शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जातीवादी विचारांच्या सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:32 IST

पीपल्स रिपब्लीकन पार्टी : शहादा येथील जाहीर सभेत जोगेंद्र कवाडेंचा इशारा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : देशात भाजपाचे अर्थात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्या दिवसापासून 130 कोटी जनतेचा उन्हाळा तेव्हापासून सुरु झाला आहे. शेतक:यांचे, गरीबांचे वाटोळे करणारे, जातीवादी शक्ती निर्माण करणा:या संघ विचाराच्या सरकारला हद्दपार करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे, असे आवाहन पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे यांनी केले. पीपल्स रिपब्लीकन पार्टी पक्षाच्या कार्यकत्र्याचा मेळावा व जाहीर सभा शहरातील जनता चौकात रविवारी आयोजित करण्यात आली होती. त्यात आमदार कवाडे बोलत होते. या वेळी प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आथोते, पक्षाचे गुजरात प्रमुख सुरेश सोनवणे, प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, मराठवाडा विभाग प्रमुख अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, शशिकांत उनवणे, सचिन उनवाने, बाबू ढवळे, परशू करनकाळ, नगरसेविका पुष्पा सोनवणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्की मोरे आदी उपस्थित होते. या वेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बाबासाहेबांच्या देशात शेतक:यांना कर्जामुळे आत्महत्या करावी लागते हे मोठे दुर्दैव आहे. आदिवासी दलित बहुजनांवर अत्याचार सुरु आहेत. देशात भगव्यांचे व ब्राrाणवाद्यांचे सरकार आहे. ज्यांनी जागतिक क्रांती केली अशा क्रांतीकारकांचे, राष्ट्रपुरुषांचे पुतळे उखडून टाकले. देश कोणत्या पातळीवर चाललेला आहे याचा विचार करण्याची गरज आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वाना सोबत घेऊन न्याय दिला होता. मराठी राज्याची स्थापना केली होती तेव्हा संभाजी भिडे, मोहन भागवत होते का? आता आयत्या पिठावर रेघोटय़ा ओढणारे नेते जन्माला आले आहेत. भाजपा व संघ विचारसरणीच्या नेत्यांनी दफण झालेली ब्राrाणवादी भुते बाहेर काढली हे बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. गोविंद गायकवाड यांची भिमाकोरेगाव येथील समाधी उद्ध्वस्त करुन सरकार पुरस्कृत आतंकवाद चालवलेला आहे. या देशातील अंबानी-अदाणीला न्याय मिळतो मात्र शेतक:याला कर्जमाफीसाठी न्याय मिळत नाही. निरव, ललीत मोदी, विजय माल्या देशातील पैसा घेऊन पळून गेले  त्यांना सरकार आणू शकत नाही          परंतु शेतक:यांची संपती जप्त केली जाते. नरेंद्र मोदी हे देशाचे की जगाचे पंतप्रधान आहेत हे कळत  नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.जगन सोनवणे म्हणाले की, आम्ही जातीवादी शक्तीला थारा देत नाही, देशात दंगली घडविणा:यांना साथ दिली जाणार नाही. हिंदुत्व व ब्राrाणीकरण करण्याचे षड्यंत्र राज्यकत्र्यानी चालविलेले आहे. कार्यकत्र्यावर पडद्यामागचे नेते खोटे गुन्हा दाखल करण्याचे काम करीत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असे सांगितले.अनिल कुरुकमारे, भगवान आढाव, पुरुषोत्तम गरुड, सचिन उणवणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांनी केले. सभेसाठी जितेंद्र शिरसाठ, इमरान पठाण, कमलेश मोरे, लकी मोरे, इकबाल शेख, बाबू ढवळे  यांच्यासह कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.