शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवघ्या दहा हजार रुपये तोळे अर्थात एक हजार रुपये ग्रॅम प्रमाणे सोने मिळत असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवघ्या दहा हजार रुपये तोळे अर्थात एक हजार रुपये ग्रॅम प्रमाणे सोने मिळत असल्याचे अमिष दोघांना चांगलेच महागात पडले. परंतु पोलिसांनी वेळीच सापळा रचून तिघांना अटक करीत नकली सोने विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केल्याने अनेकजण यापुढील फसवणुकीपासून वाचले आहेत. दरम्यान, सोन्याचा हंडा, नकली बिस्कीट, नोटांचा पाऊस अशा अनेक घटना उघडकीस येत असतांनाही अमिषाला बळी पडणाऱ्यांचे डोळे उघडत नाही हे स्पष्टच आहे.गजनान उर्फ कल्पेश उर्फ जानी संतोष भोसले (२३), प्रभू सवसारी चव्हाण (१९) व लुकेश मुकेश पवार (२०) सर्व रा.जामदे, ता.साक्री यांना अटक करण्यात आली आहे.या घटनेची हकीकत अशी, राहुल रोहिदास राठोड, रा.बैलखेडा, ता.सोयगाव यांचे मेव्हुणे जगदीश भिमसिंग पवार, रा.खडकातांडा, ता.एरंडोल यांना त्यांचा गुड्डू नामक मित्राने नंंदुरबारात कमी किंमतीत सोने उपलब्ध असल्याची माहिती दिली. त्याचे सॅम्पल आपण आणले असल्याचे सांगितले. खात्री करण्यासाठी जळगाव येथे गुड्डूची भेट घेवून सॅम्पल पाहिले असता ते खोरे सोन्याचे असल्याचे स्पष्ट झाले. गुड्डू याने नंदुरबार येथील संबधितांशी संपर्क करून देत नंदुरबार येथे सोने घेण्यासाठी बोलविले. २७ जानेवारी रोजी राहुल राठोड, किशोर असे दोघे नंदुरबार येथे आले. त्यांनी संबधितांना फोन केला असता एस.टी.बसने छडवेल येथे येण्यास सांगितले. त्यांतर गजानन नावाच्या व्यक्तीच्या पटेलवाडी येथील घरून सोन्याचे सॅम्पल दिले. सोने असली असल्याचे खात्री झाल्यानंतर हजार रुपये ग्रॅम प्रमाणे चार लाख ९० हजार रुपयांचे सोन्याच्या बांगड्या देण्याचे मान्य झाले. ७ फेब्रुवारी रोजी राहुल राठोड, त्यांचे वडिल रोहिदास राठोड व जळगाव येथील सराफा अनिल सोनार हे खाजगी वाहनाने नंदुरबारातील पटेलवाडी येथे आले. तेंव्हा देखील संशयीतांनी त्यांना सॅम्पल दिले. सोनाराने ते पारखून असली असल्याचे सांगितले. ठरल्याप्रमाणे चार लाख ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या असलेली पिशवी राठोड यांच्या स्वाधिन करण्यात आली. जळगाव येथे पिशवीतील सोने तपासले असता ते नकली असल्याचे स्पष्ट झाल्याने राठोड परिवाराने आपण फसविले गेल्याचे ओळखले. त्यांनी जळगाव येथे पोलिसांना आपबिती सांगितली. पोलिसांनी नंदुरबार पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितल्यावर राहुल राठोड यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून माहिती दिली.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना तक्रारीचे गांभिर्य पाहून लागलीच तपासण करण्याचे निर्देश दिले. गजानन नामक व्यक्तीशी झालेल्या संभाषणातील मोबाईल नंबर पोलिसांनी घेत त्याला ट्रेस केले. हा नंबर नंदुरबारातच कार्यरत असल्याचे लक्षात आल्यावर पाळत ठेवण्यात आली. १३ रोजी जिजामाता महाविद्यालयाजवळील बजाज आॅटो नजीक नंबर कार्यरत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली. बाजुच्या रस्त्यावर दुचाकीजवळ तीनजण उभे असल्याचे लक्षात आले.तक्रारदार यांनी त्यांना ओळखताच एलसीबीच्या पथकाने झडप घालुन तिघांना ताब्यात घेतले.सुरुवातीला तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलीशी हिसका दाखवताच त्यांनी घटनेची कबुली दिली. तिन्ही बेरोजगार असून दिवसभर कुठल्याही नंबरवर डायल करून अनोळखी व्यक्तींशी संपर्क करून त्यांना जाळ्यात ओढण्याचा त्यांचा उद्योग आहे.गुन्हा धुळे जिल्हा हद्दीत घडलेला असतांना हद्दीचा विचार न करता तक्रारदाराला प्रथम न्याय देण्याचा उद्देशाने नंदुरबार एलसीबीने तात्काळ गुन्हेगारांना अटक केली. आरोपी, मुद्देमाल निजामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार सजन वाघ, बापू बागुल, विशाल नागरे, मोहन ढमढेरे, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली.जामदे भागात यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. मांडूळ, नकली सोने, पैशांचा पाऊस पाडणे याचे अमिष दाखवून अनेकांना लुबाडण्यात आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आवाहन करून सोन्याचा हंडा, नागमनी, जादूचा ग्लास, नोटांचा पाऊस, नोटा दुप्पट करून देणे आदींबाबत अमिष दाखविण्याचा कुणी प्रयत्न केल्यास थेट स्थानिक पोलीस किंवा एलसीबीच्या पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पंडित यांनी केले आहे.