शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

पाण्याअभावी बोरद येथे पीक करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 12:58 IST

तापमानाचाही बसतोय फटका : आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 28 : तळोदा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पाण्याअभावी पिक करपू लागली आहेत़ तसेच ऐरवी 25 मेस होणारी कापूस लागवडसुध्दा पाण्याअभावी यंदा उशिरा करण्यात येणार असल्याचे परिसरातील शेतक:यांकडून सांगण्यात आल़ेतळोदा तालुक्यातील बोरद, मोड, तळवे, आमलाड, प्रतापपूर, खरवड, त:हावद, कढेल, लाखापूर, करड आदी परिसरात भिषण पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आह़े त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांनी कापूस लागवड यंदा उशिरा करण्याचा निर्णय घेतला आह़े सध्या तापमानाचा पारा चांगलाच वर चढला आह़े गेल्या दोन महिन्यांपासून तापमान चाळीशी पार गेल्याने एकीकडे जीवाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे पीक जगवताना शेतक:यांना एकना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े शेतक:यांनी कुपनलिकांमध्ये दोनशे ते अडीचशे फुटांपर्यत सबमर्शिबल पंप सोडले आहेत़ तरीसुध्दा पाहिजे त्या प्रमाणात पाणी ओढले जात नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े या परिसरात कापसाची लागवड 25 मे नंतर होण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याचे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येत आह़े महावितरणकडूनही दररोज केवळ  3 ते 4 तासच कृषिपंपांना वीजपुरवठा पुरविण्यात येत असतो़ त्यातही तो असमान दाबाचा असल्याने शेतक:यांकडून पीकांना पुरेशा प्रमाणात पाणीसुध्दा दिले जात नसल्याचे सांगण्यात आल़े दरम्यान, रात्रीबेरात्री वीजपुरवठा होत असतो़ त्यामुळे शेतक:यांना आपला जीव धोक्यात टाकून पीकांना पाणी द्यायला जावे लागत असत़े आधीच परिसरात बिबटय़ांचा वावर आह़े त्यातच अवेळी पाणी द्यायला जाताना शेतक:यांच्या अंगावर काटा उभा राहत असतो़ दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आह़े त्यामुळे पाण्याच्या विवंचनेमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आह़े वाढत्या तापमानामुळे येथील लघुप्रकल्पसुध्दा कोरडे पडत आहेत़ त्यामुळे पशुपालकांसमोर समस्या वाढत आह़े पाणी नसल्याने परिसरातील मोजक्या विहिरींमध्ये मोटारी टाकून त्या माध्यमातून पाणी ओढले जात असल्याच्या व्यथा येथील शेतक:यांकडून सांगण्यात येत आहेत़