शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीमुळे इतरांचेही होताय हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:58 IST

शेतक:यांची वीजजोडणी खंडीत : पिकांना पाणी देणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतक:यांच्या  कृषी पंपाचे थकित  वीज बिलासाठी आता थेट विद्युत रोहित्रावरील विजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली आह़े  मात्र, या कारवाईमुळे नियमीत बील भरणा:या शेतकरींना झळ बसत आह़े पाण्याअभावी पीके करपत आहेत़ या प्रकरणी महावितरणच्या वरीष्ठ अधिका:यांनी दखल घेण्याची शेतक:यांची मागणी आह़ेतळोदा तालुक्यात साधारण पावणे सहा हजार कृषी पंप धारक शेतक:यांची संख्या आहे. या सर्व कृषी पंपधारक शेतक:यांना येथील वीज वितरण कंपनीकडून  वीजपुरवठा दिला आह़े तथापि यातील जवळ जवळ 5 हजार 500 शेतक:यांकडे या विभागाचे 46 कोटी रुपयांचे विज बिल गेल्या अनेक वर्षांपासून थकले आह़े या थकित बिलांसाठी महावितरणतर्फे अनेक वेळा सूचना दिल्या आहेत़ परंतू शेतकरी बील भरण्याबाबत सकारात्मकता दाखवत नाही़ परिणामी महावितरण कंपनीने त्यांच्या कृषी पंपाच्या जोडण्या कट केल्या आहेत़ तरीही थकबाकीदार शेतकरी पुन्हा केबल टाकून वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आता थेट कृषी पंपाला विजपुरवठा करणारे विद्युत रोहित्रच बंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आह़े आता पावेतो जवळपास 70 विद्युत रोहित्र बंद करण्यात आल्याची माहिती संबंधित विज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकारीने दिली आहे. थकबाकीदार शेतक:यांचा वीजपुरवठा कंपनीने खंडित केला असला, तरी त्याची झळ नियमीत वीज बिल भरणा:या शेतक:यांनादेखील बसत आह़े कारण खंडित पुरवठामुळे पिकांना पाणीही देता येत नसल्याने पिक जगविण्यासाठी शेतक:यांना मेहनत घ्यावी लागत आह़े दरम्यान, शेतक:यांचा रब्बी हंगाम सुरु झाला आहे. या हंगामतील गहु, हरभरा, रबी ज्वारीची पेरणी करण्यासठी लगबग सुरु झाली आहे त्यासाठी सुरुवातीला कोरडे झालेले क्षेत्र भिजवावे लागते मात्र पाणी अभावी क्षेत्र तसेच पडले आह़े वीज मंडळाच्या आडमुठेपणामुळे या पेरण्या लांबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या शिवाय पाणी अभावी केळी, पपई, ऊस ही पीकेही करपत  आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्ण हतलब झाला आहे. आधीच सततच्या भारनियमनामुळे जसे-तसे पिक वाचविलेत तसेच परतीच्या पावसाने केलेले मोठे नुकसान याने शेतक:यांची पूर्ण कंबर मोडली गेली आह़े जेमतेम रब्बी हंगामावर आता शेतक:यांचे लक्ष केन्द्रीत झाले असतांना वीज वितरण कंपनीने थकित बिलांसाठी तगादा लावला आह़े साहजिकच शेतकरी मेटाकुटीला आला असल्याची व्यथा आह़े निदान वीज खात्याच्या मंत्र्यांनी शेतक:यांची विदारक अवस्था लक्षात घेवून वीज वितरण कंपनीने हाती घेतलेली कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या मोहीमेला मार्च-एप्रिल र्पयत स्थगिती द्यावी अशी शेतक:यांची मागणी आह़़े  अन्यथा या विरोधात शेतक:यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आह़े