शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जातीवादी विचारांच्या सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:32 IST

पीपल्स रिपब्लीकन पार्टी : शहादा येथील जाहीर सभेत जोगेंद्र कवाडेंचा इशारा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : देशात भाजपाचे अर्थात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्या दिवसापासून 130 कोटी जनतेचा उन्हाळा तेव्हापासून सुरु झाला आहे. शेतक:यांचे, गरीबांचे वाटोळे करणारे, जातीवादी शक्ती निर्माण करणा:या संघ विचाराच्या सरकारला हद्दपार करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले. पीपल्स रिपब्लीकन पार्टी पक्षाच्या कार्यकत्र्याचा मेळावा व जाहीर सभा शहरातील जनता चौकात रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यात आमदार कवाडे बोलत होते. या वेळी प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आथोते, पक्षाचे गुजरात प्रमुख सुरेश सोनवणे, प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, मराठवाडा विभाग प्रमुख अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, शशिकांत उनवणे, सचिन उनवाने, बाबू ढवळे, परशू करनकाळ, नगरसेविका पुष्पा सोनवणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्की मोरे आदी उपस्थित होते. या वेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बाबासाहेबांच्या देशात शेतक:यांना कर्जामुळे आत्महत्या करावी लागते हे मोठे दुर्दैव आहे. आदिवासी दलित बहुजनांवर अत्याचार सुरु आहेत. देशात भगव्यांचे व ब्राrाणवाद्यांचे सरकार आहे. ज्यांनी जागतिक क्रांती केली अशा क्रांतीकारकांचे, राष्ट्रपुरुषांचे पुतळे उखडून टाकले. देश कोणत्या पातळीवर चाललेला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वाना सोबत घेऊन न्याय दिला होता. मराठी राज्याची स्थापना केली होती तेव्हा संभाजी भिडे, मोहन भागवत होते का? आता आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढणारे नेते जन्माला आले आहेत. भाजपा व संघ विचारसरणीच्या नेत्यांनी दफण झालेली ब्राrाणवादी भुते बाहेर काढली हे बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. गोविंद गायकवाड यांची भिमाकोरेगाव येथील समाधी उद्ध्वस्त करुन सरकार पुरस्कृत आतंकवाद चालवलेला आहे. या देशातील अंबानी-अदाणीला न्याय मिळतो मात्र शेतक:याला कर्जमाफीसाठी न्याय मिळत नाही. निरव, ललीत मोदी, विजय माल्या देशातील पैसा घेऊन पळून गेले  त्यांना सरकार आणू शकत नाही          परंतु शेतक:यांची संपती जप्त केली जाते. नरेंद्र मोदी हे देशाचे की जगाचे पंतप्रधान आहेत हे कळत  नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.जगन सोनवणे म्हणाले की, आम्ही जातीवादी शक्तीला थारा देत नाही, देशात दंगली घडविणा:यांना साथ दिली जाणार नाही. हिंदुत्व व ब्राrाणीकरण करण्याचे षड्यंत्र राज्यकत्र्यानी चालविलेले आहे. कार्यकत्र्यावर पडद्यामागचे नेते खोटे गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे सांगितले.अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, सचिन उणवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांनी केले. सभेसाठी जितेंद्र शिरसाठ, इमरान पठाण, कमलेश मोरे, लकी मोरे, इकबाल शेख, बाबू ढवळे  यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.