शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

माघारीसाठी घडामोडींना वेग : नंदुरबार पालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माघारीसाठी अधिकृत उमेदवारांकडून विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्याचा काहीही परिणाम सध्यातरी दिसून येत नाही. माघारीच्या शेवटच्या दोन दिवसातच घडामोडींना अधीक वेग येणार आहे. नंदुरबार पालिकेच्या 19 प्रभागातील 39 जागांसाठी तब्बल 213 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी छाननीत 104 अर्ज बाद झाल्याने आता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माघारीसाठी अधिकृत उमेदवारांकडून विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. त्याचा काहीही परिणाम सध्यातरी दिसून येत नाही. माघारीच्या शेवटच्या दोन दिवसातच घडामोडींना अधीक वेग येणार आहे.नंदुरबार पालिकेच्या 19 प्रभागातील 39 जागांसाठी तब्बल 213 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी छाननीत 104 अर्ज बाद झाल्याने आता 109 उमेदवार रिंगणात आहेत. काही प्रभागात मोजकेच तर काहींमध्ये मोठय़ा प्रमाणावर इच्छूकांनी गर्दी केली आहे. मुख्य राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. इतर उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून दबाव वाढविण्यात येत आहे. त्यासाठी विविध युक्तींचा वापर केला जात आहे. कुठे नातेसंबधाचा, कुठे व्यावसायिक संबधांचा, काही ठिकाणी न्यायालयात दाखल खटल्यांचा तर काही ठिकाणी सरळ अन्य मार्गाने दबावही टाकला जात आहे. हीबाब लक्षात घेता माघारीसाठी अधिकृत उमेदवारांची मोठी कसरत होत आहे.नंदुरबारातील उमेदवारांची संख्या लक्षात घेता माघारीसाठीच्या घडामोडींना वेग आलेला आहे. शेवटच्या दोन दिवसात अर्थात 22 ते 25 या दरम्यान माघारीसाठीचे अर्ज दाखल होणार आहेत. दिग्गजांची भाऊगर्दीएका प्रभागात मोठी चुरस आहेत. तेथे तीन दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रभागातील निवडणुक रंगणार आहे. ही बाब लक्षात घेता कमीत कमी मतविभाजन व्हावे यासाठी इतर अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी प्रय} केले जात आहे. त्यासाठी आर्थिक अमिष, नोकरीचे अमिष दाखविले जात आहे. त्यामुळे या प्रभागातील माघार घेणा:या उमेदवारांकडे आता सर्वाचे लक्ष लागून आहे.व्यावसायिक संबधअशीच स्थिती आणखी एका प्रभागातील आहे. या प्रभागात काही उमेदवार व्यावसायिक आहेत. त्यांचे व्यावसायिक संबध एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. असे असतांना त्यांनी प्रतिस्पर्धी म्हणून अर्ज दाखल केले आहेत. परिणामी त्या प्रभागात कोण माघार घेतो, व्यावसायिक संबध जोपासले जातात काय, त्यासाठी काय काय उपाय केले जातात याकडे आता लक्ष लागून आहे.नातेगोते देखील अडचणीचेतीन प्रभागात एकाच समाजातील आणि एकाच नात्यातील उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस रंगणार आहे. माघारीर्पयत यातील कोण माघार घेतो किंवा एकमेकांसमोर सरळ लढत देतात याकडे सर्वाच्या नजरा लागून आहेत. यंदाच्या निवडणुकीत समाज या फॅक्टरला मोठय़ा प्रमाणावर महत्त्व देण्यात आले आहे.