शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

महामारीत मुन्नाभाई एमबीबीएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बोगस डाॅक्टरांवर कारवाईचे सत्र गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : बोगस डाॅक्टरांवर कारवाईचे सत्र गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी असे डाॅक्टर्स सक्रिय आहेत. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत बोगस डाॅक्टरांवर जिल्ह्यात कारवाईच झालेली नाही. शिवाय स्थानिक स्तरावरूनदेखील त्याबाबत कुणी तक्रारी केलेल्या नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर पूर्वी बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट राहत होता. परंतु आता आरोग्य सेवा सर्वदूर पोहोचल्याने अशा डाॅक्टरांची दुकानदारी काही प्रमाणात बंद झाली आहे. परंतु अनेक महाभाग अजूनही सक्रिय आहेत. लोकांचीही त्यांच्यावर भावना बसली आहे. शिवाय वेळेवर आणि कमी पैशात उपचार मिळत असल्याने जीवाची पर्वा न करता अशा डॅाक्टरांकडे अनेक जण उपचार करून घेत असतात.

शासकीय आरोग्य केंद्रातील उपचार...

दुर्गम भागात शासकीय आरोग्य केंद्रात डाॅक्टरच उपस्थित राहत नसल्यामुळे ऐनवेळी तेथील परिचारिकांनाच उपचार करावा लागतो. अत्यावश्यक रुग्ण आल्यास त्यावर तात्पुरता उपचार करून ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते. साध्या आजारावर मात्र परिचारिकाच औषधी देऊन वेळ निभावून नेत असल्याचेही प्रकार दुर्गम भागात अनेक आरोग्य केंद्रांत दिसून येतात.

तक्रार आली तरच कारवाई

शहरासह ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांची संख्या सर्वाधिक आहे. कारवाई किंवा माहिती देण्याचे अधिकार स्थानिक सरंपच किंवा ग्रामसेवक, पोलीस पाटील तसेच नागरिकांनादेखील आहेत. मात्र कारवाईबाबत कोणीही माहिती देत नाही. तसेच तक्रार केल्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जाते.