शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरदार सरोवर बाधित कुटूंब : 52 कुटूंबांसाठी नवीन वसाहत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटूंबांना न्याय मिळणार आहे.गेल्या दहा वर्षापासून सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊन घरांपासून वंचीत असलेल्या 52 ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर बाधितांसाठी आता अकरावी पुनर्वसन वसाहत निर्माण करण्यात येणार आहे. 52 कुटूंबांसाठी न्यूबन गावठाणात ही वसाहत राहणार असून तेथे घरांच्या बांधकामाचे शनिवारी भुमिपूजन करण्यात आले. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या कुटूंबांना न्याय मिळणार आहे.गेल्या दहा वर्षापासून सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊन घरांपासून वंचीत असलेल्या 52 कुटूंबांचे पुनर्वसन तालुक्यातील न्यूबन गावाजवळील गावठाणात करण्यात येणार आहे. या कामाचे भुमिपूजन शनिवारी एका कार्यक्रमात करण्यात आले. हक्काच घर आणि गाव मिळणार असल्याने प्रकल्प बाधितांच्या चेह:यावर समाधान दिसून येत होते. आता प्रशासनाने युद्धपातळीवर कामे पुर्ण करून एक आदर्श वसाहत निर्माण करण्याची अपेक्षाही प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील भुषा, वडद्या, हुंडारोषमाळ, भरड, शेलगदा, उनवणे व साव:यादिगर अशा सात गावांमधील साधारण 52 कुटूंबांचे 2008 मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. तथापी त्यांना वसाहतींमध्ये घरे मिळालेली नव्हती. त्यामुळे हे सर्व बाधित आपल्या स्वत:च्या शेतात राहत होती. घरे नसल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध शासकीय योजनांबरोबरच पायाभूत सुविधांपासून वंचीत राहावे लागत होते. घरांसाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने देखील याप्रकरणी ठोस कार्यवाही करून बाधितांसाठी जागा उपलब्ध करून दिली. तालुक्यातील न्यूबन गावाजवळील तीन हेक्टर 12 आर जागा निश्चित करण्यात आली. या घरांच्या बांधकामाचे भुमिपूजन शनिवारी पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई दिवाकर पवार, उपसभापती दिपक मोरे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.कांतिलाल टाटीया, न्यूबनचे सरपंच सुरेश ठाकरे, धनपूरचे सरपंच अनिल वळवी, दिवाकर पवार, रेवनानगरचे दाज्या पावरा, उपअभियंता आर.ओ.पाटील, खंदारे आदी उपस्थित होते. यावेळी बाधितांना मार्गदर्शन करतांना तहसीलदार चंद्रे म्हणाले, वसाहतीचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून आवश्यक त्या सुविधांसह दोन महिन्यात वसाहत हस्तांतर करण्यात येईल. एक आदर्श वसाहत निर्माण व्हावी यासाठी प्रकल्पग्रस्तांनी देखील सहकार्य करावे. डॉ.कांतिलाल टाटीया यांनीही मार्गदर्शन केले. दरम्यान, गेल्या दहा वर्षानंतर पुन्हा आपल्याला आपल्या हक्काच गाव व घर मिळणार असल्याने उपस्थित सर्व बाधितांच्या चेह:यावर समाधानाचे भाव उमटले होते. मात्र नर्मदाविकास  विभाग आणि महसूल प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवून वसाहतीसाठीच्या पायाभूत सुविधांबरोबरच शाळा, दवाखाने, अंगणवाडी यांची कामे देखील तातडीने पुर्ण करण्याची मागणी विस्थापीतांनी यावेळी केली.