शहरं
Join us  
Trending Stories
1
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
2
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
3
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
4
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
5
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
6
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
7
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
8
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
9
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
10
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
11
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
12
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
13
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
14
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
15
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
16
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
17
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
18
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?
19
IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा
20
या देशात जन्माला येणार जगातील 50% मुलं, कमी होऊ लागणार भारताची लोकसंख्या; टेन्शन वाढवणारा आहे तज्ज्ञांचा अनुमान

बेज्याआंबा व भट्टीपाड्याला असुविधेचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील गौऱ्याच्या बेज्याआंबा व भट्टीपाडा या दोन्ही पाड्यांच्या चौफेर गाव पाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दुर्गम भागातील गौऱ्याच्या बेज्याआंबा व भट्टीपाडा या दोन्ही पाड्यांच्या चौफेर गाव पाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले आहेत, परंतु हेच दोनपाडे रस्ते विकासापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे तेथे अन्य विकासकामेही होऊ शकली नाही. पायाभूत सुविधाही मिळत नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे.धडगाव तालुक्यातील गौºया हे तळोदा ते धडगाव या मुख्य रस्त्यावरील गाव असून १३ पाड्यांमध्ये विभागले आहे. तसे हे गाव विविध योजना व सुविधांंबाबत नेहमीच चर्चेत राहिले असून बोदलापाड्याच्या माध्यमातून प्रकाशात आले. बोदलापाड्याच्या काही समस्या कायम असतांनाच पुन्हा भट्टीपाडा व बेज्याआंबापाडा या दोन पाड्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे.भट्टीपाड्यापर्यंत जाण्यासाठी सन २००० मध्ये रस्ता मंजूर करीत कामही करण्यात आले. परंतु वरवरच्या खडीकरणचे काम वगळता या रस्त्यावर अन्य कुठलेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे हा रस्ता कुठल्याही वाहतुकीसाठी अनुकुल ठरत नाही. रस्त्याचे काम होऊन २० वर्षांचा कालावधी उलटला, त्यामुळे सद्यस्थितीत हा रस्ता पायवाटेपेक्षा अधिक खराब झाला आहे. कुटबारापासून झालेल्या या रस्त्याची दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कुठल्याही योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे म्हटले जात आहे.या दोन्ही पाड्याच्या चौफेरील गौºया, चुलवड, बिजरी, काकरपाटी व सिसा या गावांपर्यंत रस्ते पोहोचले आहे. या पाजही गावांना लागून असलेल्या या दोन पाड्यांपर्यंतच रस्ता पोहोचला नसल्याने शोकांतिका व्यक्त होत आहे.नागरिकांना बिजरी, बियारावड, काकरपाटी व चुलवड येथून वाहन उपलब्ध होते. परंतु त्यांना प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी चार किलोमिटर पायपीट करावी लागते.पाण्याची सुविधा असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी ठरत नाही. त्यामुळे नागरिकांना उदय नदीवरुन पिण्यासाठी पाणी घ्यावे लागते. हे पाणी पितांना शुद्धतेच्या दृष्टीने शाश्वत ठरत नाही.भट्टीपाड्याची लेकसंख्या ५०० तर बेज्याआंबापाड्यात ९ कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांना विकास प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.