शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे रिक्षाचालकांसोबत त्यांचे कुटुंबही करू लागले व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST

नंदुरबार शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वाढला असल्याने रिक्षा चालकांची संख्या ही ५०० च्या घरात गेली आहे. प्रवासी संख्या ...

नंदुरबार शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वाढला असल्याने रिक्षा चालकांची संख्या ही ५०० च्या घरात गेली आहे. प्रवासी संख्या आणि प्रवासी मार्ग यांच्यात वाढ झाल्याने सर्वांनाच दिवसभरात दोन ते तीन हजार रुपयांची कमाई होत आहे. रिक्षाचा दिवसाचा मेंटेनन्स, इंधन दर यामुळे दिवसाला खर्च काढून घरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल एवढी रक्कम त्यांच्याकडून गोळा करण्यात येत होती. परंतु गेल्या काही दिवसात इंधनदरवाढीमुळे रिक्षा चालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होऊन आवक मात्र कमी झाली आहे. यातून मार्ग काढत काहींनी विद्यार्थी वाहतुकीचा तर काहींनी चारचाकीवर चालक म्हणून पार्टटाईम काम करण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे तीन चाकी रिक्षासोबतच शहरापासून २० किलोमीटर लांब असलेल्या गावांदरम्यान रिक्षा चालवणाऱ्यांचेही हाल होत आहेत. या रिक्षा चालकांच्या कुटुंबीयांकडून त्यांना साथ देण्यात येत असून ग्रामीण भागातील रिक्षा चालकांचे कुटुंब शेतात मजुरीला तर शहरी भागातील कुटुंबे घरगुती कामे करत आहेत. यात कोणी मेस चालवणे, शिलाई काम तसेच चहाची टपरी चालवत आहेत.

व्यवसायावर परिणाम

इंधन दरवाढ झाल्याने रिक्षा व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. वाढीव भाडे सांगितल्यास प्रवासी नकार देत त्यांची व्यवस्था करून घेतात. शहरात रिक्षा व्यवसायातही स्पर्धा असल्याने भाडेवाढ करण्याबाबत रिक्षाचालक उत्सुक दिसून येत नाहीत.

इतर कामांचा आधार

रिक्षा चालवणारे बहुतांश जण हे प्रशिक्षित चारचालक असतात. यातून प्रवासी चारचाकी वाहनांवर वर्दी मिळाल्यास दर दिवस या हिशेबाने चालक म्हणून काम करतात. यातून महिन्याकाठी काही पैसे येऊन घराच्या खर्चाला हातभार लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन खर्चात कपात करावा लागतो. रिक्षात पेट्रोल राहिल तर ती चालेल. कुटुंबात पत्नीकडून किरकोळ कामे करून हातभार लागत असल्याने दिलासा आहे. परंतु पुढे काय असा प्रश्न आहे.

-भटू रामराजे, रिक्षाचालक ,

शहरात रिक्षांची संख्या खूप झाल्याने दिवसभरात टाकलेल्या पेट्रोल आणि डिझेलचा खर्च निघणेही मुश्कील होते. अनेकवेळा इतर रिक्षाचालक हे दिवसभर प्रवाशांच्या प्रतीक्षेत असतात. विद्यार्थी वाहतूक करणारेही त्रस्त आहेत. दिवसभरात खर्च वजा जाता खूप थोडे पैसे रिक्षाचालक घरी घेऊन जातात. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे.

-अनिल मराठे, रिक्षाचालक