शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

अडचणीच्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्नांना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:33 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीची अंतिम मुदत असल्याने ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या ११ गट आणि १४ गणांच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीची अंतिम मुदत असल्याने अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी आज रात्रभर प्रयत्न सुरू राहणार आहेत. जि.प.गटांसाठी १३२, तर पं.स.गणांसाठी ८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

ओबीसी आरक्षणामुळे नंदुरबार जिल्हा परिषदअंतर्गत ११ गट, तर शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीअंतर्गत एकूण १४ गणांच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. जुलै महिन्यात या रद्द झालेल्या गट व गणात निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या; परंतु लागलीच न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. २१ ऑक्टोबरपासून स्थगित निवडणुकांचा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू करण्यात आला असून २७ सप्टेंबर ही अर्ज माघारीची शेवटची मुदत आहे.

अनेक गट, गणात गर्दी

जिल्हा परिषदेच्या १४ गटांपैकी अनेक गटांमध्ये इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. संबंधित उमेदवारांच्या माघारीसाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सोमवारी नंदुरबार, शहादा तहसील कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

१३२ अर्ज

१४ जिल्हा परिषद गटांसाठी तब्बल १३२ अर्ज आलेले आहेत. सर्वाधिक अर्ज हे म्हसावद, पाडळदा, कोपर्ली, कोळदा, खापर, वडाळी या गटात आहेत. गणांची स्थिती देखील अशीच आहे. १४ गणांसाठी ८१ अर्ज दाखल आहेत. ज्या गट व गणांमध्ये प्रतिष्ठित उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अशा गटांमध्ये इच्छुकांचा भरणा अधिक आहे. सर्वच जागा या सर्वसाधारण झाल्या असल्यामुळे सर्वच ठिकाणी ही गर्दी पहावयास मिळत आहे.

माघारीनंतर प्रचाराला जोर

उमेदवारी निश्चित असलेल्या प्रमुख उमेदवारांनी आठ दिवसांपूर्वीपासूनच आपल्या गट व गणांमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी, कॅार्नर सभा घेण्यात येत आहेत. प्रचाराची पहिली फेरी या उमेदवारांनी पूर्ण केली आहे. २७ तारखेनंतर चित्र आणखी स्पष्ट होणार असल्याने प्रचाराला अधिक जोर येणार आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवारांनी नियोजन केेले आहे.

प्रशासकीय तयारी

एकीकडे राजकीय पक्षांनी प्रचाराला जोर दिलेला असताना दुसरीकडे प्रशासकीय तयारी देखील जोरात सुरू आहे. मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण दिले गेले आहे.

५ ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या नंदुरबारात वखार महामंडळाच्या गोदामात, तर शहादा व अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयात जमा करण्यात येतील. दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी देखील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.