शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका इमारतीचे ई भुमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:25 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पालिकेच्या अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पालिकेच्या अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दुपारी १ वाजता ॲानलाईन पद्धतीने करणार आहे. त्याचा लाईव्ह सोहळा नाट्यमंदीरात निमंत्रीतांच्या उपस्थितीत होणार असून मुख्यमंत्री ठाकरे संबोधीत करणार असल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. रघुवंशी यांनी सांगितले, या दोन्ही कामांचे भुमिपूजन तसेच उद्‌घाटन आठ महिन्यांपूर्वी करण्यात येणार होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौराही निश्चित झाला होता. परंतु परिवारात दु:खद घटना घडल्याने तो कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव, लॅाकडाऊन यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा होऊ शकला नाही.त्यामुळे हा सोहळा ॲानलाईन पद्धतीने करण्याचे नियोजन     करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला मान्यता दिली. त्यामुळे     रविवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मा अद्ययावत इमारतीचे भुमिपूजन, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्‌घाटन   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यानंतर ते जनतेला संबोधीत करणार आहेत. या सर्व सोहळ्याचे प्रेक्षेपण नाट्यगृहात लावण्यात येणा-या एलईडीवर करण्यात येणार आहे. केवळ निमंत्रीतांसाठी हा सोहळा राहणार आहे. पालिकेची इमारत न्यायालयाच्या जुन्या जागेवर बांधण्यात येणार      आहे. त्यासाठी एकुण २३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. दोन वर्षात ही इमारत बांधून पुर्ण होणार आहे. जलतरण तलाव देखील         ॲालम्पीक स्पर्धांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. त्याला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. 

मॅा-बेटी गार्डनला मिनाताई ठाकरे नावn पालिकेतरर्फे एक कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या मॅा-बेटी गार्डनला मॅासाहेब स्व.मिनाताई ठाकरे मॅा-बेटी गार्डन असे नाव देण्याचे निश्चित झाले असल्याचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. या गार्डनमध्ये केवळ महिला आणि मुलींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तरुणींना प्रेरणादायी ठरणाऱ्या दहा कर्तूत्ववान महिलांचे शिल्प देखील बसविण्यात येणार असून लवकरच त्याचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.