यामध्ये ग्रामदक्षता समिती स्थापन झाल्यावर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण फवारणी तसेच कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र करण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच ज्या घरांमध्ये बाधित रुग्ण आढळून येतील, त्या कुटुंबातील इतर सदस्यांसाठी विलगीकरण विषयावर चर्चा करून जि. प. मराठी शाळा येथे विलगीकरणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
शासनाने कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासाठी अंशतः लॉकडाऊनसह अनेक निर्बंध लादले आहेत. शासन आदेशान्वये संपूर्ण गावात कडकडीत लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळता बाकीची दुकाने बंद ठेवली जात आहेत. जोपर्यंत शासन आदेश येत नाही तोपर्यंत इतर दुकाने कायमस्वरूपी बंद ठेवली जाणार आहेत.
याव्यतिरिक्त ग्रामस्थांनी घाबरून न जाता आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे तसेच काम असेल तरच बाहेर निघण्याचे व वेळोवेळी सॅनिटायझरने हात धुण्याचे व तोंडाला मास्क वापरण्याचे आवाहन ग्रामदक्षता समितीतर्फे वेळोवेळी करण्यात येणार आहे. बैठकीस सरपंच मीना सोनवणे, उपसरपंच सुनील माळी, समितीचे माजी उपसभापती ईश्वर माळी, ग्रामपंचायत सदस्य छगन पारधी, महात्मा फुले युवा मंचचे संस्थापक-अध्यक्ष ईश्वर संतोष माळी, ग्रामसेवक केशव वसावे, माजी उपसरपंच अशोक माळी, माजी उपसरपंच किशोर माळी, अंकुश सोनवणे, कांतीलल माळी, पोलीस पाटील संदीप चित्ते, कोतवाल दयाराम भिल, अशोक करंजे, मोहन पारधी, लखीचंद माळी, रोजगार सेवक संजय पाटील, शिपाई काशिनाथ पाटील उपस्थित होते.