शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढण्यासाठी माजी सैनिक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर २० वर्षे सेवा देत निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कोरोना विषाणू संकटाशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : देशाच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर २० वर्षे सेवा देत निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी कोरोना विषाणू संकटाशी लढण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सेवानिवृत्तीनंतरही शहराच्या रक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरले आहे. शहरातील विविध ठिकाणी ते बंदोबस्त करीत आहे.तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावातील तरूण सैन्यदलात नोकरीला आहेत. कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या या भागातील नागरिक सैन्यदलात नोकरी करून आपल्या गावासह तालुक्याचा नावलौकीक राखून आहे. सेवानिवृत्तीनंतर शांतपणे जीवन जगायचे असा अलिखित नियम असतानाही केवळ आपल्या देशावर नाहीतर आपल्या तालुक्यासह परिसरावर संकट आले म्हणून आपल्या अंगी असलेला सैनिकी बाणा या सैनिकांना स्वस्थ बसू देईना. या संकट समयी प्रशासनाला मदत म्हणून सहकार्य करायला तालुक्यातील माजी सैनिक सरसावले असून, त्यांनी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांची भेट घेऊन या संकट समयी आम्ही आपणास काय मदत करू शकतो असा प्रश्न विचारून शहरात बंदोबस्तासाठी आम्हाला नेमावे अशी या सैनिकांनी मागणी केल्यानंतर त्यांना शहरात विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचे संकट उद्भवल्यानंतर याची लागण शहरात झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण शहरात आढळून आले आहे. १८ मार्चपासून शहरातील महसूल, पोलीस व पालिका प्रशासन २४ तास तत्पर असून, या संकट समयी नागरिकांनी घरीच राहावे असे, आवाहन करीत आहे. मात्र दुर्देवाने काही नागरिक प्रशासनाच्या या आव्हानाला न जुमानता विनाकारण शहरात गर्दी करत असल्याने प्रशासनावरील ताण कमालीचा वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलात सेवानिवृत्ती झालेल्या माजी सैनिकांनी शहरात सेवा देण्याचा निर्णय घेतला. यात संतोष युवराज पाटील, भानुदास ताराचंद देवरे, भाऊराव सदाशिव सोनवणे, रवींद्र शिवाजी पवार, सर्व रा.मंदाणे, दीपक नारायण निकम, रा. दामळदा, दिलीपसिंग गिरासे, रा.डोंगरगाव, रामसिंग सुळे, रा.वडगाव, केवलसिंग गिरासे, सिताराम दशरथ भिल, पिंपर्डे, ता.शहादा यांचा समावेश आहे.माजी सैनिकांच्या या निर्णयाचे स्वागत शहादेकरांनी केले असून, त्यांच्या सन्मानार्थ शहरातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसापासून हे सैनिक शहरातील विविध भागात आपली सेवा देत असून, परिणामी शहरातील गर्दी कमी झाली आहे.