शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

कांद्याचे दर घसरल्याने शेतक:यांचे झाले वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : नंदुरबार तालुक्यातील पूर्वेकडील गावांमध्ये लागवड केलेल्या कांद्याला विविध राज्यांमध्ये मागणी असते. परंतु अवकाळी पावसामुळे कांदा सडल्याने आंतरराज्य पातळीवर ा कांद्याचे दर घसरले आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांवर संकट ओढवले आहे.नेहमीप्रमाणे नंदुरबार तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये कांद्याची मोठय़ा प्रमाणात  लागवड करण्यात आली. त्यात बलवंड, रजाळे, शनिमांडळ, सैताणे, ऐचाळे, खर्दे, तलावडे, वैंदाणे यासह अन्य गावांचा समावेश होतो. चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून बहुसंख्य शेतक:यांनी  कांदा लागवडीला प्राधान्य दिले.  परंतु अतिवृष्टीनंतर सातत्याने पाऊस सुरू राहिला. शिवाय   परतीचा पाऊस होत नाही,  तोच पुन्हा अवकाळी पाऊसही          झाला. त्यामुळे कांदा सडल्याने  उत्पादनाचे मोठे नुकसान झाले. त्याचा फटका येथील शेतक:यांना  बसला. लागवडीच्या तुलनेत निघालेल्या उत्पादनात 90 टक्के घट झाल्याचे दिसून आले आहेत. तर उर्वरित 10 टक्के कांदा सडल्याने अपेक्षेनुसार  भाव मिळत नाही. परिणामी  लागवड करतांना झालेला खर्च देखील काढणे शेतक:यांना आव्हान ठरले आहे. त्यामुळे कांदा लागवड करणा:या शेतक:यांना सुरुवातीपासूनच कांदा रडवत आल्याची व्यथा नंदुरबार तालुक्यातील शेतक:यांमधून मांडण्यात येत आहे. या भागात लागवड केला जाणा:या कांद्याला संपूर्ण महारराष्ट्रासह इंदौर, अहमदाबाद या ठिकाणी देखील मोठी मागणी असते. इंदौर, अहमदाबाद येथील मार्केटमध्ये सुरुवातीला कांद्याला  पाच हजार 500 र्पयत भाव दिला गेला. यंदा मात्र हे भाव निम्म्याने  घटले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार 500 पासून तीन हजार 500 र्पयतच भाव मिळत आहे. त्यामुळे शेतक:यांना झालेला खर्च काढणे देखील गिकरीचे झाले आहे. केंद्र शासनामार्फत परदेशातून कांद्याची आयात करण्यात आल्यामुळे कांद्याचे भाव घसरल्याचे म्हटले जात आहे. निसर्गाच्या अवकृपेनंतर शासनाकडूनही मदतीसाठी अपेक्षेनुसार कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांना वाली कोणी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसामुळे बलवंड भागातील कापसाचे मोठे नुकसान झाले. बोंडेच सडून गेल्यामुळे कापूस हाती आला नाही, तर हाती आलेला कापूस दर्जेदार नसल्यामुळे त्याला अपेक्षेनुसार भाव मिळत नाही. त्यानंतर या भागातील लागवड झालेल्या कांदा पिकांचे देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कापसानंतर शेतक:यांना कांद्याने देखील रडविले असल्याची भावना वतयक्त करण्यात येत आहे