शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रशासनाकडून भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस नगरसेविका ...

तहसीलदार गिरीश वखारे, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस नगरसेविका अनिता परदेशी, कल्पना पाडवी, नगरसेवक सुभाष चौधरी, योगेश पाडवी, रामानंद ठाकरे, अमनोद्दीन शेख, हेमलाल मगरे, माजी नगरसेवक सतीवान पाडवी, राजू पाडवी, जालंधर भोई, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, पालिका प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

बाजारात प्रवेश करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे याकरिता दुकानांचे वर्गीकरण करण्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. एकाच ठिकाणी चिनोदा चौफुली परिसरात भाजीपाला व फळे विक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाजी विक्रेते चंद्रशेखर चव्हाण यांनी पालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना होत नसल्याने व्यापाऱ्यांचे हाल होत असल्याचे बोलून दाखवले. लॉरी उपलब्ध नसल्याने खाली दुकान लावता येत नाही, मंडप आदींची व्यवस्था नसते. गेल्यावर्षी पालिकेकडून जागा भाडे म्हणून १० ऐवजी २० रुपयांची आकारणी केली होती. पालिकेने यंदा भाडेबाबत सवलत देणे गरजेचे असल्याचे यावेळी विक्रेत्यांनी सांगितले. नगराध्यक्षांनी यावर उत्तर देत पालिकेकडून यावेळी पावती दिली जाणार नसल्याचे सांगितले. तसेच मंगळवारपासूनच दुकानाचे स्थलांतर करून चिनोदा चौफुलीवर लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र आवश्यक त्या उपाययोजनेसाठी वेळ देण्याची मागणी यावेळी विक्रेत्यांनी केली. त्या अनुषंगाने येत्या सोमवारपासून पालिकेकडून नियमावली आखून आवश्यक उपाययोजना करून या दुकानदाराना जागा उपलब्ध करून देण्याबाबत तहसीलदार यांनी सूचना केल्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी यावेळी सांगितले.

शहरात बॅरिकेटींगचा विचार

सकाळच्या सुमारास तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील गर्दीच्या भागांना भेटी दिल्या. शहरात सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्य रस्ते बॅरिकेटिंग करण्यासंदर्भात यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्यात चर्चा झाली. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनदेखील गेल्यावर्षी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. शहरात वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत असल्याने वाहने लावून बाजारासाठी नागरिकांनी पायी यावे यासाठी बॅरिकेटिंग करणे अत्यावश्यक असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली.