शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सरदार सरोवर बाधित कुटूंब : 52 कुटूंबांसाठी नवीन वसाहत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटूंबांना न्याय मिळणार आहे.गेल्या दहा वर्षापासून सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊन घरांपासून वंचीत असलेल्या 52 ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटूंबांना न्याय मिळणार आहे.गेल्या दहा वर्षापासून सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊन घरांपासून वंचीत असलेल्या 52 कुटूंबांचे पुनर्वसन तालुक्यातील न्यूबन गावाजवळील गावठाणात करण्यात येणार आहे. या कामाचे भुमिपूजन शनिवारी एका कार्यक्रमात करण्यात आले. हक्काच घर आणि गाव मिळणार असल्याने प्रकल्प बाधितांच्या चेह:यावर समाधान दिसून येत होते. आता प्रशासनाने युद्धपातळीवर कामे पुर्ण करून एक आदर्श वसाहत निर्माण करण्याची अपेक्षाही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील भुषा, वडद्या, हुंडारोषमाळ, भरड, शेलगदा, उनवणे व साव:यादिगर अशा सात गावांमधील साधारण 52 कुटूंबांचे 2008 मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. तथापी त्यांना वसाहतींमध्ये घरे मिळालेली नव्हती. त्यामुळे हे सर्व बाधित आपल्या स्वत:च्या शेतात राहत होती. घरे नसल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांबरोबरच पायाभूत सुविधांपासून वंचीत राहावे लागत होते. घरांसाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने देखील याप्रकरणी ठोस कार्यवाही करून बाधितांसाठी जागा उपलब्ध करून दिली. तालुक्यातील न्यूबन गावाजवळील तीन हेक्टर 12 आर जागा निश्चित करण्यात आली. या घरांच्या बांधकामाचे भुमिपूजन शनिवारी पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई दिवाकर पवार, उपसभापती दिपक मोरे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.कांतिलाल टाटीया, न्यूबनचे सरपंच सुरेश ठाकरे, धनपूरचे सरपंच अनिल वळवी, दिवाकर पवार, रेवनानगरचे दाज्या पावरा, उपअभियंता आर.ओ.पाटील, खंदारे आदी उपस्थित होते. यावेळी बाधितांना मार्गदर्शन करतांना तहसीलदार चंद्रे म्हणाले, वसाहतीचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून आवश्यक त्या सुविधांसह दोन महिन्यात वसाहत हस्तांतर करण्यात येईल. एक आदर्श वसाहत निर्माण व्हावी यासाठी प्रकल्पग्रस्तांनी देखील सहकार्य करावे. डॉ.कांतिलाल टाटीया यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा आपल्याला आपल्या हक्काच गाव व घर मिळणार असल्याने उपस्थित सर्व बाधितांच्या चेह:यावर समाधानाचे भाव उमटले होते. मात्र नर्मदाविकास  विभाग आणि महसूल प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवून वसाहतीसाठीच्या पायाभूत सुविधांबरोबरच शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांची कामे देखील तातडीने पुर्ण करण्याची मागणी विस्थापीतांनी यावेळी केली.