुन क्रॉप कव्हरसह पपई रोपाची करुन लागवड करुन उज्ज्वल भविष्याची नांगरटी होत असल्याचे पाहून उपस्थित शेतक:यांच्या डोळ्यातही अश्रु आले होत़े यंदा भिषण दुष्काळाची धग भोगणा:या तळोदा तालुक्यात शेतातील सारे पिकच काढून फेकण्याचे प्रकार दरदिवशी घडत असल्याचे दिसून येत आहेत़ मोड परिसरातील गावांमध्ये ब:याच शेतांमध्ये पाण्याअभावी केळी आणि पपईची शेती हाताबाहेर जात असल्याने अनेक शेतक:यांनी शेतात जाऊन पाहणेही सोडून दिले आह़े यामुळे कजर्बाजारी होण्याची वेळ येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े यातून केवळ निसर्गच शेतक:याना तारु शकणार असून आभाळाकडे शेतक:यांच्या नजरा लागल्या आहेत़ 

तळोदा तालुक्यात यंदा 364 हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करण्यात आली आह़े यातील बहुतांश क्षेत्राला वाढत्या तापमानाचा फटका बसत आह़े तालुका कृषी अधिकारी प्रविणकुमार भोर यांनी याबाबत सांगितले की, 43 अंशार्पयत तापमान गेल्यामुळे कमी वाढ झालेले रोपटे पिवळे पडून जागीच कोसळत आह़े यातून पाण्याचा अभाव असल्यास मोठय़ा प्रमाणावर हानी होत आह़े शेतकरी चौधरी यांनी प्रत्येकी 14 रुपये याप्रमाणे रोपांची खरेदी करुन आणली होती़ दोन महिन्यात दोन तीन फूटार्पयत झाडांची वाढ झाली होती़ परंतू पाणीच नसल्याने त्यांची जागीच वाताहत झाली़ आजअखेरीस बोरद, मोड, कळमसरे, मोहिदा, तळवे, आमलाड आदी ठिकाणी पपई रोपांची स्थिती अत्यंत गंभीर असून पाणी न मिळाल्यास येथेही नुकसान अटळ आह़े