शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

गाव, पाड्यांचे विद्युतीकरण पुर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने पुर्ण करावे अशा सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी जिल्हा विकास व समन्वय समितीच्या सभेत बोलतांना दिल्या.जिल्हा विकास व समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. खासदार डॉ.हिना गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक गाव व पाडे अद्यापही विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना वेग देण्यात यावा. ज्या ठिकाणी भौगोलिक अडचणी असतील अशा ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय निवडावा. सौर उर्जेला प्राधान्य देण्यात यावे. नर्मदा काठावरील अनेक गावांमधील सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. जवळपास ६५० सौर लाईट बसविण्यासाठी प्रस्ताव आहेत. त्यापैकी एकही आलेला नाही. ते तातडीने उपलब्ध करून द्यावे अशा सुचना खासदार गावीत यांनी केल्या.बीएसएनएलची यंत्रणा जिल्ह्ययात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा. दुर्गम भागात अधिकाधिक ठिकाणी मोबाईल टॉवर उभारावे. पुरहाणीतील रस्त्यांची दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यात ११ रस्त्यांचा समावेश आहे. १३ कोटी रुपये त्यासाठी मंजुर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मुद्दा उपस्थित केला. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचीत केले.ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली.यावेळी सदस्यांनी देखील विविध प्रश्न उपस्थित केले.महामार्ग व ग्रामिण रस्ते दुरूस्तीला प्राधान्य देण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. अती पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी स्थानिक स्तरावर प्रस्ताव सादर करावेत. याकरीता विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा. महामार्ग दुरूस्तीसाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नवीन रस्त्यांनाही प्राधान्य दिले जात आहे.