शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

जुलै संपण्यास आला तरी पीककर्ज वाटप केवळ ४३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST

नंदुरबार : राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप यंदाही संथगतीने सुरू असल्याने जुलैअखेर येऊनही जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पीक कर्जाचे वाटप ...

नंदुरबार : राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप यंदाही संथगतीने सुरू असल्याने जुलैअखेर येऊनही जिल्ह्यात केवळ ४३ टक्के पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण ५०० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना राष्ट्रीयीकृत बँका निम्म्यापर्यंतही पोहोचलेल्या नाहीत. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी उधार-उसनवारीने कर्ज घेत पेरण्या करीत आहेत.

जिल्ह्यात यंदा राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी बँक मिळून एकूण ५६३ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. साधारण एक लाखापेक्षा अधिक शेतकरी खातेदार असताना मात्र जिल्ह्यात दरवर्षी २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होत नाही. यातून शेतकरी खासगी ठिकाणाहून कर्ज घेत पिकांची पेरणी करतात. जिल्ह्यातील २५ हजार २२ शेतकऱ्यांना गेल्या वर्षी महात्मा जोतिबा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत लाभ मिळाला होता. यातून दीड लाख रुपये वजा झाल्याने या शेतकऱ्यांची खाती रिकामी झाली हाेती. लाभधारकांसोबतच नियमित खातेदारांना यंदा कर्ज मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु खाती रिकामी झाली असतानाही बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचे प्रकार घडत आहेत. येत्या काळात शेतीसाठी पैशांची गरज पडणार असल्याने शेतकरी पुन्हा खाससगी सावकारीच्या फाशात ओढला जाण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे.

जिल्हा बँक पुढे...

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यंदा ७१ कोटी ६४ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु बँकेने ११ हजार १७२ शेतकऱ्यांना ९७ कोटी २२ लाख ९३ हजार रुपयांचे कर्ज वाटप आतापर्यंत केले आहे. उद्दिष्टापेक्षा ३५ टक्के अधिक कर्जवाटप करीत बँकेने नवीन विक्रम केल्याचे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीयीकृत बँका फेल

जिल्ह्यातील १२ राष्ट्रीयीकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांच्या शाखांना यंदा ४९१ कोटी ९२ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, बँकांनी २६ जुलैअखेरपर्यंत केवळ १५० कोटी ४७ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे.

केवळ ३० टक्के हे कर्ज वाटप झाले आहे.

२० हजार शेतकऱ्यांना कर्ज : बँकांकडून एकूण २० हजार ६०६ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. यात ११ हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने, तर ९ हजार ४३४ शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांनी कर्ज वाटप केले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पीक कर्जवाटपाबाबत राष्ट्रीयीकृत बँकांकडून कायम उदासीनता दर्शविण्यात येते. यातून जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ २४७ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून ११७ कोटी ४२ लाख, ग्रामीण बँकेच्या शाखांमधून ३ कोटी ७१ लाख, तर खासगी बँकांकडून २७ कोटी ३४ लाख रुपयांचे पीक कर्ज दिले गेले आहे. या सर्वात राष्ट्रीयीकृत बँकांची टक्केवारी ही २९ टक्के असून, सर्व बँकांच्या तळाशी राष्ट्रीयीकृत बँकांचा क्रमांक येत असल्याचे समोर आले आहे.