शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

भाजी मार्केटमधील अतिक्रमण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:54 IST

पालिकेची कारवाई : तळोद्यात वाहतूक सुरळीत होण्यास मदत

तळोदा : शहरातील पालिकेच्या जागेवरील जुन्या भाजी मार्केटमधील 20 दुकानांचे अतिक्रमण पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने काढली. यामुळे येथे सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी सुरळीत झाली आहे. याशिवाय पालिकेच्या व्यापारी गाळ्यांनीदेखील मोकळा श्वास घेतला आहे. पालिकेने ही अतिक्रमणे काढल्यामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.पालिकेच्या मालकीच्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून दुकाने थाटून भाजी व धान्य मार्केट थाटण्यात    आले होते. तथापि या ठिकाणी पालिकेने खताचे व्यापारी गाळे उभारले आहे. परंतु अजूनही या व्यापारी गाळ्याच्या पुढील भागात 20 दुकाने सुरूच होती. येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधीत दुकानदारांना पालिकेने नोटीसादेखील बजाविल्या होत्या. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिकेने शनिवारी मोहीम हाती घेतली. काही मालकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतली तर इतरांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली आहेत. जवळपास 20 दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले आहे. या ठिकाणी दुकानदारांनी मातीचे कच्चे ओटे बांधले होते. या अतिक्रमणामुळे येथील वाहतुकीची सतत कोंडी होत असे. त्यामुळे दोन वाहने एकमेकांजवळून निघताना मोठी कसरत करावी लागत होती. त्याचबरोबर पादचा:यांनादेखील येथून मार्गक्रमण करतांना जीव मुठीत घालून करावा लागत होता. आता पालिकेने अतिक्रमण हटविल्यामुळे व्यापारी गाळ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र वाहतुकही सुरळीत होण्यास मदत झाली आहे.