शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नंदुरबारात फक्त दोनच ठिकाणी वीज अटकाव केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:37 IST

वीज अटकाव मनोरे : दुर्गम भागात अधिक घटना, वीज पडून मृतांची संख्या दरवर्षी वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकाशातील नैसर्गिक वीज अटकविण्यासाठी असलेली यंत्रणा जिल्ह्यात पुरेशी नाही. यापूर्वी करण्यात आलेल्या सव्र्हेत सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. पैकी दोनच ठिकाणी वीज अटकाव मनोरे बसविले. पूर्वीची दोन आहेत. अधिकृतरित्या केवळ चारच ठिकाणी असे मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविणे अपेक्षित आहे. विशेषत: दुर्गम भागात ते गरजेचे असल्याचे चित्र गेल्या काही वर्षातील घटनांवरून स्पष्ट होते.नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये पावसाळ्यात वीज पडून जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडतात. त्यामुळे आकाशातील विजेला अटकाव करण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा उंच मनोरे उभारले जातात. शासनाच्या वतीने त्यांची उभारणी होते. परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या विचार करता शासन, प्रशासनातर्फे अवघ्या चार ठिकाणीच ते उभे करण्यात आले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविण्याची सद्य:स्थितीतील गरज आहे. गेल्या दोन ते तीन वर्षातील घटना लक्षात घेता वीज पडून मृत्यू होणा:यांची संख्या अधिक आहे.येथे आहेत अटकाव मनोरे..जिल्ह्यात अवघ्या चार ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यात नंदुरबार शहर, बालआमराई, ता.नवापूर, कळंबू, ता.शहादा व तळोदा शहर या ठिकाणांचा समावेश आहे. शासनाने सर्वेक्षण करून सात ठिकाणांची निवड केली होती. त्यापैकी केवळ दोन ठिकाणी मनोरे बसविण्यात आले आहेत. त्यापूर्वी दोन ठिकाणी होतेच. उर्वरित पाच ठिकाणीदेखील तातडीने मनो:यांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.अनेकांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या काही वर्षातील वीज पडून मृत पावलेल्यांची आकडेवारी पाहिली तर दरवर्षी त्यात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.  2014 मध्ये सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. 2015 मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये सहा तर गेल्या वर्षी देखील पाच जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय पाळीव प्राण्यांची संख्या आणखी वेगळी आहे. एक लाख सानुग्रह अनुदानवीज पडून होणा:या मृत्यूस  नैसर्गिक मृत्यू म्हटले जाते. त्यासाठी तलाठीचा पंचनामा, पोलिसात करण्यात आलेली नोंद या आधारावर मृतकाच्या वारसास एक लाख रुपये मदत दिली जाते. याशिवाय पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास त्यालाही नुकसान भरपाई दिली जाते.विविध कारणेवीज पडण्याचे प्रमाण का वाढले याबाबत विविध मतप्रवाह आहेत. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारे वादळवा:याच्या वेळी वीज पडण्याचे प्रमाण अधिक राहत असे. आता तर संपूर्ण पावसाळा तसेच बेमोसमी पावसाच्या वेळीदेखील वीज पडत आहे. पर्यावरणवादी तसेच इतर अभ्यासकांचे याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, वृक्षांची कमी झालेली संख्या ही कारणे दिली जात आहेत. एकुणच वीज पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.जिल्ह्यात ज्या चार ठिकाणी नैसर्गिक वीज अटकाव मनोरे आहेत त्या मनो:यांची वीज अटकाव करण्याची रेंज ही केवळ पाच ते सात किलोमीटर परिघाच्या आतच आहे. याशिवाय कारखाने, पवन ऊर्जा कंपनीचे टॉवर, मोठय़ा शासकीय व खासगी इमारती यांच्यासह मोबाइल टॉवरवरदेखील वीज अटकाव करण्यासाठी तशी यंत्रणा उभारली जाते. तसा शासनाचा नियमच आहे. ठरावीक उंचीची इमारत, टॉवर उभारल्यास वीज अटकाव यंत्रणा तेथे बसवावीच लागते. परंतु त्यांची क्षमता ही तेवढय़ा एरियापुरतीच मर्यादित राहते. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग इतर ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी होऊ शकत नाही. त्यामुळे शासनातर्फे उभारण्यात येणा:या मनो:यांचाच सर्वाधिक उपयोग होत असतो.जिल्ह्यात सर्वाधिक वीज पडण्याचे प्रमाण पाहता सर्वेक्षण करून सात ठिकाणी मनोरे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यात नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील भाग, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, नवापूर शहर व शहादा शहर या ठिकाणांचा समावेश होता.