शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

दोन महामार्गातून रिंगरोड मागणीला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गाअंतर्गत नंदुरबारसाठी रिंगरोड प्रस्तावीत करावा. सध्या असलेला बायपास रोड हा अध्र्याभागापुरता मर्यादीत असल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गाअंतर्गत नंदुरबारसाठी रिंगरोड प्रस्तावीत करावा. सध्या असलेला बायपास रोड हा अध्र्याभागापुरता मर्यादीत असल्यामुळे निम्मे शहराचा विकास खुंटला आहे. रिंगरोड झाल्यास अनेक भागातील अंतर कमी होऊन शहरातील रहदारीची समस्या देखील मोठय़ा प्रमाणावर सुटणार आहे.   नंदुरबारातून विसरवाडी-सेंधवा, शेवाळी-नेत्रंग या दोन महामार्गासह धरणगाव ते धानोरा हा राज्य महामार्ग जातो. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी रहदारीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय नागपूर-सुरत किंवा अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर काही समस्या उद्भवल्यास नंदुरबार मार्गे वाहतूक वळविली जाते. जड वाहनांची ये-जा वाढत आहे. या पाश्र्वभुमीवर शहरातील रहदारीचा ताण वाढला आहे. या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात रिंगरोड तयार केल्यास रहदारीच्या समस्येवर मात करण्यास दमत मिळणार आहे. सध्या केवळ एक वळण रस्ता आहे. नवापूर चौफुली ते निझर रस्ता चौफुलीर्पयत हा वळण रस्ता आहे. तो देखील आता शहराच्या मध्यभागी आला आहे. सध्या प्रस्तावीत असलेल्या शेवाळी-नेत्रंग महामार्ग हा नंदुरबारातून जाणार आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून ते एकलव्य इंग्रजी शाळा, माळीवाडा मार्गे निझर रस्ता. तेथून पातोंडा शिवारातून चौपाळे शिवार, सिव्हील हॉस्पीटलच्या मागून साक्री अर्थात नेत्रंग-शेवाळी रस्त्याला जोडणारा रिंग रोड अपेक्षीत आहे. तसे झाल्यास सिव्हील हॉस्पीटल, प्रस्तावीत मेडीकल कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, एमआयडीसी आदी भाग हा नेत्रंग-शेवाळी महामार्गावर अर्थात एनएच-753 महामार्गावर येणार आहेत. उड्डाणपूल, वळण रस्त्यावरील वाहतूक कमी होणार आहे. यासाठी मात्र, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे अपेक्षीत आहे. 

दोन्ही महामार्ग शहरातून जात असल्यामुळे सध्या अस्तीत्वात असलेल्या वळण रस्त्यावर रहदारीचा ताण येणार आहे. सध्या या रस्त्याच्या पलिकडेही मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. शाळा आहेत. त्यामुळे महामार्ग शहरातून न नेता शहराबाहेरून न्यावा यासाठी जनआंदोलनाची गरज आहे.