शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 40 टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:15 IST

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 ...

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 टक्के पेरणी नंदुरबार तर सर्वाधिक 146 टक्के रब्बी पिकांच्या पेरण्या अक्कलकुवा तालुक्यात झाल्या आहेत़जिल्ह्यात यंदा पावसाने लावलेल्या अल्प हजेरीमुळे तीन तालुक्यात दुष्काळ तर 1 तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती आह़े तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दोन मंडळातही नुकताच दुष्काळ जाहिर करण्यात आला आह़े खरीपात उत्पादनच हाती न आल्याने अनेक शेतक:यांमध्ये औदासिन्य आह़े यातच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यात डिसेंबर्पयत सरासरी 70 टक्के पेरण्या पूर्ण होतात़ परंतू यंदा केवळ 40 टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यात 1 हजार 165, नवापूर 6 हजार 642, शहादा 7 हजार 325, तळोदा 3 हजार 536, अक्कलकुवा 3 हजार 104 तर धडगाव तालुक्यात 3 हजार 665 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार केवळ 13 टक्के रब्बी पिके असल्याने येथील दुष्काळाची वास्तवता समोर येत आह़ेजिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि मका या तीन पिकांना प्राधान्य दिले जात़े यंदाच्या हंगामात आजअखेरीस नंदुरबार 566, नवापूर 3 हजार 247, शहादा 2 हजार 108, तळोदा 943, अक्कलकुवा 25 तर धडगाव तालुक्यात 860 हेक्टर असा एकूण 7 हजार 749 हेक्टर गहू पेरण्यात आला आह़े जिल्ह्यात रब्बी हंगामात किमान 21 हजार 123 हेक्टवर गहू पेरा होण्याची अपेक्षा असत़े परंतू ही अपेक्षा केवळ 37 टक्केच पूर्ण होऊ शकली आह़ेदुसरीकडे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रही खालावले असून नंदुरबार तालुक्यात केवळ 10, नवापूर 1 हजार 103, शहादा 1 हजार 198, तळोदा 742, अक्कलकुवा 2 हजार 170 तर धडगाव तालुक्यात 20 हेक्टर अशी एकूण 5 हजार 243 हेक्टर ज्वारी पेरणी झाली आह़े यासोबत 1 हजार 848 हेक्टर मका पेरणी पूर्ण करण्यात आली आह़े गेल्या काही वर्षात शेतक:यांच्या पसंतीमुळे ऑक्टोबर महिन्यापासून पेरणीला सुरुवात होणारा हरभराही निम्मेच ठिकाणी दिसून येत आह़े सर्वसाधारण 20 हजार हेक्टरक्षेत्रापैकी केवळ 10 हजार 339 हेक्टर हरभरा पेरणी झाली असून नंदुरबार तालुक्यात केवळ 581 क्षेत्रात हरभरा पेरणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यंदा दाळवर्गीय आणि तेलवर्गीय पिकांची स्थिती कमकुवत झाल्याने चिंता व्यक्त होत आह़े