शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे धुळे, नाशिक शिरपूर, त्र्यंबकेश्वरला परीक्षा केंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ठिकाणी राहणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केद्रांत जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी.तर्फे देण्यात आली.वाहतूक सेवेअभावी विद्यार्थी सीईटी सामाईक परिक्षेला मुकणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने एस.टी.महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ ते ९ आॅक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी जादा बसेस सोडल्या जातील. नंदुरबार जिल्ह्यातून एकुण पाच हजार २४७ विद्यार्थी सीईटीसाठी बसले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे धुळे, शिरपूर व नाशिक येथे आहेत. त्यामुळे त्या त्या दिवशी जादा बसेस सोडल्या जातील .१ आॅक्टोबर रोजी धुळे केद्रावर २८२, नाशिक ३११तर त्र्यंबकेश्वर केंद्रावर ७ परिक्षार्र्थींची सोय करण्यात आली आहे. २ रोजी धुळे येथे ३७४, नाशिक येथे ३६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १३ परिक्षार्थी, ४ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३३८, नाशिक येथे २८१ तर त्र्यंबकेश्वर येथे १६. ६ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३२२, शिरपूर येथे ३९, नाशिक येथे ३०५ तर त्र्यंबकेश्वर येथे १६ परिक्षार्थी. ७ आॅक्टोबर रोजी धुळे येथे १३२, शिरपूर येथे ४१, नाशिक येथे ३०८ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्थी. ८ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २५४, शिरपूर येथे ३८, नाशिक येथे ३०४ तर त्र्यंबकेश्वर येथे १२ परिक्षार्थी. ९ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २६९, शिरपूर येथे ३६, नाशिक येथे ४६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्र्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.एकुण धुळे येथे २,३५०, नाशिक येथे २,६३८, शिरपूर येथे १५५ तर त्र्यंबकेश्वर येथे १०४ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील चारही आगारातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या बसेसचा फायदा घ्यावा असे आवाहन धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केले आहे.

कोरोनामुळे यंदा जिल्ह्यातील परीक्षा केंद्र यंदा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे, शिरपूर, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावी यासाठी एस.टी.महामंडळातर्फे १ ते ९ आॅक्टोबरपर्यंत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.