शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे नंदुरबारातील घरकुले पडली ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:44 IST

घरकूलची स्थिती : 876 घरे उपलब्ध, अर्ज केवळ 798, महिनाभरात वाटप होणार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 : पालिकेने घरकूल योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या 876 घरांसाठी केवळ 798 अर्ज आल्याने पालिकेला ‘कुणी घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. तीन ते चार वेळा अर्ज सादर करण्याची मुदत देऊनही अपेक्षित अर्ज आले नसल्याची स्थिती आहे. गृह निर्माण विभागाच्या जाचक अटींमुळेच घरकूल घेण्यास कुणी धजावत नसल्याची स्थिती आहे. शहरात बेघरांसाठी घरकूल योजना पालिकेने राबविली आहे. या योजनेतील घरे बांधून पूर्णदेखील झाली आहेत. आठ वर्षापूर्वी पालिकेच्या प्रस्तावानुसार एकूण 1176 घरकूल बांधकामाचे प्रस्तावित होते. त्यासाठी भोणे फाटय़ाजवळील जागा आणि जिल्हा रुग्णालयासमोरील जागा निश्चित करण्यात आली. परंतु प्रतिसाद पाहता केवळ 876 घरकुलांच्या निर्मितीचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने तेवढय़ा घरकुलांना मंजुरी दिली होती. पाच वर्षापासून दोन्ही ठिकाणी चार मजली अपार्टमेंटच्या स्वरूपात प्रत्येकी वन रूम किचनची घरकुले तयार करण्यात आली आहेत. त्यांचे बांधकाम पूर्ण झाले असतानाच आठ महिन्यांपूर्वी अचानक काही कुटुंबांनी घरकुलांचा ताबा घेतला. त्यानंतर पोलिसांकडून व पालिका प्रशासनाकडून घरे खाली करण्यात आली होती.अर्ज करण्याची मुदतघरकुलांसाठी वेळोवेळी अर्ज मागविण्यात आले. परंतु यादीच तयार होत नव्हती. अखेर 25 एप्रिलर्पयत शेवटची मुदत देण्यात आली होती. त्यातही केवळ 798 अर्ज सादर करण्यात आले. घरकूल 876 आहेत. त्यानंतरही 10 मे र्पयत पुन्हा मुदत देण्यात आली. तेंव्हाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जवळपास 70 पेक्षा अधीक घरकुले ही रिकामी पडतील. जर घरकुलांच्या संख्येपेक्षा अधिक अर्ज आले असते तर लकी ड्रॉ पद्धतीने घरकुलांचे वाटप करावे लागले असते. परंतु स्थिती त्यापेक्षा वेगळी आहे.यादी सादरजिल्हाधिका:यांकडे पालिकेने घरकूल लाभार्थ्ीची यादी सादर केली आहे. जिल्हास्तरीय समितीकडे यादी गेल्यावर तिची पडताळणी केली जाईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्ीची निवड करून त्यांना घरकूल देण्यासंदर्भात पालिकेला शिफारस केली जाईल. त्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.बेघर संघर्ष समितीचा पाठपुरावाघरकुलांचे लाभार्थी निवडीचा वाद सुटलेला नाही. आधी बेघर संघर्ष समिती व नंतर त्याच पदाधिका:यांचे समाजवादी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या मागणीनुसार आपण दिलेल्या यादीनुसारच लाभार्थी निवडण्यात यावे. परंतु शासनाच्या नियमानुसारच लाभार्थी निवड करण्यात येईल, असा पवित्रा पालिकेने घेतला आहे. लाभार्थी निवडीच्या याद्या जाहीर होत नाही त्यामुळे तीन आठवडय़ांपूर्वी शेकडो कुटुंबीयांनी थेट घरकुलांचा ताबा घेतला होता. तो सोडल्यानंतर पुन्हा वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यातदेखील बेघर संघर्ष समिती व समाजवादी पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले होते.