शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

शेतक:याने दगड ठेवून ह्रदयी उखडून टाकली शेतातील पपई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : जून महिना आला असला तरी जमिनीची तहान भागवणारा पाऊस अद्यापही कोसळलेला नाही़ परिणामी भूजल ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : जून महिना आला असला तरी जमिनीची तहान भागवणारा पाऊस अद्यापही कोसळलेला नाही़ परिणामी भूजल आटून शेतात लावलेली पिके पाण्याअभानी जमिनदोस्त होत आह़े शेतात होत असलेली दुर्दशा न पाहवल्याने तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतक:याने दोन एकरातील सुमारे पावणे दोन हजार झाडांवर नांगर फिरवला आह़े या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आह़े    मोड येथील भिमा गिरधर चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी कळमसरे शिवारातील पाण्याच्या बळावर दोन एकर क्षेत्रात पपई लागवड केली होती़ एका एकरात 850 याप्रमाणे रोपांची लागवड त्यांनी केली होती़ यासाठी एकरी 30 हजार रुपयांर्पयतचा खर्च करत त्यांनी पपईचे संगोपन सुरु केले होत़े परंतू गेल्या 15 दिवसांपूर्वी शेतातील कूपनलिका पूर्णपणे आटली़ चौधरी यांच्याकडे पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत नसल्याने पपईवर मर येऊन दुर्दशा आणखीन वाढली़ यातून संपूर्ण दोन एकरात चांगल्याप्रकारे वाढ झालेली पपईची झाडे जमिनीवर कोसळली़ ही झाडे पुन्हा सुस्थितीत येण्याची चिन्हे नसल्याने शेतक:याने छातीवर दगड ठेवत संपूर्ण दोन शेत नांगरुन टाकल़े यावेळी परिसरातील शेतकरीही उपस्थित होत़े मोठा खर्च करुन क्रॉप कव्हरसह पपई रोपाची करुन लागवड करुन उज्ज्वल भविष्याची नांगरटी होत असल्याचे पाहून उपस्थित शेतक:यांच्या डोळ्यातही अश्रु आले होत़े यंदा भिषण दुष्काळाची धग भोगणा:या तळोदा तालुक्यात शेतातील सारे पिकच काढून फेकण्याचे प्रकार दरदिवशी घडत असल्याचे दिसून येत आहेत़ मोड परिसरातील गावांमध्ये ब:याच शेतांमध्ये पाण्याअभावी केळी आणि पपईची शेती हाताबाहेर जात असल्याने अनेक शेतक:यांनी शेतात जाऊन पाहणेही सोडून दिले आह़े यामुळे कजर्बाजारी होण्याची वेळ येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े यातून केवळ निसर्गच शेतक:याना तारु शकणार असून आभाळाकडे शेतक:यांच्या नजरा लागल्या आहेत़ 

तळोदा तालुक्यात यंदा 364 हेक्टर क्षेत्रात पपईची लागवड करण्यात आली आह़े यातील बहुतांश क्षेत्राला वाढत्या तापमानाचा फटका बसत आह़े तालुका कृषी अधिकारी प्रविणकुमार भोर यांनी याबाबत सांगितले की, 43 अंशार्पयत तापमान गेल्यामुळे कमी वाढ झालेले रोपटे पिवळे पडून जागीच कोसळत आह़े यातून पाण्याचा अभाव असल्यास मोठय़ा प्रमाणावर हानी होत आह़े शेतकरी चौधरी यांनी प्रत्येकी 14 रुपये याप्रमाणे रोपांची खरेदी करुन आणली होती़ दोन महिन्यात दोन तीन फूटार्पयत झाडांची वाढ झाली होती़ परंतू पाणीच नसल्याने त्यांची जागीच वाताहत झाली़ आजअखेरीस बोरद, मोड, कळमसरे, मोहिदा, तळवे, आमलाड आदी ठिकाणी पपई रोपांची स्थिती अत्यंत गंभीर असून पाणी न मिळाल्यास येथेही नुकसान अटळ आह़े