शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जामियातर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना दिल्या सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ हे सर्व विद्यार्थी परराज्यातील रहिवासी असून लॉकडाऊन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गावी रवाना करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे़ तूर्तास येथे थांबलेल्या या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक संस्थेने स्वखर्चाने तैनात केली आहेत़अक्कलकुवा येथील जामिया संस्थेत मोठ्या संख्येने देश तसेच विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात़ यंदाही सुमारे १२ हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आले होते़ एप्रिल पूर्वी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपणार असल्याने बहुतांश विद्यार्थी मार्चच्या मध्यात घराकडे रवाना झाले होते़ सुमारे सहा हजार विद्यार्थी घराकडे गेले असताना २२ मार्चनंतर लॉकडाऊनचा कालावधी सुरु झाल्याने बहुतांश विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ या विद्यार्थ्यांचे रेल्वे आणि बसचे रिझर्व्हेशन ३ एप्रिल रोजी होते़ परंतू लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी सध्या जामिया वसतीगृहातच अडकून पडले आहेत़ मंगळवारी या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था तसेच जामिया संस्थेतील सोयी सुविधांचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला़ यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे, डॉ़ गयधर, डॉ़ प्रदीप गोयल, डॉ़ स्वप्नील चौधरी, आरोग्य सहायक अभितन पावरा यांच्यासह आरोग्य सहायक व सेवक उपस्थित होते़ त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती संकलित करण्यात आली़ डॉ़ मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती देत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनेटायझर व हँडवॉशचा वापर करण्याच्या सूचना केल्या़ जामिया अहमद गरीब युनानी रुग्णालयाचे संचालक मंडळ व वैद्यकीय अधिकारी भेटीदरम्यान उपस्थित होते़ येथील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत गेल्या १५ दिवसांपासून सूचना करण्यात येत आहे़सद्यस्थितीत मदरशात ६ हजार ४८९ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ हे विद्यार्थी सध्या वसतीगृहात निवासी म्हणून आहेत़ सर्वाधिक ३ हजार ३२४ विद्यार्थी हे बिहार राज्यातील आहेत़ महाराष्ट्र ८४१, आसाम ८८३, पश्चिम बंगाल ३७७, झारखंड ३५०, मध्यप्रदेश १३५, उत्तर प्रदेश १२०, गुजरात ७५, मणिपूर ७२, जम्मू आणि काश्मिर ६४, कर्नाटक ६४, हरीयाणा ५५, राजस्थान ४६ दिल्ली ३६, आंध्रप्रदेश १३, मेघालय १२, ओरिसा ८, हिमाचल प्रदेश ४, तेलंगणा ४, गोवा २ तर पंजाब राज्यातील एक विद्यार्थी येथे थांबून असल्याची माहिती आहे़येथे मुक्कामी असलेल्या सर्व सहा हजार विद्यार्थ्यांचे त्यांच्या गावी परत जाण्यासाठी ३ एप्रिल रोजी रेल्वे आणि बसेसचे आरक्षण होते़ तशी तरतूद त्यांनी आधीच करुन ठेवली होती़ परंतू लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि बस वाहतूक बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना आता येथे थांबावे लागत आहे़ आवारात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार परिसर पूर्णपणे निर्जंतुक करण्यात आला आहे़ तसेच संस्थेने कर्मचारी नियुक्त करुन स्वच्छता कायम ठेवली आहे़ औषध फवारणीसह विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्यावर सॅनेटायझर शिंपडण्यासह इतर अनेक सुविधा दिल्या जात आहेत़ विद्यार्थी एकमेकांपासून लांब राहतील यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने दर दिवशी मास्कचा वापर करण्यासह विविध विषयांवर शिक्षक मार्गदर्शन करत आहेत़