शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

आडवळणावर पडणाऱ्या पावलांना विकासाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विकास कामे व योजनांना नेहमीच कात्री लागल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या वाट्याला डोंगर-उतारावरच्या पायवाटाच आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विकास कामे व योजनांना नेहमीच कात्री लागल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या वाट्याला डोंगर-उतारावरच्या पायवाटाच आल्या. सर्वत्र आधुनिकता व डिजीटल दुनियेचा डिंडोरा पिटला जात असला काही भाग अथवा घटक अपवाद ठरतात, हा अपवाद या भागात प्रकर्षाने जाणवतो. वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे ठिकठिकाणी आजही झोळीचा अवलंब केला जात आहे. हे कळवट वास्तव तेथील नागरिक अनुभवत आहे.विकासाच्या दृष्टीने नेहमीच उपेक्षित राहिलेल्या दुर्गम भागाकडे शासन यंत्रणा लक्ष देत नाही. त्यामुळे हा भाग विकासाऐवजी अधोगतीकडेच वाटचाल करीत आहे. विकासासाठी योजना आखल्या जात असल्या तरी योजना राबवणाºया यंत्रणेच्या उदासिन कारभारामुळे योजनांची नेमकी अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे तेथी नागरिकांच्या वाट्याला पायपीटच आली आहे.धडगाव तालुक्यातील कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पौला येथे आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता बनला असला तरी तेथे वाहतुकीच्या सविधाच सुरू झाल्या नाही. त्यामुळे तेथी नागरिकांना नर्मदा काठापासून कात्रीपर्यंत पायीच प्रवास करावा लागत आहे. पौला येथीलच गारद्या तडवी यांच्या परिवारातील रुग्णाला उपचारासाठी धडगाव येथे नेले जात होते. परंतु वाहतुकीची सुविधाच नसल्यामुळे रुग्णाला नेण्यासाठी पाच जणांची आवश्यकता भासली. पौलापासून कात्रीपर्यंत १४ ते १५ किलोमिटरपेक्षा अधिक अंतर आहे. रुग्णाला कात्रीपर्यंत आणल्यानंतरही वाहन मिळेल याची शाश्वतीच नसल्यामुळे सोबत अनेक जण आले होते. या भागाचा सर्वांगिण विकास व तेथील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य पवाहात आरणण्यासाठी शासनाने विशेष योजना आखल्या पाहिजे. योजनांची प्रतीपूर्ती होईपर्यंत शासनाकडून तेथे नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जीवन जगणे सोपे व्हावे, म्हणून आधुनिकतेतील साधनांचा वापर करण्यात येत आहे. परंतु दुर्गम भागातील या नागरिकांच्या नशिबात ही बाब येऊ शकली नाही. रुग्ण व त्याच्या पालकांच्या सविधेसाठी १०८ ही रुग्णवाहतुक सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु पौला येथे संपर्काची कुठलीही साधने पोहोचली नसल्यामुळे तेथील नागरिक रुग्णवाहिकेसाठी संपर्कच करु शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर बांबूच्या झोळीशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही.