शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अडचणीच्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्नांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीची अंतिम मुदत असल्याने ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीची अंतिम मुदत असल्याने अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी आज रात्रभर प्रयत्न सुरू राहणार आहेत. जि.प.गटांसाठी १३२, तर पं.स.गणांसाठी ८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

ओबीसी आरक्षणामुळे नंदुरबार जिल्हा परिषदअंतर्गत ११ गट, तर शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीअंतर्गत एकूण १४ गणांच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. जुलै महिन्यात या रद्द झालेल्या गट व गणात निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या; परंतु लागलीच न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. २१ ऑक्टोबरपासून स्थगित निवडणुकांचा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू करण्यात आला असून २७ सप्टेंबर ही अर्ज माघारीची शेवटची मुदत आहे.

अनेक गट, गणात गर्दी

जिल्हा परिषदेच्या १४ गटांपैकी अनेक गटांमध्ये इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. संबंधित उमेदवारांच्या माघारीसाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सोमवारी नंदुरबार, शहादा तहसील कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

१३२ अर्ज

१४ जिल्हा परिषद गटांसाठी तब्बल १३२ अर्ज आलेले आहेत. सर्वाधिक अर्ज हे म्हसावद, पाडळदा, कोपर्ली, कोळदा, खापर, वडाळी या गटात आहेत. गणांची स्थिती देखील अशीच आहे. १४ गणांसाठी ८१ अर्ज दाखल आहेत. ज्या गट व गणांमध्ये प्रतिष्ठित उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अशा गटांमध्ये इच्छुकांचा भरणा अधिक आहे. सर्वच जागा या सर्वसाधारण झाल्या असल्यामुळे सर्वच ठिकाणी ही गर्दी पहावयास मिळत आहे.

माघारीनंतर प्रचाराला जोर

उमेदवारी निश्चित असलेल्या प्रमुख उमेदवारांनी आठ दिवसांपूर्वीपासूनच आपल्या गट व गणांमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी, कॅार्नर सभा घेण्यात येत आहेत. प्रचाराची पहिली फेरी या उमेदवारांनी पूर्ण केली आहे. २७ तारखेनंतर चित्र आणखी स्पष्ट होणार असल्याने प्रचाराला अधिक जोर येणार आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवारांनी नियोजन केेले आहे.

प्रशासकीय तयारी

एकीकडे राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर दिलेला असताना दुसरीकडे प्रशासकीय तयारी देखील जोरात सुरू आहे. मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण दिले गेले आहे.

५ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या नंदुरबारात वखार महामंडळाच्या गोदामात, तर शहादा व अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात जमा करण्यात येतील. दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी देखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.