शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात पाच अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये सक्षमीकरण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 13:04 IST

रोझवा पुनर्वसन : लोकसमन्वय प्रतिष्ठानचा पुढाकार; पाच गावात अंमलबजावणी

तळोदा : लोकसमन्वय प्रतिष्ठान व यूएसके फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यात पाच अतिदुर्गम आदिवासी गावांमध्ये कुपोषण निमरूलन प्रक्रिया सक्षमीकरण योजना राबवीत आहे. या योजनेचे मंगळवारी रोझवा पुनर्वसन येथे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, तहसीलदार योगेश चंद्रे, एकात्मिक बालविकास अधिकारी भाऊसाहेब बोरकर (तळोदा), गणेश माल्टे (अक्कलकुवा), तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण, साक्री येथील  डॉ.विजया अहिरराव, युएसके फाऊंडेशनच्या दिपाली खोरे (पुणे), लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व लोकसमन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचे स्वागत गावातील किशोरी विकास मंचच्या किशोरवयीन मुलींनी आपल्या पारंपरिक पेहरावात ढोलसह नृत्याने केले. या वेळी सर्व ग्रामस्थ, सरपंच विद्या पावरा, पोलीस पाटील करुणा पावरा, अंगणवाडी कार्यकत्र्या  उपस्थित होते. या वेळी गावातील महिला व किशोरवयीन मुली यांच्यासाठी लोकसमन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने सॅनेटरी नॅपकीनचे वेंडिंग मशीनही बसविण्यात आले. त्याचे अनावरण डॉ.विजया अहिरराव यांनी केले.प्रास्ताविकात प्रतीभा शिंदे यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील अंबाबारी, मोरंबा, रोजकुंड, गुलीआंबा व रोझवा पुनर्वसन या पाच गावात एका वर्षात शून्य कुपोषण असेल यासाठी पुणे येथील यूएसके फाऊंडेशन यांच्या मदतीने हा पथदर्शी प्रकल्प आम्ही सुरु करीत असल्याचे सांगून शासकीय प्रशासनाने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना असून त्या सर्व योजना गावार्पयत पोहोचविण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटीबद्ध राहील. परसबाग व महिला बचत गटांना उद्योग उभा करायला आम्ही उत्सुक असल्याचे ते म्हणाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदाळे यांनी किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती फिल्म व लायब्ररी तसेच युवकांना व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग चालू करण्यास मदत करू व शेती सुधारण्यासाठी मदत करण्यात येईल, असे सांगितले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन यांनी शासन या प्रकल्पात  महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सर्व मदत करेल, असे सांगितले. डॉ.विजया अहिरराव यांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयएमएच्या माध्यमातून महिला, मुली व बालकांची नियमित तपासणी केली जाईल, असे सांगितले. सूत्रसंचालन दीपाली पाटील यांनी तर आभार विद्या पाटील यांनी मानले.