शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे धुळे, नाशिक शिरपूर, त्र्यंबकेश्वरला परीक्षा केंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ठिकाणी राहणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केद्रांत जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी.तर्फे देण्यात आली.वाहतूक सेवेअभावी विद्यार्थी सीईटी सामाईक परिक्षेला मुकणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने एस.टी.महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ ते ९ आॅक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी जादा बसेस सोडल्या जातील. नंदुरबार जिल्ह्यातून एकुण पाच हजार २४७ विद्यार्थी सीईटीसाठी बसले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे धुळे, शिरपूर व नाशिक येथे आहेत. त्यामुळे त्या त्या दिवशी जादा बसेस सोडल्या जातील .१ आॅक्टोबर रोजी धुळे केद्रावर २८२, नाशिक ३११तर त्र्यंबकेश्वर केंद्रावर ७ परिक्षार्र्थींची सोय करण्यात आली आहे. २ रोजी धुळे येथे ३७४, नाशिक येथे ३६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १३ परिक्षार्थी, ४ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३३८, नाशिक येथे २८१ तर त्र्यंबकेश्वर येथे १६. ६ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३२२, शिरपूर येथे ३९, नाशिक येथे ३०५ तर त्र्यंबकेश्वर येथे १६ परिक्षार्थी. ७ आॅक्टोबर रोजी धुळे येथे १३२, शिरपूर येथे ४१, नाशिक येथे ३०८ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्थी. ८ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २५४, शिरपूर येथे ३८, नाशिक येथे ३०४ तर त्र्यंबकेश्वर येथे १२ परिक्षार्थी. ९ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २६९, शिरपूर येथे ३६, नाशिक येथे ४६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्र्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.एकुण धुळे येथे २,३५०, नाशिक येथे २,६३८, शिरपूर येथे १५५ तर त्र्यंबकेश्वर येथे १०४ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील चारही आगारातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या बसेसचा फायदा घ्यावा असे आवाहन धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केले आहे.

कोरोनामुळे यंदा जिल्ह्यातील परीक्षा केंद्र यंदा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे, शिरपूर, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावी यासाठी एस.टी.महामंडळातर्फे १ ते ९ आॅक्टोबरपर्यंत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.