शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीला तिसºयांदा स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगिती मिळालेल्या धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या मध्यावधी निवडणुकीला आता तिसऱ्यांदा बेमुदत स्थगिती मिळाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगिती मिळालेल्या धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या मध्यावधी निवडणुकीला आता तिसऱ्यांदा बेमुदत स्थगिती मिळाली आहे. या निवडणुका आता कोरोना नियंत्रणानंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.धुुळे-नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदार संघातील मध्यावधी निवडणूक जाहिर झाली होती. त्यासाठी भाजपतर्फे अमरिशभाई पटेल व काँग्रेसतर्फे अभिजीत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीलाही त्यावेळी ६० दिवसांची स्थगिती दिली होती.हा कालावधी मे च्या शेवटच्या आठवड्यात पुर्ण झाला होता. तथापी कोरोनाची परिस्थिती गंभीर होत गेल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आले. त्यामुळे त्यावेळी देखील दुसऱ्यांदा ४५ दिवसांची निडणुकीला स्थगिती दिली होती. तो कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतरही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने या निवडणुकीला आता बेमुदत स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या निवडणुकीच्या कालावधी जानेवारी २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे कुणीही उमेदवार विजयी झाल्यास त्यांचा कालावधी तोपर्यंत राहणार आहे. आधीच कमी कालावधीसाठी निवडणुका होत असल्याने राजकीय गोटात त्याबाबत एक वेगळी चर्चा होती.या कमी कालावधीतही आता पुन्हा लॉकडाऊनमुळे सहा महिने स्थगितीतच गेले आहेत. अजून किती काळ स्थगिती राहील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.या निवडणुकीला तिसºयांदा स्थगिती मिळाली असून त्यावर आता कालावधी दिलेला नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्यानंतरच निवडणुकीची शक्यता आहे. बिहार विधान सभेच्या निवडणुकीसंदर्भात सरकार काय निर्णय घेते त्या निर्णयावरही या निवडणूक प्रक्रियेचा निर्णय अवलंबून राहणार आहे.-अभिजीत पाटील, उमेदवार.विधान परिषद निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगच निर्णय घेऊ शकतो. आणि बिहार विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने जर निर्णय घेतला तर मग विधानपरिषद निवडणूकही त्याबरोबर लागू शकते, असे वाटते. पण शेवटी याबाबत निवडणूक आयोगाच निर्णय घेईल.-अमरिशभाई पटेल, उमेदवार.