शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिना होत आला तरीही शैक्षणिक साहित्याची रक्कम मिळाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळा उघडून साधारण दीड महिना होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळा उघडून साधारण दीड महिना होत आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना आजपावेतो शैक्षणिक साहित्याची रक्कम मिळाली नसून, त्यांना साहित्याअभावी राहावे लागत आहे. आदिवासी विकास विभागाच्या अशा गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निदान या प्रकरणी आदिवासी विकासमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. तळोदा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात ४२ शासकीय आश्रमशाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये साधारण १५ हजार आदिवासी मुले, मुली पहिली ते १२वीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. या मुलांना राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत शैक्षणिक साहित्य खरेदीकरिता पहिली ते चौथीसाठी साडेसात हजार, पाचवी ते आठवीसाठी साडेआठ हजार, नववी ते १२वीकरीता साडेनऊ हजार याप्रमाणे रक्कम दिली जाते. या रकमेतून विद्यार्थी वह्या, पेन, कंपास, गाईड अशा शैक्षणिक साहित्याबरोबरच बूट, मोजे, स्कूल बॅग, रेनकोट, कपडे, तेल, आरसा, कंगवा, शालेय गणवेश, साबण अशा वस्तू घेत असतात. परंतु यंदा शाळा उघडून जवळपास दीड महिना होत आला तरी या मुला-मुलींना आदिवासी विकास विभागाने पैसे उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वस्तूंपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत आदिवासी पालक शासकीय आश्रमशाळांमध्ये रकमेबाबत विचारणा करतात तेव्हा त्यांना अजून आदिवासी विकास विभागाकडूनच पैसे आले नसल्याचे सांगण्यात येते. वास्तविक कोरोना महामारीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. एका शाळेला परिसरातील साधारण ५० ते ५५ गावे जोडली आहेत. साहजिकच शिक्षकांनी प्रत्येक गावात जाऊन पायपीट करत शाळांमध्ये ८० टक्के मुलांची उपस्थिती वाढवली आहे. या जीवघेण्या रोगामुळे पालक सहसा आपल्या पाल्यास शाळेत पाठवायला तयार नव्हते. मात्र, शिक्षकांनी त्यांची मानसिकता बदलून मुलांना शाळेत आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तेव्हा विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती वाढली, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या शैक्षणिक गरजा पुरविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, रक्कम तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांनीच उदासीन भूमिका घेतल्याचा पालकांचा आरोप आहे. आधीच कोरोना महामारीमुळे रोजगाराची वानवा आहे. पैशांअभावी आपल्या पाल्यास साहित्य, कपडे कुठून आणून द्यायचे, असा पालकांचा प्रश्न आहे. निदान पालकमंत्र्यांनी तरी याप्रकरणी चौकशी करून डीबीटीद्वारे त्यांचा खात्यावर तातडीने पैसे टाकण्याची आदिवासी विकास विभागास तंबी द्यावी, अशी पालकांची मागणी आहे.

क्रमीक पुस्तकेही दिली नाहीत

आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी क्रमीक पुस्तके दिली जातात. परंतु पुस्तकेदेखील देण्यात आली नाहीत. साहजिकच विद्यार्थ्यांपुढे अभ्यास कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी खेडोपाडी फिरून विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके आणून विद्यार्थ्यांना पुरविली आहेत. तीही काहीना मिळाली तर काहींना मिळाली नाहीत. एकीकडे शासनाने विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून कोरोनाच्या स्थितीतही शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.