लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नागरी वाहतूक व्यवस्थेचा सर्वात मोठा दुवा असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवासीच येत नसल्याचे चित्र आहे़ यामुळे नंदुरबार आगारातून १ जूनपासून रडतखडत सुरु झालेल्या एसटीच्या बसफेऱ्या प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्या असल्याने एसटीला पुन्हा ब्रेक लागला आहे़जिल्ह्यात चार दिवसात तब्बल २४ कोरोनाबाधित समोर आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर नंदुरबार शहर चार दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर शहरातून बाहेर जाणे आणि आत येणाºया वाहनांना लगाम बसावी म्हणून सर्वत्र बॅरीकेटींग करण्यात आले आहे़ या लॉकडाऊनचा सर्वाधिक मोठा फटका एसटीला असून मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसात बसस्थानकातून एकही बस सुटलेली नाही़ यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे़ नंदुरबारसोबतच इतर शहादा, नवापूर आणि अक्कलकुवा आगारातही हीच स्थिती असून दर दिवशी किमान अडीच हजार फेºया करणारे चारही आगार गेल्या १५ दिवसात ५०० फेºयाही पूर्ण करु शकलेल्या नाहीत़ चारही आगारातून प्रतीदिवस १२ फेऱ्यांप्रमाणे वाहतूक सुरु करण्यात आली होती़ परंतू बºयाच वेळा प्रवासी नसल्याने फलाटावर लावलेली बसच रद्द करण्याची वेळ संबधित आगारावर आली आहे़ शुक्रवारी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर पुन्हा फेºया सुरु होतील अशी अपेक्षा असली तरी एसटीला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल असे मत एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारीच वर्तवत आहेत़विशेष बाब म्हणजे प्रवाशांची काळजी घेऊन त्यांना योग्य त्या पद्धतीने प्रवास करता यावा यासाठी सॅनेटायझेशन, हँडवॉश स्टँड, थर्मल स्कॅनिंग, मोफत मास्क वाटप यासह विविध उपक्रम राबवले आहेत़ यासाठी आगारांकडून खर्च केला जात आहे़ यानंतरही प्रवाशांची संख्या वाढत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ शनिवारपासून नियमित १२ बसफेºया सुरु करण्याचे नियोजन नंदुरबार आगाराने करुन ठेवले आहे़
प्रवाशांअभावी ‘एसटी’ला लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:37 IST