शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील केळीची परदेशात निर्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

शहादा तालुक्‍यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील असून विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादित झालेल्या शेतमालाचा सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच पाडळदा ...

शहादा तालुक्‍यात बहुतांश शेतकरी प्रयोगशील असून विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादित झालेल्या शेतमालाचा सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. त्यातच पाडळदा येथील सेवानिवृत्त उपअभियंता शरद गोविंद पाटील यांनी सेवानिवृत्तीनंतर वडिलोपार्जित शेतीचा विचार केला. परंतु पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे त्या ज्ञानाचा वापर व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन पाच वर्षांपूर्वी शेती कसणे सुरू केले. त्यात त्यांनी अवगे-जुनवणे शिवारात असलेल्या एकूण क्षेत्रापैकी पाच एकरात जी-९ वाणाच्या सहा हजार केळीच्या रोपांची ठिंबक सिंचनावर लागवड केली. लागवडीनंतर पुरेसे शेतीचे ज्ञान नसल्याने तज्ज्ञांकडून माहिती मिळवण्यात कोणताही कमीपणा मनात ठेवला नाही. विविध आधुनिक पद्धतीचा अवलंब करून केळीची बाग फुलविली. ही बाग पाहण्यासाठी अनेकांनी भेटी दिल्या तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या १२०० रुपयांहून अधिक प्रती क्विंटल दर मिळत असून केळीचा दर्जा पाहून अधिकाधिक भाव मिळत असतो. परिसरात असलेल्या लोकल मार्केटपेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यालाही दोन पैसे जास्त मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. केळीच्या दर्जानुसार केळीची तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून वाहन भरले जाते. थेट मुंबईला रवाना झाल्यानंतर ३० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. त्यानंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरुन जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका सिझनला तालुक्यातून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे ७०० ते ८०० कंटेनर केळी आखाती देशात पाठवली जातात. शरद पाटील यांनी ऊस, पपई, मिरची या पिकासोबत पाच एकरात लागवड केलेल्या केळीच्या बागेकडे विशेष लक्ष देत रोपांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विंट्रेक्स क्रॉप केअर या कंपनीचे नंदकुमार पाटील, विनायक धाबुगडे यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपायांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली. आजपर्यंत लाखो रुपयांची केळी निर्यात केली असून अजून मोठ्या प्रमाणावर केळी बागेत शिल्लक आहे. शेतीत नवखे असूनही आखाती देशात केळी जात आहे, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे पाटील सांगतात.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन प्रयोग करुन शेती कसल्यास आपल्या मालाची परदेशात मागणी होते. त्यातून निश्चितच शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतात. भविष्यातही वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी शेती करण्याचा मानस आहे.

-शरद गोविंद पाटील, सेवानिवृत्त उपअभियंता, शहादा