शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे व्हॅनवाले काका करताहेत मजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने त्यावर आधारित पूरक रोजगारही बंद पडले आहेत़ यात भल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने त्यावर आधारित पूरक रोजगारही बंद पडले आहेत़ यात भल्या पहाटे विद्यार्थ्यांना आवाज लगावत शाळेत घेऊन जाणाऱ्या ‘व्हॅनवाले काकां’चाही समावेश असून चार महिन्यात आर्थिक गणिते पूर्णपणे विस्कळीत झाल्याने व्हॅनवाले काका थेट शेतशिवारात मजूरीसह हातगाडीवर भाजीपाला विक्री करत आहेत़शहरी भागात नर्सरी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये जाणारे किमान ७० टक्के विद्यार्थी हे छोटीमोठी रिक्षा किंवा चारचाकी व्हॅनने शाळेत जातात़ विद्यार्थी संख्या वाढत गेल्याने आपसूकच या वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे़ वेळ भरपूर द्यावा लागत असला तरी चांगला रोजगार मिळत असल्याने अनेकांनी कर्ज काढून तीनचाकी किंवा चारचाकी वाहने घेत विद्यार्थी वाहतूक सुरू केली आहे़ यातून एकट्या नंदुरबार शहरात २५० पेक्षा अधिक चालक आणि मालक आहेत़ २२ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शाळा बंद पडल्याने विद्यार्थी वाहतूकीचा उपक्रमही बंद आहे़ आज ना उद्या शाळा सुरू होईल या भरवशावर दिवस काढणाºया या चालक मालकांचे पैश्यांअभावी हाल होत असल्याने त्यांनी किरकोळ व्यवसाय करुन उदरनिर्वाह सुरू केला आहे़ यात खाद्यपदार्थ, भाजीपाला, चहाटपरी यासह शेतात मजूरी करण्याचे काम हे रिक्षाचालक व मालक करत आहेत़ यातून घरखर्च भागवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ यातही लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने सुरू असलेल्या रोजगारात खंड पडला आहे़ यामुळे दरदिवशी होणारा व्यवसायही थांबला असल्याचे सांगण्यात आले आहे़येत्या काळात सर्व प्राथ्मिक आणि माध्यमिक शाळा सुरू होवून पुन्हा जुने दिवस येणार अशी अपेक्षा असली तरी गेल्या चार महिन्यात थकलेले वाहनाचे हप्ते, दुरूस्त्यांचा खर्च आणि घराचा खर्च करण्यासाठी काढावे लागलेले कर्ज याची परतफेड करताना धावपळ उडत आहे़कर्जाच्या हप्त्यांमुळे झाले बेजारनंदुरबार शहरात किमान २५० रिक्षा-चालक आणि मालक आहेत़ विद्यार्थी वाहतूक हाच हा एकमेव व्यवसाय असल्याने मार्च ते मे दरम्यान हाती असलेल्या पैश्यात त्यांनी घरखर्च भागवला होता़ शासनाने कर्जाचे हप्ते घेण्यास मुदतवाढ दिली असल्याने त्यांना दिलासा मिळाला असला तरी येत्या काळात कर्जाचे हप्ते सुरू झाल्यास काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे़ शहरातील विविध भागात राहणाºया अनेकांनी रिक्षातून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करुन कुटूंबाचा गाडा सुरू ठेवला आहे़ नंदुरबार सोबतच ग्रामीण भागातून विद्यार्थी वाहतूक करणाºया चालक आणि मालकांचीही गंभीर स्थिती आहे़ यातील बरेच जण शेतात कामाला जावून वेळ निभावून नेत आहेत़ शाळा सुरू झाल्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांकडून फी मिळणे अशक्य असल्याने शासनाने आणखी दोन महिने कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी मुदत द्यावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे़विद्यार्थी वाहतूक बंद असल्याने भाडोत्री पद्धतीने चारचाकी वाहन चालवत आहे़ कोरोना नियमावलीनुसार ग्राहकाकडून कागदपत्रे दिल्यावरच गावी जायला मिळते़ यातून आठवड्यातून एखाद-दुसरी फेरी होत आहे़ विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षाही धूळखात पडून आहे़ शाळा सुरू झाल्यावर मुलांची शैक्षणिक फि कशी भरावी अशी चिंता आहे़ त्यात कुटूंबातील छोटी-मोठी कार्ये यामुळे चिंता वाढल्या आहेत़-मंगलदास बेडसे, रिक्षामालक,नंदुरबाऱ