शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

दीड महिना होत आला तरीही शैक्षणिक साहित्याची रक्कम मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळा उघडून साधारण दीड महिना होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळा उघडून साधारण दीड महिना होत आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना आजपावेतो शैक्षणिक साहित्याची रक्कम मिळाली नसून, त्यांना साहित्याअभावी राहावे लागत आहे. आदिवासी विकास विभागाच्या अशा गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निदान या प्रकरणी आदिवासी विकासमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात ४२ शासकीय आश्रमशाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये साधारण १५ हजार आदिवासी मुले, मुली पहिली ते १२वीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. या मुलांना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत शैक्षणिक साहित्य खरेदीकरिता पहिली ते चौथीसाठी साडेसात हजार, पाचवी ते आठवीसाठी साडेआठ हजार, नववी ते १२वीकरीता साडेनऊ हजार याप्रमाणे रक्कम दिली जाते. या रकमेतून विद्यार्थी वह्या, पेन, कंपास, गाईड अशा शैक्षणिक साहित्याबरोबरच बूट, मोजे, स्कूल बॅग, रेनकोट, कपडे, तेल, आरसा, कंगवा, शालेय गणवेश, साबण अशा वस्तू घेत असतात. परंतु यंदा शाळा उघडून जवळपास दीड महिना होत आला तरी या मुला-मुलींना आदिवासी विकास विभागाने पैसे उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तूंपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत आदिवासी पालक शासकीय आश्रमशाळांमध्ये रकमेबाबत विचारणा करतात तेव्हा त्यांना अजून आदिवासी विकास विभागाकडूनच पैसे आले नसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक कोरोना महामारीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. एका शाळेला परिसरातील साधारण ५० ते ५५ गावे जोडली आहेत. साहजिकच शिक्षकांनी प्रत्येक गावात जाऊन पायपीट करत शाळांमध्ये ८० टक्के मुलांची उपस्थिती वाढवली आहे. या जीवघेण्या रोगामुळे पालक सहसा आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार नव्हते. मात्र, शिक्षकांनी त्यांची मानसिकता बदलून मुलांना शाळेत आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तेव्हा विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती वाढली, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा पुरविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांनीच उदासीन भूमिका घेतल्याचा पालकांचा आरोप आहे. आधीच कोरोना महामारीमुळे रोजगाराची वानवा आहे. पैशांअभावी आपल्या पाल्यास साहित्य, कपडे कुठून आणून द्यायचे, असा पालकांचा प्रश्न आहे. निदान पालकमंत्र्यांनी तरी याप्रकरणी चौकशी करून डीबीटीद्वारे त्यांचा खात्यावर तातडीने पैसे टाकण्याची आदिवासी विकास विभागास तंबी द्यावी, अशी पालकांची मागणी आहे.

क्रमीक पुस्तकेही दिली नाहीत

आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी क्रमीक पुस्तके दिली जातात. परंतु पुस्तकेदेखील देण्यात आली नाहीत. साहजिकच विद्यार्थ्यांपुढे अभ्यास कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी खेडोपाडी फिरून विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके आणून विद्यार्थ्यांना पुरविली आहेत. तीही काहीना मिळाली तर काहींना मिळाली नाहीत. एकीकडे शासनाने विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून कोरोनाच्या स्थितीतही शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.