शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

राज्यातही २३ जानेवारीपासून शेतकऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार २३ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत ४ दिवस ठिय्या महामुक्काम आंदोलन करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ...

संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार २३ जानेवारी ते २६ जानेवारीपर्यंत ४ दिवस ठिय्या महामुक्काम आंदोलन करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती सत्यशोधकचे अध्यक्ष रामसिंग गावित, सेक्रेटरी करन्सिंग कोकणी व संघटक किशोर ढमाले यांनी दिली.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने (महाराष्ट्र) मुंबईत १२ जानेवारीला झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील आंदोलनाची रणनीती जाहीर केली. २३ ते २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांचा भाग असणाऱ्या शेकडो संघटना एकजुटीने करणार आहेत.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राज्यपाल भवनांवर आंदोलन करण्याची हाक दिली आहे. तसेच १८ जानेवारी रोजी ‘किसान महिला दिवस’ देशभर साजरा करण्याची हाक दिली आहे. महाराष्ट्रात या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध समविचारी किसान, कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरत आहेत. सत्यशोधकचे कार्यकर्ते नुकतेच दिल्ली शाहाजांपूर व टिकरी बॉर्डर वरील आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन परतले असूनही मुंबई आंदोलनात ताकदीने उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आर. टी. गावित, जिल्हा सचिव रणजित गावित यांनी सांगितले.

विविध संघटना २३ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागांमधून ट्रॅक्टर्स व इतर वाहनांमधून हजारो श्रमिकांसह मुंबईच्या दिशेने निघतील. २४ जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सर्वजण एकत्र येतील व २५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता राजभवनाच्या दिशेने कूच करतील. २६ जानेवारी रोजी शेतकरी कामगारांतर्फे आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन केले जाईल, असे कोकणी, गावित व ढमाले यांनी सांगितले.

सत्यशोधक शेतकरी सभेचे १५०० कार्यकर्ते २३ जानेवारी रोजी विसरवाडी येथे क्रांतिवीर तंट्या भिल व सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यात ५०० महिलांचा सहभाग असेल, असे नंदुरबार तालुका अध्यक्षा लिलाबाई वळवी, नवापूर तालुका अध्यक्षा गेवाबाई गावित यांनी सांगितले.