शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण नंदुरबार जिल्हाच दुष्काळी जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:53 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती आहे. कागदोपत्री सरासरीच्या तुलनेत 80 ते 90 ...

नंदुरबार : जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती आहे. कागदोपत्री सरासरीच्या तुलनेत 80 ते 90 टक्के पाऊस झाल्याचे दिसत असले तरी तशी परिस्थिती नाही. त्यामुळे इतर तालुक्यांप्रमाणे या दोन तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करीत तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला.अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी घेण्यात आली. यंदाच्या पंचवार्षीकमधील विद्यमान पदाधिकारी व सदस्यांची ही शेवटची सभा असल्याची शक्यता आहे. सभेत उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सभापती आत्माराम बागले, दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीत दुष्काळी आढावा घेवून उपाययोजना करण्यासाठी तातडीने पाउले उचलण्याची मागणी सदस्यांनी केली. शासनाने पावसाच्या सरासरी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळी घोषीत केले. अक्कलकुवा व धडगाव तालुके त्यातून वगळण्यात आले आहेत. या दोन्ही तालुक्यांमध्ये सरासीरच्या तुलनेत ब:यापैकी पजर्न्यमान झाले असले तरी पडलेले पावसाचे पाणी वाहून गेले आहे. डोंगर-उतार व इतर ठिकाणी पाणी साठविण्याची उपाययोजना नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे पाऊस येऊनही धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात पिकांची स्थिती जैसे थे आहे. ही बाब लक्षात घेता धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांमध्येही दुष्काळ जाहीर करण्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून तो शासनाकडे पाठवावा अशी मागणी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सदस्यांनी केली.शासकीय इमारतींचे निर्लेखनशासकीय इमारती अर्थात शाळा, दवाखाने, पशुवैद्यकीय दवाखाने व इतर इमारती यांचे निर्लेखन करण्यासाठी संबधितांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु कुठल्याही तालुक्याने प्रतिसाद दिला नाही. शिक्षण विभागाअंर्गत सर्वाधिक प्राथमिक शाळा इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यांची दुरूस्ती तात्काळ करण्याची मागणी यावेळी सुहास नाईक रामचंद्र पाटील, रतन पाडवी, सागर तांबोळी यांच्यासह सदस्यांनी केला.कहाटूळची पाणी योजनाकहाटूळची पाणी योजना तापी नदीतूनच करण्याची मागणी रामचंद्र पाटील यांनी केली. गावातील वितरण व्यवस्थेची पाईपलाईन तशीच ठेवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.गटशिक्षणाधिका:यांविरुद्ध तक्रारधडगावचे गटशिक्षणाधिकारी यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. धडगाव तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा याच अधिका:यांमुळे होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी केली. पदवीधर शिक्षकांच्या जागेवर उपशिक्षकांना नियुक्ती दिली गेली आहे. संबधीताची चौकशी करून कारवाईचे आश्वासन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

यावेळी इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद दाधिकार व सदस्यांचही ही शेवटची सभा असण्याची शक्यता लक्षात घेता सभेत अनेक विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती.