शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात फक्त दोनच ठिकाणी वीज अटकाव केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 12:37 IST

वीज अटकाव मनोरे : दुर्गम भागात अधिक घटना, वीज पडून मृतांची संख्या दरवर्षी वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकाशातील नैसर्गिक वीज अटकविण्यासाठी असलेली यंत्रणा जिल्ह्यात पुरेशी नाही. यापूर्वी करण्यात आलेल्या सव्र्हेत सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. पैकी दोनच ठिकाणी वीज अटकाव मनोरे बसविले. पूर्वीची दोन आहेत. अधिकृतरित्या केवळ चारच ठिकाणी असे मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविणे अपेक्षित आहे. विशेषत: दुर्गम भागात ते गरजेचे असल्याचे चित्र गेल्या काही वर्षातील घटनांवरून स्पष्ट होते.नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये पावसाळ्यात वीज पडून जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडतात. त्यामुळे आकाशातील विजेला अटकाव करण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा उंच मनोरे उभारले जातात. शासनाच्या वतीने त्यांची उभारणी होते. परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या विचार करता शासन, प्रशासनातर्फे अवघ्या चार ठिकाणीच ते उभे करण्यात आले आहेत. त्यांची संख्या आणखी वाढविण्याची सद्य:स्थितीतील गरज आहे. गेल्या दोन ते तीन वर्षातील घटना लक्षात घेता वीज पडून मृत्यू होणा:यांची संख्या अधिक आहे.येथे आहेत अटकाव मनोरे..जिल्ह्यात अवघ्या चार ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभारण्यात आलेले आहेत. त्यात नंदुरबार शहर, बालआमराई, ता.नवापूर, कळंबू, ता.शहादा व तळोदा शहर या ठिकाणांचा समावेश आहे. शासनाने सर्वेक्षण करून सात ठिकाणांची निवड केली होती. त्यापैकी केवळ दोन ठिकाणी मनोरे बसविण्यात आले आहेत. त्यापूर्वी दोन ठिकाणी होतेच. उर्वरित पाच ठिकाणीदेखील तातडीने मनो:यांची उभारणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.अनेकांचा मृत्यूजिल्ह्यात गेल्या काही वर्षातील वीज पडून मृत पावलेल्यांची आकडेवारी पाहिली तर दरवर्षी त्यात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.  2014 मध्ये सात जणांचा वीज पडून मृत्यू झाला होता. 2015 मध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये सहा तर गेल्या वर्षी देखील पाच जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय पाळीव प्राण्यांची संख्या आणखी वेगळी आहे. एक लाख सानुग्रह अनुदानवीज पडून होणा:या मृत्यूस  नैसर्गिक मृत्यू म्हटले जाते. त्यासाठी तलाठीचा पंचनामा, पोलिसात करण्यात आलेली नोंद या आधारावर मृतकाच्या वारसास एक लाख रुपये मदत दिली जाते. याशिवाय पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास त्यालाही नुकसान भरपाई दिली जाते.विविध कारणेवीज पडण्याचे प्रमाण का वाढले याबाबत विविध मतप्रवाह आहेत. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला होणारे वादळवा:याच्या वेळी वीज पडण्याचे प्रमाण अधिक राहत असे. आता तर संपूर्ण पावसाळा तसेच बेमोसमी पावसाच्या वेळीदेखील वीज पडत आहे. पर्यावरणवादी तसेच इतर अभ्यासकांचे याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, वृक्षांची कमी झालेली संख्या ही कारणे दिली जात आहेत. एकुणच वीज पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.जिल्ह्यात ज्या चार ठिकाणी नैसर्गिक वीज अटकाव मनोरे आहेत त्या मनो:यांची वीज अटकाव करण्याची रेंज ही केवळ पाच ते सात किलोमीटर परिघाच्या आतच आहे. याशिवाय कारखाने, पवन ऊर्जा कंपनीचे टॉवर, मोठय़ा शासकीय व खासगी इमारती यांच्यासह मोबाइल टॉवरवरदेखील वीज अटकाव करण्यासाठी तशी यंत्रणा उभारली जाते. तसा शासनाचा नियमच आहे. ठरावीक उंचीची इमारत, टॉवर उभारल्यास वीज अटकाव यंत्रणा तेथे बसवावीच लागते. परंतु त्यांची क्षमता ही तेवढय़ा एरियापुरतीच मर्यादित राहते. त्यामुळे त्यांचा फारसा उपयोग इतर ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी होऊ शकत नाही. त्यामुळे शासनातर्फे उभारण्यात येणा:या मनो:यांचाच सर्वाधिक उपयोग होत असतो.जिल्ह्यात सर्वाधिक वीज पडण्याचे प्रमाण पाहता सर्वेक्षण करून सात ठिकाणी मनोरे बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यात नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील भाग, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, नवापूर शहर व शहादा शहर या ठिकाणांचा समावेश होता.