शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

दीड महिना होत आला तरीही शैक्षणिक साहित्याची रक्कम मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळा उघडून साधारण दीड महिना होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळा उघडून साधारण दीड महिना होत आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना आजपावेतो शैक्षणिक साहित्याची रक्कम मिळाली नसून, त्यांना साहित्याअभावी राहावे लागत आहे. आदिवासी विकास विभागाच्या अशा गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निदान या प्रकरणी आदिवासी विकासमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात ४२ शासकीय आश्रमशाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये साधारण १५ हजार आदिवासी मुले, मुली पहिली ते १२वीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. या मुलांना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत शैक्षणिक साहित्य खरेदीकरिता पहिली ते चौथीसाठी साडेसात हजार, पाचवी ते आठवीसाठी साडेआठ हजार, नववी ते १२वीकरीता साडेनऊ हजार याप्रमाणे रक्कम दिली जाते. या रकमेतून विद्यार्थी वह्या, पेन, कंपास, गाईड अशा शैक्षणिक साहित्याबरोबरच बूट, मोजे, स्कूल बॅग, रेनकोट, कपडे, तेल, आरसा, कंगवा, शालेय गणवेश, साबण अशा वस्तू घेत असतात. परंतु यंदा शाळा उघडून जवळपास दीड महिना होत आला तरी या मुला-मुलींना आदिवासी विकास विभागाने पैसे उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तूंपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत आदिवासी पालक शासकीय आश्रमशाळांमध्ये रकमेबाबत विचारणा करतात तेव्हा त्यांना अजून आदिवासी विकास विभागाकडूनच पैसे आले नसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक कोरोना महामारीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. एका शाळेला परिसरातील साधारण ५० ते ५५ गावे जोडली आहेत. साहजिकच शिक्षकांनी प्रत्येक गावात जाऊन पायपीट करत शाळांमध्ये ८० टक्के मुलांची उपस्थिती वाढवली आहे. या जीवघेण्या रोगामुळे पालक सहसा आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार नव्हते. मात्र, शिक्षकांनी त्यांची मानसिकता बदलून मुलांना शाळेत आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तेव्हा विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती वाढली, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा पुरविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांनीच उदासीन भूमिका घेतल्याचा पालकांचा आरोप आहे. आधीच कोरोना महामारीमुळे रोजगाराची वानवा आहे. पैशांअभावी आपल्या पाल्यास साहित्य, कपडे कुठून आणून द्यायचे, असा पालकांचा प्रश्न आहे. निदान पालकमंत्र्यांनी तरी याप्रकरणी चौकशी करून डीबीटीद्वारे त्यांचा खात्यावर तातडीने पैसे टाकण्याची आदिवासी विकास विभागास तंबी द्यावी, अशी पालकांची मागणी आहे.

क्रमीक पुस्तकेही दिली नाहीत

आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी क्रमीक पुस्तके दिली जातात. परंतु पुस्तकेदेखील देण्यात आली नाहीत. साहजिकच विद्यार्थ्यांपुढे अभ्यास कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी खेडोपाडी फिरून विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके आणून विद्यार्थ्यांना पुरविली आहेत. तीही काहीना मिळाली तर काहींना मिळाली नाहीत. एकीकडे शासनाने विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून कोरोनाच्या स्थितीतही शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.