शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

नंदुरबारात अफवांमुळे पोलिसांची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:49 IST

बालकांच्या अपहरणांचे कथित प्रकार : अनेकजण खाताहेत विनाकारण मार

नंदुरबार : लहान मुले पळवून नेण्याच्या चर्चेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार दिवसात विविध ठिकाणांहून व संशयावरून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. 15 दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावरील प्रकारामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अशा प्रकारची कुठलीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. राज्यात लहान मुलांना पळवून नेण्याच्या काही घटना घडल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावर जुन्या घटनांना नवीन रंग देऊन त्या प्रसारित करण्याचा प्रकारदेखील सुरू आहे. यामुळे मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याच्या अफवांना पेव फुटले आहे. सोशल मीडियावर दररोज याबाबत कुठली ना कुठली पोस्ट व्हायरल होत असते. परिणामी शहरात, वसाहतींमध्ये नवीन किंवा अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याच्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. काहींना तर विनाकारण पब्लिक मारही खावा लागला आहे. गेल्या पाच दिवसात विविध ठिकाणांहून नागरिकांनी पाच जणांना पोलिसांच्या हवालीदेखील केले आहे. चौकशीत मात्र, काहीच तथ्य आढळून आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.रेल्वेस्थानकावरील घटना15 दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावरील घटनेमुळे अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चाना ऊत आला आहे. सिंधी कॉलनीतील एक कुटुंब नातेवाइकांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी आले असता परराज्यातील एका मानसिक रुग्णाने तीन वर्षाच्या बालकाला उचलून नेत पळ काढण्याचा प्रय} केला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रय} अपयशी ठरला. पोलिसांनी संबंधिताला अटक करून त्याची चौकशी केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी वेळीच नागरिकांनी त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. बालकाशी त्याने काही अप्रिय केले असते तर काय झाले असते याचा विचार करूनच कुटुंबीयांना धडकी भरते. चार जण संशयावरून ताब्यातदोन दिवसांपूर्वी धानोरा रस्त्यावरील गजबजलेल्या भागातील वस्तीत फिरणा:या चार संशयितांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यात काहीही तथ्य आढळले नव्हते. त्यामुळे त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले होते. त्यानंतर दुस:याच दिवशी बसस्थानक परिसरातदेखील तसाच प्रकार घडला.शुक्रवारी सायंकाळी सिंधी कॉलनी परिसरात एका व्यक्तीने तीन वर्षाच्या बालकाला त्याच्या सायकलीवरून बसवून नेण्याचा प्रय} केला. त्यालाही नागरिकांनी ताब्यात घेत मार दिला व   पोलिसांच्या हवाली केले. तो देखील मानसिक रुग्णच निघाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्याविरुद्ध कुणीही फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्याच्या नातेवाइकांना समज देऊन त्यालाही सोडून देण्यात आले.बालकांच्या सुरक्षिततेचे काय?अपहरण करणारी टोळी नसेल किंवा अशा घटनांमध्ये   संबंधितांकडून अपहरणाचा उद्देश नसेल. परंतु अशा मानसिक रुग्णांकडून बालकाला काही अपाय केला गेला तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न पुढे येतो. असे मानसिक रुग्ण बालकांना उचलून नेण्यार्पयतची मजल मारतात तर त्यांना इजा पोहचविण्याबाबत देखील ते मागे-पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अशा बाबी सहजतेने न घेता गांभीर्याने घेणेदेखील आवश्यक आहे.