शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

गाव, पाड्यांचे विद्युतीकरण पुर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात विद्युतीकरणाचे बाकी असलेले गाव व पाडे तातडीने पुर्ण करावे तसेच सोलरचे कामे तातडीने पुर्ण करावे अशा सुचना खासदार डॉ.हिना गावीत यांनी जिल्हा विकास व समन्वय समितीच्या सभेत बोलतांना दिल्या.जिल्हा विकास व समन्वय समितीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. खासदार डॉ.हिना गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शिरिष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, अशासकीय सदस्य डॉ.कांतीलाल टाटीया, डॉ.रविंद्र बैसाणे, बबीता नाईक, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.यावेळी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, जिल्ह्यातील दुर्गम भागात अनेक गाव व पाडे अद्यापही विद्युतीकरणापासून वंचीत आहेत. या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना वेग देण्यात यावा. ज्या ठिकाणी भौगोलिक अडचणी असतील अशा ठिकाणी सौर उर्जेचा पर्याय निवडावा. सौर उर्जेला प्राधान्य देण्यात यावे. नर्मदा काठावरील अनेक गावांमधील सौरउर्जेवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. जवळपास ६५० सौर लाईट बसविण्यासाठी प्रस्ताव आहेत. त्यापैकी एकही आलेला नाही. ते तातडीने उपलब्ध करून द्यावे अशा सुचना खासदार गावीत यांनी केल्या.बीएसएनएलची यंत्रणा जिल्ह्ययात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावा. दुर्गम भागात अधिकाधिक ठिकाणी मोबाईल टॉवर उभारावे. पुरहाणीतील रस्त्यांची दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली आहे. निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यात ११ रस्त्यांचा समावेश आहे. १३ कोटी रुपये त्यासाठी मंजुर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी मुद्दा उपस्थित केला. यासाठी प्रत्येक तालुकानिहाय आढावा बैठक घेण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सुचीत केले.ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भारुड यांनी दिली.यावेळी सदस्यांनी देखील विविध प्रश्न उपस्थित केले.महामार्ग व ग्रामिण रस्ते दुरूस्तीला प्राधान्य देण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. अती पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात देखील होत आहेत. या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी स्थानिक स्तरावर प्रस्ताव सादर करावेत. याकरीता विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून घ्यावा. महामार्ग दुरूस्तीसाठी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. नवीन रस्त्यांनाही प्राधान्य दिले जात आहे.