शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर बाधित कुटूंब : 52 कुटूंबांसाठी नवीन वसाहत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटूंबांना न्याय मिळणार आहे.गेल्या दहा वर्षापासून सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊन घरांपासून वंचीत असलेल्या 52 ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटूंबांना न्याय मिळणार आहे.गेल्या दहा वर्षापासून सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊन घरांपासून वंचीत असलेल्या 52 कुटूंबांचे पुनर्वसन तालुक्यातील न्यूबन गावाजवळील गावठाणात करण्यात येणार आहे. या कामाचे भुमिपूजन शनिवारी एका कार्यक्रमात करण्यात आले. हक्काच घर आणि गाव मिळणार असल्याने प्रकल्प बाधितांच्या चेह:यावर समाधान दिसून येत होते. आता प्रशासनाने युद्धपातळीवर कामे पुर्ण करून एक आदर्श वसाहत निर्माण करण्याची अपेक्षाही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील भुषा, वडद्या, हुंडारोषमाळ, भरड, शेलगदा, उनवणे व साव:यादिगर अशा सात गावांमधील साधारण 52 कुटूंबांचे 2008 मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. तथापी त्यांना वसाहतींमध्ये घरे मिळालेली नव्हती. त्यामुळे हे सर्व बाधित आपल्या स्वत:च्या शेतात राहत होती. घरे नसल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांबरोबरच पायाभूत सुविधांपासून वंचीत राहावे लागत होते. घरांसाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने देखील याप्रकरणी ठोस कार्यवाही करून बाधितांसाठी जागा उपलब्ध करून दिली. तालुक्यातील न्यूबन गावाजवळील तीन हेक्टर 12 आर जागा निश्चित करण्यात आली. या घरांच्या बांधकामाचे भुमिपूजन शनिवारी पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई दिवाकर पवार, उपसभापती दिपक मोरे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.कांतिलाल टाटीया, न्यूबनचे सरपंच सुरेश ठाकरे, धनपूरचे सरपंच अनिल वळवी, दिवाकर पवार, रेवनानगरचे दाज्या पावरा, उपअभियंता आर.ओ.पाटील, खंदारे आदी उपस्थित होते. यावेळी बाधितांना मार्गदर्शन करतांना तहसीलदार चंद्रे म्हणाले, वसाहतीचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून आवश्यक त्या सुविधांसह दोन महिन्यात वसाहत हस्तांतर करण्यात येईल. एक आदर्श वसाहत निर्माण व्हावी यासाठी प्रकल्पग्रस्तांनी देखील सहकार्य करावे. डॉ.कांतिलाल टाटीया यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा आपल्याला आपल्या हक्काच गाव व घर मिळणार असल्याने उपस्थित सर्व बाधितांच्या चेह:यावर समाधानाचे भाव उमटले होते. मात्र नर्मदाविकास  विभाग आणि महसूल प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवून वसाहतीसाठीच्या पायाभूत सुविधांबरोबरच शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांची कामे देखील तातडीने पुर्ण करण्याची मागणी विस्थापीतांनी यावेळी केली.