शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

रमजान महिन्यातही केळीला भाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

मागील वर्षाच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावर्षीही केळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकाच प्रकारच्या पिकाला वेगवेगळ्या ठिकाणी ...

मागील वर्षाच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावर्षीही केळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकाच प्रकारच्या पिकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव भेटत असल्यामुळे यावर काहीतरी उपाय योजना करायला हवेत, असे सूरही शेतकऱ्यांमधून ऐकायला भेटत आहेत.

सध्या रमजानचा महिना चालू आहे. त्यामुळे केळीला सर्वांकडे मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. तरीही शहादा परिसरात व्यापाऱ्यांकडून केळी पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. उत्तर भारतात तर खान्देशची केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते. जळगाव, रावेर, बुऱ्हानपूर येथे सध्या केळीला व्यापाऱ्यांकडून सार्वधिक १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. मात्र, शहादा परिसरात व्यापारी लॉकडाऊनच्या नावाखाली नवती केळीला ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आणि पिलबागला ५०० ते ६०० प्रतिक्विंटल असा भाव देत आहेत.

शेतकरी व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी मिळत असलेले जादा दर सांगतात. मात्र, व्यापारी सध्या लॉकडाऊनचे कारण पुढे करून कमी भावात शेतकऱ्यांची केळी खरेदी करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून, रमजान महिना असल्यामुळे केळीला अधिक मागणी होताना दिसत असून, व्यापारी सर्वांकडे केळी खरेदी करताना दिसून येत आहेत. मागणी सर्वांकडे सारखीच दिसून येत असून, दरही सर्वांकडे सारखाच मिळायला पाहिजे. अशी योजना शासनाने राबवायला हवी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.