शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या तळोदा भेटीच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

तळोदा शहराला स्वातंत्र्य व समाजसुधारकांच्या चळवळीतील अनेक थोर नेत्यांनी भेटी दिल्याचे सांगितले जाते. त्यापैकी काही महापुरुषांच्या भेटी ...

तळोदा शहराला स्वातंत्र्य व समाजसुधारकांच्या चळवळीतील अनेक थोर नेत्यांनी भेटी दिल्याचे सांगितले जाते. त्यापैकी काही महापुरुषांच्या भेटी या अधिकृत नोंदीअभावी गुलदस्त्यातच आहेत तर काहींच्या अधिकृत नोंदी उपलब्ध आहेत. अधिकृत नोंदी उपलब्ध असणाऱ्या भेटींपैकी १३ मार्च १९४० रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचा तळोदा शहरातील इतिहास प्रसिद्ध बारगळांच्या गढीत दिलेल्या भेटीचा समावेश आहे. इंग्रजांच्या जोखडातून देशाला स्वतंत्र करण्यासाठी सुरू असणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे योगदान राहिले आहे. त्यांनी देशाच्या फाळणीला व काँग्रेसच्या धोरणांना प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची सुरक्षा वाढवणे, शस्त्र सज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह धरला. स्वातंत्र्य लढ्याला रसद पुरविण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतात भेटी देऊन निधी गोळा करण्याचे काम सुरू केले होते. त्याच अभियानाअंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर तळोदा येथे आल्याच्या नोंदी आहेत. तळोदा येथील सामाजिक कार्यकर्ते जहागीरदार अमरजित बारगळ यांचे आजोबा जहागीरदार शंकरराव बारगळ यांनी या भेटीत सावरकरांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. १३ मार्च १९४० रोजी दुपारी दोन वाजता बारगळांच्या गढीत स्वातंत्रवीर सावरकर यांचे आगमन झाले. त्यावेळी गावकऱ्यांतर्फे त्यांना देशकार्यासाठी निधीही देण्यात आला असल्याचे इतिहास अभ्यासकांकडून सांगण्यात येते. याप्रसंगी सावरकर यांनी देशभक्तीपर भाषणही केले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी त्यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे सांगितले जाते.

स्मृती जतन करण्यासाठी प्रयत्न आवश्यक

गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असणाऱ्या तळोदा तालुक्याला भौगोलिक स्थानांसह सांस्कृतिक महत्त्व आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अहिल्याबाई होळकरांपर्यंत आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यत ऐतिहासिकदृष्ट्याही वेगळे महत्त्व आहे. तळोदा तालुक्यासह शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. १३ मार्च १९४० रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी तळोदा शहराला भेट दिली. या भेटीला ८१ वर्षांचा कालावधी उलटला आहे. एवढा मोठा कालावधी उलटून व नोंदीबाबत अधिकृत नोंदी, पुरावे, दस्तऐवज असताना सावरकरांच्या तळोदा भेटीबाबत अनेक जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सावरकरांच्या तळोदा भेटीचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून भेटीच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा येणाऱ्या पुढील पिढ्यांपर्यंत संक्रमित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सावरकरांच्या तळोदा भेटीच्या स्मृतींना उजाळा देऊन त्या जतन करणे आवश्यक आहे. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाकडून स्मृतींना उजाळा देण्यासाठी १३ मार्च रोजी बारगळ गढीला भेट देऊन प्रतिमा पूजन केले जाते. मात्र, या प्रयत्नांना सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय चळवळीच्या मदतीची गरज आहे.