शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

64 टक्के पाऊस होऊनही प्रकल्प कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 12:27 IST

लघु व मध्यम प्रकल्प : केवळ 31 टक्के पाणीसाठा, दोन प्रकल्प मात्र ओव्हरफ्लो

ठळक मुद्दे विरचक प्रकल्पालाही पाण्याची प्रतिक्षा.. नंदुरबारला पाणी पुरवठा करणा:या शिवण नदीवरील विरचक प्रकल्पात अद्यापही पाणीसाठा झालेला नाही. जून महिन्यात या प्रकल्पात 41 टक्के पाणीसाठा होता. आजच्या स्थितीत केवळ 39.48 टक्के पाणीसाठा आहे. पावसाचे प्रमाण असेच कायम

ऑनलाईन लोकमतदिनांक 17 ऑगस्टनंदुरबार : जिल्ह्यात 64 टक्के पाऊस होऊनही लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये निम्मेही पाणीसाठा होऊ शकला नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज प्रकल्पातील पाणी सोडून देण्यात आल्यानंतर दोन दिवसांपासून पुन्हा पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, नवापूर व शहादा तालुक्यात पावसाने अद्यापही पन्नाशी गाठली नसल्याची स्थिती आहे.         जिल्ह्यात यंदा पावसाचे उशीराने आगमन झाले. परिणामी जूनची सरासरी पुर्ण होऊ शकली नव्हती. जुलैमध्ये ब:यापैकी पाऊस झाला. ऑगस्टचा पहिला आठवडाही मध्यम स्वरूपाचा पावसाचा होता. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची सरासरी 64 टक्केर्प्यत गेली असली तरी अद्यापही अनेक भागात दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. आतार्पयत सर्वाधिक पाऊस हा धडगाव व तळोदा तालुक्यात नोंदविण्यात आला आहे. तर सर्वात कमी पाऊस शहादा तालुक्यात सरासरी 49 तर नवापूर तालुक्यात 50 टक्के झालेला आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा अद्यापही समाधानकारक झालेला नाही. 37 लघु व चार मध्यम प्रकल्प मिळून केवळ 30.88 टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे प्रकल्पांना अद्यापही पाण्याची प्रतिक्षा कायम आहे.लघु प्रकल्प कोरडेजिल्ह्यातील 37 पैकी 10 लघु प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत. या प्रकल्पांमध्ये दहा टक्केच्या आतच पाणीसाठा आहे. 20 प्रकल्पांमध्ये 50 ते 60 टक्के व सात प्रकल्पांमध्ये त्यापेक्षा अधीक पाणीसाठा झालेला आहे. शहादा व नवापूर तालुक्यातील प्रकल्प सर्वाधिक कोरडे आहेत. तळोदा, धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील प्रकल्पांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा झालेला आहे. मध्यम प्रकल्पजिल्ह्यात चार मध्यम प्रकल्पांपैकी केवळ दरा व रंगावली प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तर शिवण प्रकल्पात केवळ 39 टक्के पाणीसाठा आहे. राणीपूर प्रकल्पात 61 टक्के पाणीसाठा झालेला आहे. तापीवरील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे गेल्या आठवडय़ात उघडण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात पाणीसाठा नव्हता. आता नदी प्रवाही असली तरी पाणीसाठा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. त्याची दखल घेत पाटबंधावे विभागाने गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही बॅरेजचे गेट बंद केले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पाच ते सात टक्के पाणीसाठा झालेला आहे.जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 63 टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी असली तरी नदी, नाले प्रवाही होऊन त्याद्वारे प्रकल्प भरले गेले नसल्याची स्थिती आहे. जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात झालेला पाऊस हा भिज पाऊस होता. त्यामुळे पिकांसाठी त्याचा उपयोग झाला असला तरी जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यात किंवा प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यात त्याचा फारसा उपयोग झालेला नाही.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यात सरासरीचा 78.28, तळोदा तालुक्यात 76.74, अक्कलकुवा तालुक्यात 70.20, नंदुरबार तालुक्यात 62.50, नवापूर तालुक्यात 49.26 तर शहादा तालुक्यात 50.28 टक्के पाऊस झाला आहे.येत्या दीड महिन्यात आणखी पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेता पावसाची सरासरी टक्केवारी 80 टक्केर्पयत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अन्यथा दोन वर्षाप्रमाणेच टंचाईची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.