शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

संडे स्पेशल मुलाखत-२७ वर्षांपासून घेतल्या जाताय भुकंपाच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 13:21 IST

सावळदा भुकंप मापन केंद्रात आधुनिक उपकरणे सरदार सरोवर निगमचे सावळदा येथील भुकंप मापक केंद्र परिसराच्या दृष्टीने महत्वाचे आहे. शनिवारी बसलेल्या धक्क्याची माहिती लागलीच उपलब्ध होऊ शकली. -दिलीप जाधव.

मनोज शेलारलोकमत न्यूज नेटवर्कसावळदा येथील भुकंप मापक केंद्रात अत्याधुनिक सिस्मोग्राफ यंत्राद्वारे भुकंपाची नोंद घेतली जाते. १९९३ साली सरदार सरोवर निगम अंतर्गत स्थापन झालेल्या या केंद्राला थेट गांधीनगर येथील केंद्राला जोडण्यात आले असून तेथून ॲानलाईन डाटा वेबसाईटवर पहाण्यास मिळतो. येथील केंद्रामुळे परिसरातील भुकंपाच्या नोंदी लागलीच आणि अचुक मिळण्यास मदत होत असल्याची माहिती या केंद्राचे प्रमुख दिलीप जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

सावळदा केंद्राची स्थापना कधी झाली आणि त्याचे कार्य काय?सरदार सरोवर प्रकल्पाअंतर्गत १९९३ साली सावळदा येथे भुकंप मापन केंद्र स्थापन करण्यात आले. भौगोलिक संशोधन आणि मापन या पद्धतीनुसार तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार हे केंद्र सावळदा येथे स्थापन करण्यात आले. पूर्वी या केंद्रात भूकंप नोंदणीचे जुने उपकरणे होते. नंतर त्यात अत्याधुनिक यंत्र बसविण्यात आले. हे केंद्र सरदार सरोवर निगम अंतर्गत येते. सरदार सरोवर निगमअंतर्गत गांधीनगर येथील मुख्य केंद्राशी या केंद्राची लिंकींग आहे. या केंद्रात पूर्वी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त होती. परंतु आता ॲानलाईनमुळे येथील काही कर्मचारी गांधीनगर येथे वर्ग करण्यात आले असून आता येथे चार कर्मचारी कार्यरत आहेत.सिस्मोग्राफ उपकरणाचे कार्य काय असते?भुकंपाची तीव्रता आणि वेळ याची माहिती नोंद करण्यासाठी या उपकणारचा वापर आता केला जातो. पूर्वी जुन्या पद्धतीने या ठिकाणी भुकंपाची तीव्रता आणि वेळ व स्थान यांची नोंदणी केली जात होती. जमिनीत होणारऱ्या हालचालींची नोंद हे यंत्र घेते. त्यानुसार ग्राफ तयार करून ते उपलब्ध करून देते. त्यामुळे भुकंपाचे केंद्र आणि त्याची तीव्रता लागलीच लक्षात येऊन प्रशासनाला माहिती दिली जाते. याशिवाय गांधीनगर येथील केंद्रातून ॲानलाईन डाटा सर्वत्र उपलब्ध होत असतो. त्यामुळे प्रशासनाला उपाययोजना  करणे व जनतेला आवाहन करणे सोयीचे ठरते. 

एकुण नऊ केंद्र... सरदार सरोवर निगम अंतर्गत एकुण नऊ भुकंपमापन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रात एकमेव सावळदा केंद्र आहे. गुजरातमध्ये पाच तर मध्यप्रदेशात तीन केंद्र आहेत. ही सर्व केंद्र गांधीनगर येथील मुख्य केंद्राशी जोडण्यात आले असून ते ॲानलाईन डाटा तयार करते.अनेक नोंदी... भुकंपाच्या अनेक नोंदी या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत. बारीकसारीक नोंदी देखील होत असतात. परंतु त्याची जाणीव आपल्याला होत नाहीत. दोन किंवा अडीच पेक्षा अधीक रिक्टर स्केलच्या तीव्रवतेचे धक्केच जाणवत असतात. शनिवारी आलेले धक्के हे अडीचपेक्षा अधीक असल्याने ते जाणवले. ७०० कि.मी.ची नोंद... या केंद्राअंतर्गत ७०० ते ८०० कि.मी.मधील भुकंपाची नोंद घेतली जाते. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील भुकंपांचाही तीव्रता या ठिकाणी नोंदली गेली होती. अर्थात गांधीनगर केंद्र हे मध्यवर्ती असल्याने तेथेच सर्व डाटा तयार होतो.