शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात अफवांमुळे पोलिसांची होतेय दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 12:49 IST

बालकांच्या अपहरणांचे कथित प्रकार : अनेकजण खाताहेत विनाकारण मार

नंदुरबार : लहान मुले पळवून नेण्याच्या चर्चेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन ते चार दिवसात विविध ठिकाणांहून व संशयावरून पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. 15 दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावरील प्रकारामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, अशा प्रकारची कुठलीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. राज्यात लहान मुलांना पळवून नेण्याच्या काही घटना घडल्या आहेत. याशिवाय सोशल मीडियावर जुन्या घटनांना नवीन रंग देऊन त्या प्रसारित करण्याचा प्रकारदेखील सुरू आहे. यामुळे मुले पळवून नेणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याच्या अफवांना पेव फुटले आहे. सोशल मीडियावर दररोज याबाबत कुठली ना कुठली पोस्ट व्हायरल होत असते. परिणामी शहरात, वसाहतींमध्ये नवीन किंवा अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याच्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. काहींना तर विनाकारण पब्लिक मारही खावा लागला आहे. गेल्या पाच दिवसात विविध ठिकाणांहून नागरिकांनी पाच जणांना पोलिसांच्या हवालीदेखील केले आहे. चौकशीत मात्र, काहीच तथ्य आढळून आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.रेल्वेस्थानकावरील घटना15 दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकावरील घटनेमुळे अशा प्रकारच्या अफवा आणि चर्चाना ऊत आला आहे. सिंधी कॉलनीतील एक कुटुंब नातेवाइकांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी आले असता परराज्यातील एका मानसिक रुग्णाने तीन वर्षाच्या बालकाला उचलून नेत पळ काढण्याचा प्रय} केला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रय} अपयशी ठरला. पोलिसांनी संबंधिताला अटक करून त्याची चौकशी केली असता तो मानसिक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी वेळीच नागरिकांनी त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. बालकाशी त्याने काही अप्रिय केले असते तर काय झाले असते याचा विचार करूनच कुटुंबीयांना धडकी भरते. चार जण संशयावरून ताब्यातदोन दिवसांपूर्वी धानोरा रस्त्यावरील गजबजलेल्या भागातील वस्तीत फिरणा:या चार संशयितांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यात काहीही तथ्य आढळले नव्हते. त्यामुळे त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले होते. त्यानंतर दुस:याच दिवशी बसस्थानक परिसरातदेखील तसाच प्रकार घडला.शुक्रवारी सायंकाळी सिंधी कॉलनी परिसरात एका व्यक्तीने तीन वर्षाच्या बालकाला त्याच्या सायकलीवरून बसवून नेण्याचा प्रय} केला. त्यालाही नागरिकांनी ताब्यात घेत मार दिला व   पोलिसांच्या हवाली केले. तो देखील मानसिक रुग्णच निघाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्याविरुद्ध कुणीही फिर्याद न दिल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्याच्या नातेवाइकांना समज देऊन त्यालाही सोडून देण्यात आले.बालकांच्या सुरक्षिततेचे काय?अपहरण करणारी टोळी नसेल किंवा अशा घटनांमध्ये   संबंधितांकडून अपहरणाचा उद्देश नसेल. परंतु अशा मानसिक रुग्णांकडून बालकाला काही अपाय केला गेला तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न पुढे येतो. असे मानसिक रुग्ण बालकांना उचलून नेण्यार्पयतची मजल मारतात तर त्यांना इजा पोहचविण्याबाबत देखील ते मागे-पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी अशा बाबी सहजतेने न घेता गांभीर्याने घेणेदेखील आवश्यक आहे.