शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गाव, पाड्यांचे विद्युतीकरण पुर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने पुर्ण करावे अशा सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी जिल्हा विकास व समन्वय समितीच्या सभेत बोलतांना दिल्या.जिल्हा विकास व समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. खासदार डॉ.हिना गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक गाव व पाडे अद्यापही विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना वेग देण्यात यावा. ज्या ठिकाणी भौगोलिक अडचणी असतील अशा ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय निवडावा. सौर उर्जेला प्राधान्य देण्यात यावे. नर्मदा काठावरील अनेक गावांमधील सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. जवळपास ६५० सौर लाईट बसविण्यासाठी प्रस्ताव आहेत. त्यापैकी एकही आलेला नाही. ते तातडीने उपलब्ध करून द्यावे अशा सुचना खासदार गावीत यांनी केल्या.बीएसएनएलची यंत्रणा जिल्ह्ययात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा. दुर्गम भागात अधिकाधिक ठिकाणी मोबाईल टॉवर उभारावे. पुरहाणीतील रस्त्यांची दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यात ११ रस्त्यांचा समावेश आहे. १३ कोटी रुपये त्यासाठी मंजुर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मुद्दा उपस्थित केला. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचीत केले.ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली.यावेळी सदस्यांनी देखील विविध प्रश्न उपस्थित केले.महामार्ग व ग्रामिण रस्ते दुरूस्तीला प्राधान्य देण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. अती पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी स्थानिक स्तरावर प्रस्ताव सादर करावेत. याकरीता विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा. महामार्ग दुरूस्तीसाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नवीन रस्त्यांनाही प्राधान्य दिले जात आहे.