शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ‘शुभमंगल’ योजनेबाबत निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 12:31 IST

जनजागृती होणे गरजेचे: दहा वर्षामध्ये केवळ 96 प्रस्तावांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या शुभमंगल सामुदायिक विवाह योजनेबाबत जनजागृतीची आवश्यकता आह़े गेल्या दहा वर्षामध्ये जिल्ह्यातून केवळ 96 प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली़ त्यामुळे साहजिकच योजनेबाबत लाभार्थीच्या मनात निरुत्साह का आहे? याचा शोध प्रशासनाला घेणे महत्वाचे ठरेल़सामान्य प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग तसेच शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन शेतकरी, एक लाखाहून कमी उत्पन्न असलेले लाभार्थीना शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेता येतो़ याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागत असतो़ लाभार्र्थीना योजनेंतर्गत 10 हजार रुपयांची लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत                  असत़े त्यासाठी लाभार्थीना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, भूमिहीन शेतकरी असल्यास त्याचा पुरावा आदी दस्तावेज विभागाकडे सादर करावे लागत असतात़ त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून प्रस्तावांची  तपासणी करून लाभार्थीच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात येत असत़े योजनेचा लाभ सामूहिक किंवा वैयक्तिक विवाह पध्दतींमध्येही घेता येणे शक्य असत़े सामूहिक विवाहात किमान सहा जोडप्यांचे विवाह होणे गरजेचे असत़े तसेच वैयक्तिक विवाहामध्येही योजनेचा लाभ घेता येतो, परंतुसोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असत़ेलाभार्थ्ीमध्ये उदासीनता नापिकी, शेतीच्या उत्पन्नात होणारी घट, बेरोजगारी यामुळे शेतकरी तसेच शेतमजूर हवालदिल झाले आहेत़ त्यातच, घरात लगAाची मुलगी असल्याने तिच्याही लगAाची चिंता पालकांना सतावत असत़े या सर्व नैराश्यातून अनेक वेळा आत्महत्येचाही विचार अनेकांच्या मनात येत असतो़ त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या समाजघटकांना मदत व्हावी यासाठी शासनाकडून शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू करण्यात आली़ योजनेत लाभार्थ्ीना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असत़े परंतु लाभार्थीमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत असत़े लाभाची रक्कम वाढवावीशुभमंगल विवाह योजनेंतर्गत संबंधित लाभार्र्थीना मात्र दहा हजार रुपयांची मदत देण्यात येत़े विवाहाचा खर्च बघता ही लाभाची रक्कम फारच कमी असल्याचे लाभार्थीकडून तसेच योजनेचा लाभ घेण्यास पात्र असलेल्यांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या महागाईच्या तुलनेत शासनाकडून करण्यात येत असलेली ही मदत  अत्यंत तोकडी असल्याचे मत व्यक्त होत आह़े त्यामुळे शासनाने लाभाच्या रकमेत वाढ करावी अशीही मागणी अनेकांकडून करण्यात येत आह़े लाभाची रक्कम कमी व त्यासाठी कागदोपत्री अटी-शर्ती अधिक असल्याने अनेकांकडून लाभ घेण्याचे टाळण्यात येत आह़े विशेष म्हणजे लाभाची रक्कम मिळण्यासही उशीर होत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे योजनेचा लाभ न घेतलेलाच बरा अशीच काहीशी धारणा लाभार्थीची झालेली आह़े दुर्गम भागात राहत असलेल्या लाभार्थ्ीमध्ये शुभमंगल योजनेची अजून जनजागृती झालेली नाही़ योजना सर्वत्र पसरलेली नसल्याचे चित्र आलेल्या प्रस्तावातून उमटताना दिसून येत आह़े त्यामुळे प्रशासनाने दुर्गम भागात योजनेचा प्रचार-प्रसार होईल, असे नियोजन करणे गरजेचे आह़े