शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संपूर्ण नंदुरबार जिल्हाच दुष्काळी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:53 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती आहे. कागदोपत्री सरासरीच्या तुलनेत 80 ते 90 ...

नंदुरबार : जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती आहे. कागदोपत्री सरासरीच्या तुलनेत 80 ते 90 टक्के पाऊस झाल्याचे दिसत असले तरी तशी परिस्थिती नाही. त्यामुळे इतर तालुक्यांप्रमाणे या दोन तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करीत तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी घेण्यात आली. यंदाच्या पंचवार्षीकमधील विद्यमान पदाधिकारी व सदस्यांची ही शेवटची सभा असल्याची शक्यता आहे. सभेत उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सभापती आत्माराम बागले, दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत दुष्काळी आढावा घेवून उपाययोजना करण्यासाठी तातडीने पाउले उचलण्याची मागणी सदस्यांनी केली. शासनाने पावसाच्या सरासरी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळी घोषीत केले. अक्कलकुवा व धडगाव तालुके त्यातून वगळण्यात आले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये सरासीरच्या तुलनेत ब:यापैकी पजर्न्यमान झाले असले तरी पडलेले पावसाचे पाणी वाहून गेले आहे. डोंगर-उतार व इतर ठिकाणी पाणी साठविण्याची उपाययोजना नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे पाऊस येऊनही धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात पिकांची स्थिती जैसे थे आहे. ही बाब लक्षात घेता धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून तो शासनाकडे पाठवावा अशी मागणी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सदस्यांनी केली.शासकीय इमारतींचे निर्लेखनशासकीय इमारती अर्थात शाळा, दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने व इतर इमारती यांचे निर्लेखन करण्यासाठी संबधितांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु कुठल्याही तालुक्याने प्रतिसाद दिला नाही. शिक्षण विभागाअंर्गत सर्वाधिक प्राथमिक शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरूस्ती तात्काळ करण्याची मागणी यावेळी सुहास नाईक रामचंद्र पाटील, रतन पाडवी, सागर तांबोळी यांच्यासह सदस्यांनी केला.कहाटूळची पाणी योजनाकहाटूळची पाणी योजना तापी नदीतूनच करण्याची मागणी रामचंद्र पाटील यांनी केली. गावातील वितरण व्यवस्थेची पाईपलाईन तशीच ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.गटशिक्षणाधिका:यांविरुद्ध तक्रारधडगावचे गटशिक्षणाधिकारी यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. धडगाव तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा याच अधिका:यांमुळे होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी केली. पदवीधर शिक्षकांच्या जागेवर उपशिक्षकांना नियुक्ती दिली गेली आहे. संबधीताची चौकशी करून कारवाईचे आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

यावेळी इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद दाधिकार व सदस्यांचही ही शेवटची सभा असण्याची शक्यता लक्षात घेता सभेत अनेक विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती.