शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे धुळे, नाशिक शिरपूर, त्र्यंबकेश्वरला परीक्षा केंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाच हजारापेक्षा अधीक विद्यार्थी यंदा सीईटी परीक्षा देणार आहेत. त्यांचे केंद्र धुळेसह इतर ठिकाणी राहणार असल्याने अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केद्रांत जाण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी.तर्फे देण्यात आली.वाहतूक सेवेअभावी विद्यार्थी सीईटी सामाईक परिक्षेला मुकणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने एस.टी.महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ ते ९ आॅक्टोबर दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी जादा बसेस सोडल्या जातील. नंदुरबार जिल्ह्यातून एकुण पाच हजार २४७ विद्यार्थी सीईटीसाठी बसले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे धुळे, शिरपूर व नाशिक येथे आहेत. त्यामुळे त्या त्या दिवशी जादा बसेस सोडल्या जातील .१ आॅक्टोबर रोजी धुळे केद्रावर २८२, नाशिक ३११तर त्र्यंबकेश्वर केंद्रावर ७ परिक्षार्र्थींची सोय करण्यात आली आहे. २ रोजी धुळे येथे ३७४, नाशिक येथे ३६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १३ परिक्षार्थी, ४ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३३८, नाशिक येथे २८१ तर त्र्यंबकेश्वर येथे १६. ६ आॅक्टोबर रोजी धुळे येथे ३२२, शिरपूर येथे ३९, नाशिक येथे ३०५ तर त्र्यंबकेश्वर येथे १६ परिक्षार्थी. ७ आॅक्टोबर रोजी धुळे येथे १३२, शिरपूर येथे ४१, नाशिक येथे ३०८ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्थी. ८ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २५४, शिरपूर येथे ३८, नाशिक येथे ३०४ तर त्र्यंबकेश्वर येथे १२ परिक्षार्थी. ९ आॅक्टोबर रोजी धुळे येथे २६९, शिरपूर येथे ३६, नाशिक येथे ४६१ तर त्र्यंबकेश्वर येथे १५ परिक्षार्र्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.एकुण धुळे येथे २,३५०, नाशिक येथे २,६३८, शिरपूर येथे १५५ तर त्र्यंबकेश्वर येथे १०४ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील चारही आगारातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या बसेसचा फायदा घ्यावा असे आवाहन धुळे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केले आहे.

कोरोनामुळे यंदा जिल्ह्यातील परीक्षा केंद्र यंदा रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे, शिरपूर, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावी यासाठी एस.टी.महामंडळातर्फे १ ते ९ आॅक्टोबरपर्यंत जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.