शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुष्काळी स्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यात केवळ 40 टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:15 IST

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 ...

नंदुरबार : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळीस्थितीमुळे 40 टक्के क्षेत्रात रब्बी पेरण्यात आजअखेरीस पूर्ण झाल्या आहेत़ यात सर्वाधिक कमी 13 टक्के पेरणी नंदुरबार तर सर्वाधिक 146 टक्के रब्बी पिकांच्या पेरण्या अक्कलकुवा तालुक्यात झाल्या आहेत़जिल्ह्यात यंदा पावसाने लावलेल्या अल्प हजेरीमुळे तीन तालुक्यात दुष्काळ तर 1 तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती आह़े तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दोन मंडळातही नुकताच दुष्काळ जाहिर करण्यात आला आह़े खरीपात उत्पादनच हाती न आल्याने अनेक शेतक:यांमध्ये औदासिन्य आह़े यातच पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्ह्यात डिसेंबर्पयत सरासरी 70 टक्के पेरण्या पूर्ण होतात़ परंतू यंदा केवळ 40 टक्के क्षेत्रावर रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार तालुक्यात 1 हजार 165, नवापूर 6 हजार 642, शहादा 7 हजार 325, तळोदा 3 हजार 536, अक्कलकुवा 3 हजार 104 तर धडगाव तालुक्यात 3 हजार 665 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ नंदुरबार केवळ 13 टक्के रब्बी पिके असल्याने येथील दुष्काळाची वास्तवता समोर येत आह़ेजिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि मका या तीन पिकांना प्राधान्य दिले जात़े यंदाच्या हंगामात आजअखेरीस नंदुरबार 566, नवापूर 3 हजार 247, शहादा 2 हजार 108, तळोदा 943, अक्कलकुवा 25 तर धडगाव तालुक्यात 860 हेक्टर असा एकूण 7 हजार 749 हेक्टर गहू पेरण्यात आला आह़े जिल्ह्यात रब्बी हंगामात किमान 21 हजार 123 हेक्टवर गहू पेरा होण्याची अपेक्षा असत़े परंतू ही अपेक्षा केवळ 37 टक्केच पूर्ण होऊ शकली आह़ेदुसरीकडे रब्बी ज्वारीच्या क्षेत्रही खालावले असून नंदुरबार तालुक्यात केवळ 10, नवापूर 1 हजार 103, शहादा 1 हजार 198, तळोदा 742, अक्कलकुवा 2 हजार 170 तर धडगाव तालुक्यात 20 हेक्टर अशी एकूण 5 हजार 243 हेक्टर ज्वारी पेरणी झाली आह़े यासोबत 1 हजार 848 हेक्टर मका पेरणी पूर्ण करण्यात आली आह़े गेल्या काही वर्षात शेतक:यांच्या पसंतीमुळे ऑक्टोबर महिन्यापासून पेरणीला सुरुवात होणारा हरभराही निम्मेच ठिकाणी दिसून येत आह़े सर्वसाधारण 20 हजार हेक्टरक्षेत्रापैकी केवळ 10 हजार 339 हेक्टर हरभरा पेरणी झाली असून नंदुरबार तालुक्यात केवळ 581 क्षेत्रात हरभरा पेरणी पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यंदा दाळवर्गीय आणि तेलवर्गीय पिकांची स्थिती कमकुवत झाल्याने चिंता व्यक्त होत आह़े