शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

निराश्रित मातेला आधार देत जपली ममतेची रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 11:28 IST

यांचाही महिला दिन : पाणीपुरी विक्रेत्या महिलेची अशीही माणुसकी

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी ‘ये ना सोचो इस में अपनी हार है की जीत आहे़़।उसे अपनालोे जो भी जीवन की रीत है, ये जिद छोडो, यू ना तोडो, हर पल इक दर्पण हैै । या ओळी लिहिल्या होत्या़ जीवनाचा सारासार अर्थ सांगणाऱ्या या ओळींची प्रचिती नंदुरबारातील पाणीपुरी विक्रेत्या प्रमिला गुप्ता यांना पाहून येते़चाळीशी पार केलेल्या प्रमिलाबाई रामचंद्र गुप्ता ह्या नंदुरबार शहरातीलच रहिवासी़ प्रारंभी रेल्वे कॉलनी परिसरात राहणाºया प्रमिला ह्या विवाहपश्चात पतीसोबत वर्धा येथे राहत होत्या़ परंतू पतीने घराबाहेर काढल्यानंतर त्या पुन्हा नंदुरबार येथे माहेरी आल्या़ माहेरी राहत असताना छोट्या-मोठ्या कामांसह मजुरी करुन मुलगी आणि स्वत:चा उदरनिर्वाह केला़ हे सर्व सुरु असतानाच आईचे अकाली निधन होऊन मग दिशा आणि दशाच बदलली़ कौटूंबिक वाद झाल्याने त्यांना वडीलांच्या घराबाहेर पडावे लागले़ आपल्यामुळे मुलीची परवड नको म्हणून तिला अनाथ आश्रमात दाखल करत केले़ दोन वर्षे रेल्वे रनिंग रुममध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत दिवस काढले़ परंतू यातून भागत नसल्याने मग नंदुरबार शहरातील संजय टाऊन हॉल परिसरात पाणी पुरी विक्रीचा व्यवसाय सुरु केला़ प्रामुख्याने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात शिरकाव करुन स्वत:चे काही अंशी का होईना स्थान निर्माण करण्यात त्यांना यश आले़हे सर्व सुरळीत सुरु असताना मात्र एके दिवशी सायंकाळी एक निराधार महिला रस्त्यावर सामान घेत भटकत असल्याचे त्यांना दिसून आले़ अन्नपाण्यावाचून व्याकूळ झालेल्या या महिलेची पार्श्वभूमी जाणून घेत अन्न आणि पाणी देत थोड्या वेळासाठी जागाही करुन दिली़ परंतू पुढे काय असा प्रश्न होताच़ परंतू कधीही मागे न हटणाºया प्रमिलाबाईंनी त्या मातेला आईचा दर्जा देत घरी आणले़ गेल्या वर्षभरापासून दोघीही गवळीवाड्यात छोटीशी खोली भाड्याने घेत राहत आहेत़ अनोळखी असल्या तरी ममत्त्व ह्या धाग्याने दोघीही एकमेकींशी बांधल्या जाऊन आता त्या एकमेकींचा आधार झाल्या आहेत़ यातून दोघींच्या बºयाच समस्या दूर झाल्याची भावना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत आहे़दोघींच्या ह्या संघर्षपूर्ण अशा आयुष्याला साजेशा अशाच ओळी आनंद बक्षी साहेबांनी लिहिल्या असाव्यात़़ उसे अपनालोे जो भी जीवन की रीत है।़