शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:36 IST

मराठा समाज : प्रकाशा येथे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

तळोदा : मराठा समाजाचा सहावा सामूहिक विवाह सोहळा रविवारी प्रकाशा, ता.शहादा येथे झाला. या सोहळ्यात आठ जोडपींचे शुभमंगल लावण्यात आले. या विवाह सोहळ्याला वºहाडींबरोबरच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.प्रारंभी पुलवामा घटनेत शहीद झालेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळ, मराठा समाज प्रबोधन मंडळ व मराठा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचा सहावा सामूहिक विवाह सोहळा प्रकाशा येथील अन्नपूर्णा माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी समाजातील आठ जोडपींचे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पुरोहितांच्या मंत्रोच्चाराने शुभमंगल लावण्यात आले. तत्पूर्वी आठही वरांची घोड्यावरून वाजत-गाजत वरात काढण्यात आली. या वेळी खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार सुधीर तांबे, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, मराठा आरक्षण समितीचे समन्वयक संतोषराव मराठे, श्याम जाधव, भटू वाघारे, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, माजी उपनगराध्यक्षा शोभा मोरे, धुळे जिल्हा शिवसेना नेते अतुल सोनवणे, बोईसर येथील पत्रकार विठोबा मराठे, उद्योजक अनंत चौथे, राजेश जाधव, अरुण चौधरी, नगरसेवक गौरव वाणी, भास्कर मराठे, योगेश चौधरी, संदीप परदेशी, संदीप मराठे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.या वेळी आमदार तांबे म्हणाले की, अशा प्रकारच्या सामूहिक विवाहातून समाजाचेही परिवर्तन होते व महागाईच्या जमान्यात ती काळाची गरज ठरली आहे. त्यामुळे सर्वच समाजाने सामूहिक विवाह सोहळ्याची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.१० जणांचा गौरवया विवाह सोहळ्यात परिवर्तन चळवळीतर्फे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या १० जणांचा सपत्नीक समाजविभूषण व समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यात आनंदराव वाल्मिक चौथे, राजेंद्रकुमार कृष्णराव गावीत, भटू काशीनाथ वाघारे, राजेश भास्करराव जाधव, कैलासराव विश्राम मराठे, विष्णू भिकन बाळदे, संजय प्रेमचंद जाधव, भास्करराव भिवसन कदमबांडे, विश्वासराव उखाजी मराठे, रामचंद्र दशरथ पाटील, डॉ.शिरीष निंबाजी शिंदे, शेख युनूस शेख बागवान, नवनीत विठ्ठल शिंदे, डॉ.एन.डी. नांद्रे, अशोकराव दौलतराव थोरात यांचा समावेश होता. आदर्श कुटुंब म्हणून सेलंबा येथील ईश्वर पवार यांना गौरविण्यात आले तर मराठा समाज उद्योजक विकास मंडळ जळगाव व धुळे-नंदुरबार मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळालाही गौरविण्यात आले.परिवर्तन चळवळीच्या कार्याचा अहवाल विठ्ठल मराठे यांनी मांडला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भटू मराठे, नंदराव कोते व विकास पाटील यांनी केले. कार्यक्रमास अनेक दात्यांनी आर्थिक व वस्तूस्वरुपात मदत केली. सोहळ्यास वधू-वरांकडील वºहाडींसोबत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यामुळे केदारेश्वर मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. विवाह सोहळ्यासाठी प्रा.डॉ.रवींद्र कदम, गिरधर पवार, शरदराव चव्हाण, विजय कदम, वामनराव चव्हाण, शिरीष जगदाळे, रवींद्र साळुंखे, युवराज मराठे, देवाजी बोराणे, धनराज पाचोरे, युवराज मुदगल, मनोज शिंदे, मनोज सरोदे, अर्जुन खांडवे, सुनील पवार, रमेश कुटे, रतिलाल साळुंखे, निलेश चव्हाण, कमलेश चव्हाण, हेमंत कदम, गणेश काळे, गोपाल गायकवाड, ईश्वर खयडे, कृष्णा पेखळे, गणेश बागडे, प्रफुल पोटे यांच्यासह विविध गावातील समाज बांधवांनी परिश्रम घेतले.