शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

स्थलांतरीत मजूर प्रशासनाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रोजगारनिमित्त परजिल्ह्यात जाणा:या मजुरांच्या सर्वागिण सुरक्षेसाठी शासनस्तरावर नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगारनिमित्त परजिल्ह्यात जाणा:या मजुरांच्या सर्वागिण सुरक्षेसाठी शासनस्तरावर नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु नोंदणीच होत नसल्याने त्यांचे जीवन असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. तर काबाडकष्ट करीत संबंधित कामे मार्गी लावत असले तरी हे काम बेदखल ठरत आहे. नंदुरबार हा मागास व आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी स्थलांतरीतांचा जिल्हा अशी दुसरी ओळखही या जिल्ह्याला जोडली जाते. अपेक्षित रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातून सर्वाधिक मजूर  शेजारील राज्ये व परजिल्ह्यात स्थलांतर करीत आहे. बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने खरीप हंगामातील शेतीची कामे तातडीने आटोपली, साखर कारखान्यांचा गळीत हंगामही सुरू झाल्याने स्थलांतराचे वारे वाहू लागले आहे. स्थलांतर करणा:यांमध्ये धडगाव, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातील सर्वाधिक मजूर असल्याचे म्हटले जाते. त्या पाठोपाठ शहादा व तळोदा तालुक्यातूनही मजुरांचे स्थलांतर होत आहे. स्थलांतरामुळे रोगराई, जंगली श्वापदांपासून मजुरांच्या जीवाला धोका, आर्थिक अडचणी यासह अन्य समस्या निर्माण होतात. या समस्यांमधून मजुरांच्या सुटकेसाठी ग्रामपंचायतीसह शासन स्तरावर त्यांची संपूर्ण नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटना काही आदिवासी संघटनांमार्फत करण्यात आली होती. परंतु त्यासाठी कुठलीच कार्यवाही झाली नाही, त्यामुळे मजूरांच्या जीवाला धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.ऊसतोड कामगारांची समस्या अधिक गंभीर होत असल्यामुळे मागील वर्षी ऊसतोड कामगार संघटनेतर्फे नोंदणीसह कामगार सुरक्षा योजना सुरू करावी, माथाडी कामगारांच्या धर्तीवर योजना लागू कराव्या यासह विविध मागण्या करण्यात आल्या. त्यापैकी काही योजना आखल्याही गेल्या, परंतु  त्याची नेमकी अंमलबजावणीच झाली नाही.यंदा धडगाव व मोलगी परिसरातील मजूर गुजरातमधील कुकरमुंडा, मटावली, दसवड तर मध्यप्रदेशातील ठिकरी व दुर्गा येथील साखर कारखान्यांमध्ये रोजगारासाठी जाऊ लागले आहेत. तर मागील वर्षाप्रमाणे पंढरपूर, सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्यातील कारखान्यांसह त्यांच्या क्षेत्रांतर्गत ऊसतोडणीसाठी दोन महिन्यांपूर्वीच आगाऊ मजूरी घेतली आहे. त्यामुळे संबंधित कामाच्या ¨ठकाणी या मजुरांना जावेच  लागणार आहे. न गेल्यास घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम संबंधितांना द्यावी लागणार असल्याने जाऊ लागले आहेत. 

मागील वर्षी धडगाव तालुक्यातील एक जोडपं त्यांच्या 10 ते 12 वर्षाच्या मुलासह तोरखेडा ता.शहादा येथे ऊसतोड कामासाठी आले होते. तेथे त्या मुलावर बिबटय़ाने हल्ला केला, त्यात मुलगा गंभीर जखमी झाला होता. दोन महिन्याच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला होता.तोरखेडय़ाच्या घटनेनंतर सुलतानपूर सुलतानपूर ता.शहादा येथे दुसरी घटना घडली. या घटनेत साक्री तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलाला बिबटय़ाने पळवून नेले. मजुरांसह ग्रामस्थांनी शोध घेतला असता त्या मुलाच्या शरिराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले होते. मोख ता.धडगाव येथील अनिता वसावे ही महिला तिच्या जुळ्या नवजात बालिकांसह पंढरपूर जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी गेली होती. अनिता ही स्वयंपाक करीत असताना जुळ्यांपैकी एका बालिकेला बिबटय़ाने उचलून नेले होते. आधिच  आजाराने पीडित अनिता मनोमन खचून गेली, तिला आधार देण्यासाठी धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तथा स्थायिक झालेल्या नोकरदारांनी गोळा करीत महिलेला 25 हजाराची आर्थिक मदत दिली होती. मात्र तेथील वनविभागामार्फत महिलेला कुठलीही मदत मिळाली नाही.

नऊ वर्षापूर्वी राष्ट्रीय प्रत्येकाला राष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी आधार सुरू करण्यात आले. त्याचा शहादा तालुक्यातील टेंबली येथे शुभारंभ करण्यात आला. तेथील नागरिक भूईमूग व भात काढण्यासाठी सौराष्ट्र (गुजरात) येथे स्थलांतरीत झाले आहे. त्यांच्यासोबत लोणखेडा, पाडळदा येथील मजूरही स्थलांतरीत झाले आहे.