शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
4
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
6
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
7
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
8
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
9
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
10
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
11
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
12
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
13
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
14
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
15
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
16
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
17
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

जामियातर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना दिल्या सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ हे सर्व विद्यार्थी परराज्यातील रहिवासी असून लॉकडाऊन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गावी रवाना करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे़ तूर्तास येथे थांबलेल्या या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक संस्थेने स्वखर्चाने तैनात केली आहेत़अक्कलकुवा येथील जामिया संस्थेत मोठ्या संख्येने देश तसेच विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात़ यंदाही सुमारे १२ हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आले होते़ एप्रिल पूर्वी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपणार असल्याने बहुतांश विद्यार्थी मार्चच्या मध्यात घराकडे रवाना झाले होते़ सुमारे सहा हजार विद्यार्थी घराकडे गेले असताना २२ मार्चनंतर लॉकडाऊनचा कालावधी सुरु झाल्याने बहुतांश विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ या विद्यार्थ्यांचे रेल्वे आणि बसचे रिझर्व्हेशन ३ एप्रिल रोजी होते़ परंतू लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी सध्या जामिया वसतीगृहातच अडकून पडले आहेत़ मंगळवारी या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था तसेच जामिया संस्थेतील सोयी सुविधांचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला़ यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे, डॉ़ गयधर, डॉ़ प्रदीप गोयल, डॉ़ स्वप्नील चौधरी, आरोग्य सहायक अभितन पावरा यांच्यासह आरोग्य सहायक व सेवक उपस्थित होते़ त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती संकलित करण्यात आली़ डॉ़ मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती देत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनेटायझर व हँडवॉशचा वापर करण्याच्या सूचना केल्या़ जामिया अहमद गरीब युनानी रुग्णालयाचे संचालक मंडळ व वैद्यकीय अधिकारी भेटीदरम्यान उपस्थित होते़ येथील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत गेल्या १५ दिवसांपासून सूचना करण्यात येत आहे़सद्यस्थितीत मदरशात ६ हजार ४८९ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ हे विद्यार्थी सध्या वसतीगृहात निवासी म्हणून आहेत़ सर्वाधिक ३ हजार ३२४ विद्यार्थी हे बिहार राज्यातील आहेत़ महाराष्ट्र ८४१, आसाम ८८३, पश्चिम बंगाल ३७७, झारखंड ३५०, मध्यप्रदेश १३५, उत्तर प्रदेश १२०, गुजरात ७५, मणिपूर ७२, जम्मू आणि काश्मिर ६४, कर्नाटक ६४, हरीयाणा ५५, राजस्थान ४६ दिल्ली ३६, आंध्रप्रदेश १३, मेघालय १२, ओरिसा ८, हिमाचल प्रदेश ४, तेलंगणा ४, गोवा २ तर पंजाब राज्यातील एक विद्यार्थी येथे थांबून असल्याची माहिती आहे़येथे मुक्कामी असलेल्या सर्व सहा हजार विद्यार्थ्यांचे त्यांच्या गावी परत जाण्यासाठी ३ एप्रिल रोजी रेल्वे आणि बसेसचे आरक्षण होते़ तशी तरतूद त्यांनी आधीच करुन ठेवली होती़ परंतू लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि बस वाहतूक बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना आता येथे थांबावे लागत आहे़ आवारात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार परिसर पूर्णपणे निर्जंतुक करण्यात आला आहे़ तसेच संस्थेने कर्मचारी नियुक्त करुन स्वच्छता कायम ठेवली आहे़ औषध फवारणीसह विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्यावर सॅनेटायझर शिंपडण्यासह इतर अनेक सुविधा दिल्या जात आहेत़ विद्यार्थी एकमेकांपासून लांब राहतील यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने दर दिवशी मास्कचा वापर करण्यासह विविध विषयांवर शिक्षक मार्गदर्शन करत आहेत़