शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नंदुरबारात ‘शुभमंगल’ योजनेबाबत निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 12:31 IST

जनजागृती होणे गरजेचे: दहा वर्षामध्ये केवळ 96 प्रस्तावांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या शुभमंगल सामुदायिक विवाह योजनेबाबत जनजागृतीची आवश्यकता आह़े गेल्या दहा वर्षामध्ये जिल्ह्यातून केवळ 96 प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली़ त्यामुळे साहजिकच योजनेबाबत लाभार्थीच्या मनात निरुत्साह का आहे? याचा शोध प्रशासनाला घेणे महत्वाचे ठरेल़सामान्य प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्ग तसेच शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन शेतकरी, एक लाखाहून कमी उत्पन्न असलेले लाभार्थीना शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेता येतो़ याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागत असतो़ लाभार्र्थीना योजनेंतर्गत 10 हजार रुपयांची लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत                  असत़े त्यासाठी लाभार्थीना जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र, भूमिहीन शेतकरी असल्यास त्याचा पुरावा आदी दस्तावेज विभागाकडे सादर करावे लागत असतात़ त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून प्रस्तावांची  तपासणी करून लाभार्थीच्या प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्यात येत असत़े योजनेचा लाभ सामूहिक किंवा वैयक्तिक विवाह पध्दतींमध्येही घेता येणे शक्य असत़े सामूहिक विवाहात किमान सहा जोडप्यांचे विवाह होणे गरजेचे असत़े तसेच वैयक्तिक विवाहामध्येही योजनेचा लाभ घेता येतो, परंतुसोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असत़ेलाभार्थ्ीमध्ये उदासीनता नापिकी, शेतीच्या उत्पन्नात होणारी घट, बेरोजगारी यामुळे शेतकरी तसेच शेतमजूर हवालदिल झाले आहेत़ त्यातच, घरात लगAाची मुलगी असल्याने तिच्याही लगAाची चिंता पालकांना सतावत असत़े या सर्व नैराश्यातून अनेक वेळा आत्महत्येचाही विचार अनेकांच्या मनात येत असतो़ त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या समाजघटकांना मदत व्हावी यासाठी शासनाकडून शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू करण्यात आली़ योजनेत लाभार्थ्ीना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असत़े परंतु लाभार्थीमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत असत़े लाभाची रक्कम वाढवावीशुभमंगल विवाह योजनेंतर्गत संबंधित लाभार्र्थीना मात्र दहा हजार रुपयांची मदत देण्यात येत़े विवाहाचा खर्च बघता ही लाभाची रक्कम फारच कमी असल्याचे लाभार्थीकडून तसेच योजनेचा लाभ घेण्यास पात्र असलेल्यांकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या महागाईच्या तुलनेत शासनाकडून करण्यात येत असलेली ही मदत  अत्यंत तोकडी असल्याचे मत व्यक्त होत आह़े त्यामुळे शासनाने लाभाच्या रकमेत वाढ करावी अशीही मागणी अनेकांकडून करण्यात येत आह़े लाभाची रक्कम कमी व त्यासाठी कागदोपत्री अटी-शर्ती अधिक असल्याने अनेकांकडून लाभ घेण्याचे टाळण्यात येत आह़े विशेष म्हणजे लाभाची रक्कम मिळण्यासही उशीर होत असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे योजनेचा लाभ न घेतलेलाच बरा अशीच काहीशी धारणा लाभार्थीची झालेली आह़े दुर्गम भागात राहत असलेल्या लाभार्थ्ीमध्ये शुभमंगल योजनेची अजून जनजागृती झालेली नाही़ योजना सर्वत्र पसरलेली नसल्याचे चित्र आलेल्या प्रस्तावातून उमटताना दिसून येत आह़े त्यामुळे प्रशासनाने दुर्गम भागात योजनेचा प्रचार-प्रसार होईल, असे नियोजन करणे गरजेचे आह़े