शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातच नंदुरबारात दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:27 IST

लहान शहादे/खोडसगाव : विहिरी पडल्या कोरडय़ा, पिण्याच्या पाण्याचेही हाल

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोडसगावसह लगतच्या परिसरात भर  पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठीही ग्रामस्थांना  इतरत्र भटकंती करावी लागत आह़ेखोडसगाव गावाची परिस्थिती तर अतिशय भयंकर असून या ठिकाणी विहिरी पूर्णपणे कोरडय़ा पडलेल्या आहेत़ सर्वाधिक कमी पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात झाली आहेत़ त्यातल्या त्यात नंदुरबारातील पूर्व भागात अधिकच दैनिय परिस्थिती आह़े त्यामुळे साहजिकच पावसाळ्यातसुध्दा पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने ही परिस्थिती म्हणजे पुढील काळातील दुष्काळी स्थितीचीच धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आह़े पावसाळ्याचा कालावधी पूर्ण झाला आह़े काहीच दिवसात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आह़े त्यामुळे यंदाचा पावसाळा शेतक:यांना निराश करणारा ठरला आह़े परतीच्या पावसावरच येथील जलस्त्रोत अवलंबून असल्याचे दिसून येत आह़ेनंदुरबार तालुक्यात आतार्पयत केवळ 376.3 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आह़े नवापूर तालुक्यात 628 मीमी, तळोदा तालुक्यात 513 मीमी, अक्कलकुवा तालुक्यात 633 मीमी, शहादा तालुक्यात 453 मीमी, अक्राणी तालुक्यात 641 मीमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच पावसाच्या दृष्टीने नंदुरबार तालुका सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसून येत आह़े पिकेही आले धोक्यातपावसाने पाठ फिरविल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पिक धोक्यात आलेली आहेत़ पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े काही पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहेत, तर काही पिक पाण्याअभावी जळाली आहेत़ पपई, मिरची, कापूस आदी पिक वाचविण्यासाठी शेतकरी विहिरींचे खोलीकरण करीत आहेत़ परतीचा पाऊस  समाधानकारक झाल्यास शेतक:यांचे पुढील नुकसान टळण्याची शक्यता आह़ेभयंकर दुष्काळी स्थितीपरिसरातील गावांमध्ये भयंकर दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े पुढील उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करावी लागणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े येथील लघुप्रकल्पांमध्येही ठणठणाट आह़े या ठिकाणी पाण्याच्या शोधात युवकांना आपली रोजंदारीही बुडवावी लागत आह़े लगतच्या गावातदेखील पाण्याची टंचाई असल्याने लांबवरुन वाहनांव्दारे पाणी आणावे लागत असल्याचे सांगण्यात येत आह़े प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आह़े