शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

‘यंग ब्रिगेड’ कडून जिल्हा परिषदेला अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:44 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकविसीच्या जिल्हा परिषदेत तिशीची तरुणाई अर्थात ‘यंग ब्रिगेड’ या पंचवार्षीकला भाव ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकविसीच्या जिल्हा परिषदेत तिशीची तरुणाई अर्थात ‘यंग ब्रिगेड’ या पंचवार्षीकला भाव खावून जाणार आहे. ५६ पैकी तब्बल १९ सदस्य हे तिशीच्या घरातील आहेत. तरुणाईची ही फौज जिल्हा विकासात मोलाची भर घालण्यासाठी अभ्यासपूर्ण कामकाज जिल्हा परिषदेत करेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.जिल्हा परिषद स्थापन होऊन २१ वर्ष झाले आहेत. २१ वर्षातील ही पाचवी निवडणूक आहे. आतापर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत अनेक ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या कार्यक्षमतेने जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभाग घेत जिल्हा विकासात मोलाची भर घातली आहे. यंदाच्या निवडणुकीत ७० टक्के निवडून आलेले सदस्य हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची पायरी चढणार आहेत. त्यात ३५ टक्के सदस्य हे अवघ्या ३० ते ३५ वयाचे आहेत. आता या सदस्यांकडून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.तरुण व उच्च शिक्षीत देखीलजिल्हा परिषदेत जे तरूण सदस्य निवडून आले आहेत त्यापैकी ९० टक्के सदस्य हे उच्च शिक्षीत आहेत. किमान पदवीपर्यंतचे शिक्षण काहींनी घेतलेले आहे. त्यामुळे तरुण आणि शिक्षण त्यात राजकारण असा त्रिवेणी संगम या सदस्यांच्या बाबतीत असून त्यांचा त्या त्या क्षेत्रातील अभ्यास जिल्हा परिषद चालवितांना संबधीत सत्ताधारींना मोलाची मदत करणारा ठरणार आहे.हे आहेत तरुण सदस्यनिवडून आलेल्या तरूण सदस्यांमध्ये कोपर्ली गटातील अ‍ॅड.राम रघुवंशी, उमराण गटातील अजीत नाईक, भरडू गटातील मधुकर नाईक, रायसिंगपूर गटातील शंकर पाडवी, तोरणमाळ गटातील गणेश पराडके, नांदर्खे गटातील अर्चना गावीत, अमोणी गटातील अ‍ॅड.सिमा वळवी, धानोरा गटातील राजश्री गावीत, म्हसावद गटातील अभिजीत पाटील, आष्टे गटातील देवमन पवार, सुलतानपूर गटातील कविता पावरा, खेडदिगर गटातील वंदना पटले, मोहिदेतर्फे शहादा गटातील जिजाबाई ठाकरे, खापर गटातील भूषण कामे, आमलाड गटातील पार्वती गावीत, अक्कलकुवा गटातील कपील चौधरी, गंगापूर गटातील जितेंद्र पाडवी, रोषमाळ खुर्द गटातील संगिता पावरा आणि बोरद गटातील सुनिता पवार यांचा समावेश करता येईल.अनेकांना राजकीय पार्श्वभूमीनिवडून आलेल्या या तरुण सदस्यांपैकी अनेकांना राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. कुणाचे वडील, कुणाचे आजोबा, कुणाचे काका तर कुणाचे काका हे राजकारणातील सक्रीय नेते आहेत. तर काहींना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना निवडून आलेले आहेत.राजकीय पार्श्वभूमी असो किंवा नसो, परंतु तरुणाईचे सळसळते रक्त आता विकास कामांमध्ये सहभाग घेणार आहे. ग्रामिण भागातील प्रश्न मांडणार आहे. जे प्रश्न समजणार नाही ते समजून घेत सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या यंग ब्रिगेडकरून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.जिल्हा परिषदेत अनेकजण प्रथमच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना ग्रामविकासाच्या योजना, जिल्हा परिषदेचे कामकाज याची माहिती देण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आयोजित करणे अपेक्षीत आहे. तसे झाल्यास त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजात सहभाग घेता येईल. गेल्या काही पंचवार्षिकमधील सदस्यांना कामकाजाची माहिती, योजनांची माहिती नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहात कुणी फारसे प्रश्न उपस्थित करीत नव्हते. परिणामी नेहमीचेच चेहरे प्रश्न उपस्थित करीत असल्याचे दिसून येत होते. यावेळी तसे होऊ नये, सर्वच सदस्यांनी विशेषत: तरुण सदस्यांनी कामकाजात सहभाग घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अशा सदस्यांना प्रशिक्षण करणे आवश्यक आहे.