शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

केळीच्या रोपांसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक, ब्राह्मणपुरी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या एप्रिल व मे महिन्यात खरिपाची तयारी करून शेतकरी वर्गाकडून केळी, पपईची ...

याबाबत अधिक माहिती अशी की, ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या एप्रिल व मे महिन्यात खरिपाची तयारी करून शेतकरी वर्गाकडून केळी, पपईची लागवड करण्यात आली आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी लागवड करण्यासाठी विविध एजन्सींमार्फत रोपांची ऑर्डर दिली होती. काही शेतकऱ्यांना मागणीनुसार रोपे उपलब्ध होऊन त्यांनी रोपांची लागवड केली आहे. परंतु ब्राह्मणपुरी येथील शेतकरी मधुकर दशरथ पाटील यांनी गेल्या ६ मे रोजी शहादा येथील पांडुरंग ॲग्रो एजन्सीमार्फत केळीच्या पाच हजार रोपांची मागणी केली होती. यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिरोप १५ रुपयाप्रमाणे ७५ हजार रुपयेदेखील जमा केले होते. पांडुरंग एजन्सीतर्फे संबंधित शेतकऱ्याला २५ मे दरम्यान केळीची रोपे उपलब्ध करण्यात येतील व आपली लागवड वेळेवर हाेईल, असे सांगण्यात आले. २५ मे रोजी संबंधित शेतकऱ्यांनी केळी रोपांविषयी विचारणा केली असता, संबंधित एजन्सीतर्फे टाळाटाळ होत होती. महिना उलटूनही रोपे उपलब्ध होत नसल्याने रोपांची लागवड करायची कधी? असा प्रश्न उपस्थित होत असून, उशिरा लागवड झाल्याने केळी पिकाला योग्य भाव मिळणार नसल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

एजन्सीमालक आऊट ऑफ कव्हरेज

शेतकरी मधुकर दशरथ पाटील यांनी संबंधित एजन्सी मालकाला केळी रोपांसाठी संपर्क केला असता, फोन उचलत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे संबंधित एजन्सी मालकाने शेतकऱ्यांना वेळेवर रोपे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वेळेवर लागवड होण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

केळी लागवडीसाठी एप्रिल व मे महिना पोषक वातावरण असते. यासाठी शेतकरी वर्ग कर्ज घेऊन केळी रोप, खत, ठिबक सिंचन आदींच्या तयारीत असतात व लागवड करतात; परंतु काही ॲग्रो एजन्सींकडून शेतकऱ्यांना वेळेवर रोपे उपलब्ध न करीत असल्याने शेतकऱ्यांना केळी रोपांची लागवड उशिराने करावी लागते, तर काही शेतकऱ्यांना इतर पीक लागवडीचा आधार घ्यावा लागतो. यासाठी संबंधित कंपन्यांनी एजन्सीमार्फत शेतकऱ्यांना रोपे वेळेवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पांडुरंग ॲग्रो एजन्सीला केळी रोपांची ऑर्डर देण्यात आली होती. त्यासाठी एकूण ७५ हजार रोख देण्यात आले होते. एजन्सीमार्फत २५ मे दरम्यान रोपे उपलब्ध होणार होती. परंतु महिना उलटूनदेखील रोपे उपलब्ध होत नसल्याने केळी रोपांची लागवड करायची तरी कधी? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे.

- मधुकर दशरथ पाटील, शेतकरी, ब्राह्मणपुरी, ता. शहादा